शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

समस्या सोडविणे हाच शिबिराचा उद्देश

By admin | Updated: June 18, 2016 01:04 IST

शासनाच्यावतीने शेतकरी, शेतमजूर, महिला बचत गट यांचेशी संबंधित असणाऱ्या समस्या सोडविणे हाच समाधान शिबिराचा उद्देश ...

समाधान शिबिर : राजकुमार बडोले यांचे मार्गदर्शन सडक-अर्जुनी : शासनाच्यावतीने शेतकरी, शेतमजूर, महिला बचत गट यांचेशी संबंधित असणाऱ्या समस्या सोडविणे हाच समाधान शिबिराचा उद्देश असल्याचे प्रतिपादन सामाजिक न्याय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले केले. महसूल विभागाच्यावतीने सुवर्ण जयंती महाराजस्व अभियानांतर्गत येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या नवीन इमारतीत गुरूवारी आयोजित समाधान शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी होते. प्रमुख पाहुणे म्हणून व्यासपीठावर मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत फुंडकलवार, जि.प. उपाध्यक्ष रचना गहाणे, पं.स. सभापती कविता रंगारी, जि.प. सदस्य माधुरी पातोडे, रमेश चुऱ्हे, शीला चव्हाण, पं.स. उपसभापती विलास शिवणकर, पं.स. सदस्य गिरधारी हत्तीमारे, गायत्री इरले, इंदू कापगते, तहसीलदार व्ही.एम. परळीकर, खंडविकास अधिकारी आनंद लोकरे, तालुका कृषी अधिकारी पेशट्टीवार, वनपरिक्षेत्राधिकारी गोवर्धन राठोड, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, महिला बालकल्याण अधिकारी बागडे उपस्थितीत होते. या शिबिरात अन्नपुरवठा शाखा, तहसील, भूमी अभिलेख, कृषी विभाग जि.प. एकात्मिक बाल विकास कार्यालय, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, आरोग्य विभाग, ग्रामीण रुग्णालय, कृषी विभाग, वनविभाग कार्यालय, देना बँक, ग्रामीण बँक, महाराष्ट्र बँक, शाखा सौंदड, डव्वा, महावितरण केंद्र, सेतु केंद्र, पशुसंवर्धन विभाग, महिला बचत गटांनी विविध स्टॉल लावून नागरिकांना माहिती देत असून समाधान केले जात आहे. विशेष म्हणजे, शामसुंदर बोरकर हायस्कूल खोडशिवनीची विद्यार्थिनी विद्या राजेंद्र परशुरामकर हिला ९० टक्के गुण मिळाल्याने तिचा पुष्पगुच्छ देऊन पालकमंत्र्यांकडून सन्मान करण्यात आला. (तालुका प्रतिनिधी)