शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
2
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
3
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
4
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
5
'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
6
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
7
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
8
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
9
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
10
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
11
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
12
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
13
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
14
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
15
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
16
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
17
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!
18
मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला, बदलापूरमधील घटना
19
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?
20
Laura Wolvaardt Century : लॉराचा शतकी तोरा! वर्ल्ड कपमध्ये मिताली राजच्या वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी

पेन्शनअभावी पुंगळे कुटुंबीयांची वणवण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2019 23:28 IST

जिथे विद्यार्थी काय गावातही अ, आ,ई ची जाण नव्हती तिथे विद्यार्थ्यांसह गावकऱ्यांना अक्षर साक्षर केले. तब्बल १३ वर्षे शासनाची खाल मानेने चाकरी केली पण आज त्यांच्या कुटूंबीयावर कठीन वेळ आली असताना शासन चक्क हातवर करीत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवडेगाव : जिथे विद्यार्थी काय गावातही अ, आ,ई ची जाण नव्हती तिथे विद्यार्थ्यांसह गावकऱ्यांना अक्षर साक्षर केले. तब्बल १३ वर्षे शासनाची खाल मानेने चाकरी केली पण आज त्यांच्या कुटूंबीयावर कठीन वेळ आली असताना शासन चक्क हातवर करीत आहे.ही घटना आहे एका शासकीय कर्मचाऱ्यांच्या निराधार झालेल्या कुटूंबाची, पतीच्या निधनानंतर शासनानेही हात झटकल्याने कुटूंबीयांना हक्काचे गाव सोडून वणवण भटकावे लागत आहे. गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा तालुक्यातील मशीटोला येथील मृत कर्मचारी भोजराज गोमा पुंगळे यांच्या कुटूंबाची ही व्यथा आहे. कर्मचारी भोजराज पुंगळे यांनी त्यांच्या हयातीत वेठबिगारालाही लाजवेल असे कष्ट उपसून गावात अक्षराची पेरणी केली.आयुष्याच्या उमेदीच्या काळात ब्र न काढता शासनाची चाकरी केली पण वयाच्या ३८ व्या वर्षी अचानक त्यांचे निधन झाले.सारच बिनसले भोजराज पुंगळे यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी शालू पुंगळे, सात वर्षाचा मुलगा हर्ष व तीन वर्षीय पूजा यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा ठाकला आहे.पुंगळे यांनी काही दिवस मशीटोला येथे काम करुन दिवस काढले पण कुणाचीच मदत न मिळल्याने कधी कुण्या ओळखीच्या गावात तर आता माहेरी त्यांनी आसरा घेतला आहे.मृत कर्मचारी पुंगळे यांच्या वेतनातून सुमारे १ लाख ३२ हजार रुपयांची अंशदायी पेंशनची कपात करण्यात आली होती. गटविमा व इतरही कपाती करण्यात आल्या. परंतु शासनाकडून त्यांना आजवर कुठलीच मदत मिळालेली नाही.शासकीय कर्मचाºयांस त्याच्या सेवा कालावधीत मृत्यू झाल्यास १० लक्ष रुपये अनुदान देण्याचे आदेश आहेत. परंतु याचीही जाण विभागाला व शासनाला नाही. पुंगळे यांच्या पत्नी शालू पुंगळे या एएनएम व पदवीपर्यंत शिकलेल्या आहेत.तीन वर्षीय मुलीला सांभाळ करतानाच मुलाला शिक्षण देण्याचे काम त्या कष्ट उपसून करीत आहेत.तरी भविष्याच्या प्रश्न त्यांच्यापुढे आ वासून उभा आहे. शासकीय कर्मचाºयांच्या कुटूंबाची अशी दूरवस्था होत असेल तर भविष्यात कर्तव्यदक्ष युवक शासकीय नोकरीकडे पाठ दाखवतील यात दुमत नसावे.अनुकंपा तत्त्वावर नोकरी द्यापतीच्या निधनाने आपले कुटूंब वणवण भटकत असून उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा ठाकला आहे. आपण नर्सिंग पदवी शिक्षीत असल्यामुळ अनुकंपा तत्त्वावर नोकरी व जुनी पेंशन लागू करण्यात यावी.- शालू पुंगळे, मृतकाची पत्नी.