शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावतीच्या धारणी तालुक्यात भूकंपाचा सौम्य धक्का; ३.८ रिक्टर स्केलची नोंद
2
"शब्दच नाही, अस्वस्थ झालोय..." ; चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेवर विराट कोहली भावूक
3
"माझी जगायची इच्छा संपली..."; आयटी अभियंता तरुणीने २१व्या मजल्यावरून मारली उडी
4
कराड-लातूर एसटी बस उलटली, १७ प्रवाशी जखमी; ५३ जण सुखरुप, लातूर-मुरुड मार्गावरील घटना
5
"तामिळ माझं जीवन, माझं अस्तित्व..."; मी माफी मागणार नाही, 'त्या' विधानावर कमल हासन ठाम
6
"३५ हजार क्षमता, ३ लाख लोक आले...": चेंगराचेंगरीच्या घटनेवर कर्नाटकचे मुख्यमंत्री काय बोलले?
7
स्टेडियमबाहेर चेंगराचेंगरीत लोकांचा जीव गेला, आतमध्ये १० मिनिटांत RCB खेळाडूंचा सत्कार उरकला
8
IPL चॅम्पियन्सना बघण्याच्या नादात रक्त सांडलं! RCB च्या विजयी मिरवणुकीदरम्यान नेमकं काय घडलं? VIDEO
9
चायनामन प्रेमात पडला अन् गुपचूप साखरपुडा उरकला; कुलदीप यादवची होणारी पत्नी LIC कर्मचारी...  
10
Video: अख्ख बंगळुरू 'हाऊसफुल', मेट्रो स्टेशनवर प्रचंड गर्दी; पाय ठेवायलाही जागा नाही
11
Bengaluru stampede: बंगळुरू चेंगराचेंगरीत आरसीबीच्या चाहत्यांचा मृत्यू, पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला शोक
12
Bengaluru Stampede: आरसीबीच्या विजयी मिरवणुकीदरम्यान बंगळुरूत चेंगराचेंगरी; ११ जण ठार, ३३ जखमी!
13
₹350 पार जाणार अंबानींचा हा शेअर! कंपनीनं नव्या उद्योगात केलीय 'एंट्री'
14
Mumbai Fire: शॉर्ट सर्किटमुळे झेप्टोच्या गोदामात भीषण आग, सर्व सामान जळून खाक! 
15
एकतर्फी प्रेमात वेडसर झाला युवक; युवतीच्या हत्येनंतर प्रायव्हेट पार्टसह शरीरावर ४५ चाकूचे वार
16
कुटुंबासह अयोध्येत पोहोचले इलॉन मस्क यांचे वडील, प्रभू श्रीराम यांच्या नावानं दुमदुमलं विमानतळ
17
याला म्हणतात परतावा...! शत्रूंचे ड्रोन पाडणारी 'सिस्टिम' तयार करते ही कंपनी, एका महिन्यात ६१% नं वाढला शेअर; ५ वर्षांत दिला ५१५३% परतावा
18
आणखी एक पुरावा; 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये ठार झालेल्या २१ दहशतवाद्यांच्या कबरीचे फोटो समोर
19
"हे देशद्रोहापेक्षा कमी नाही..."; राहुल गांधींवर का संतापले भाजपा अध्यक्ष जे.पी. नड्डा?
20
वयाच्या ५७ व्या वर्षी अरबाज खान होणार बाबा! पत्नी शूरा प्रेग्नंट, बेबी बंपने वेधलं लक्ष

पुजारीटोला व कालिसराड रिकामे

By admin | Updated: July 6, 2014 23:58 IST

जिल्ह्यातील प्रकल्पांसह जुन्या मालगुजारी तलावांतून वर्षभर पाण्याचा पुरवठा होतो. यंदा मात्र पावसाअभावी जिल्ह्यातील हे प्रकल्प कोरडे पडत चालले आहे. तर जुन्या मालगुजारी

पाणी पेटणार : अन्य प्रकल्पांतही नाममात्र जलसाठागोंदिया : जिल्ह्यातील प्रकल्पांसह जुन्या मालगुजारी तलावांतून वर्षभर पाण्याचा पुरवठा होतो. यंदा मात्र पावसाअभावी जिल्ह्यातील हे प्रकल्प कोरडे पडत चालले आहे. तर जुन्या मालगुजारी तलावांचीसुद्धा हीच गत आहे. विशेष म्हणजे पाण्याचे प्रमुख स्त्रोत असलेले पुजारीटोला व कालिसराड हे दोन मोठे प्रकल्प आताच रिकामे झाले आहे. दुष्काळाच्या स्थितीत आता प्रकल्प आटत चालल्याने पाणी पेटण्याची चिन्हे दिसून येत आहेत. जिल्ह्याची तलावांचा जिल्हा म्हणून ओळख आहे. शिवाय चार मोठे व १० मध्यम, २० लघु प्रकल्प व ३८ जुने मालगुजारी तलाव जिल्ह्याला लाभलेले आहेत. या जलस्त्रोतांच्या माध्यमातूनच जिल्हावासीयांची शेती व गळ््याची तहान भागते. मात्र निसर्गाच्या तडाख्यापुढे यंदा जिल्ह्याला वरदान ठरलेले हे जलस्त्रोत यंदा हतबल ठरत आहेत. त्याचे असे की, जून महिना लोटला असून जुलै सुरू झाला आहे. मात्र अद्याप एक-दोन वेळा पडलेल्या पावसाच्या शिंतोड्यांखेरीज खरा पाऊस बरसलेला नाही. यामुळे जिल्ह्याला पाणी पुरविणारे जलस्त्रोत आटू लागले आहेत. या प्रकल्पांची आजची स्थिती बघितल्यास येणाऱ्या काही दिवसांनंतरचे भयावह वास्तव डोळ््या पुढे उभे राहते. यात जिल्ह्यातील चार मोठ्या प्रकल्पांतील पुजारीटोला व कालिसराड हे प्रकल्प आता कोरडे पडले आहेत. सिरपूर प्रकल्पात २६.५९ टक्के व इटियाडोह प्र्रकल्पात १८.७६ टक्केच पाणीसाठी शिल्लक आहे. मध्यम प्रकल्पांकडे बघता, बोदलकसा १४.५४ टक्के, चोरखमारा १८.३३ टक्के, चुलबंद २५.१८ टक्के, खैरबंधा १३.०३ टक्के, मानागड ७.८७ टक्के, रेंगेपार १६.१६ टक्के, संग्रामपूर ९.२१ टक्के, उमरझरी १५.७६ टक्के, कटंगी १६.८१ टक्के तर कलपाथरी ल.पा.खाली गेल्याची नोंद आहे. लघु प्रकल्पांत, आक्टीटोला ९.५७ टक्के, भदभद्या १७.६१ टक्के, डोंगरगाव ५.२७ टक्के, गुमडोह २.९४ टक्के, हरी १५.७५ टक्के, कालीमाती ४.१९ टक्के, मोगरा ३८.५९ टक्के, नवेगावबांध ९.३० टक्के, पिपरीया ५.७४ टक्के, पांगडी ०.५६ टक्के, रेहाडी ३.३० टक्के, राजोली ११.७२ टक्के, रिसाला ६.८१ टक्के, सडेपार ३१.४० टक्के, सेरपार २०.०७ टक्के, वडेगाव ७.५६ टक्के, ओवारा ३२.१९ टक्के पाणीसाठी आहे. सोनेगाव, सालेगाव व जुनेवानी लघु प्रकल्प ल.पा.खाली गेल्याची नोंद आहे. शिवाय जुन्या मालगुजारी तलावांची स्थिती अत्यंत भयावह आहे. ३८ तलावांपैकी १९ तलाव ल.पा.खाली गेल्याची नोंद आहे. तर फुलचूर तलावात ४५.३२ टक्के, खैरी १.९५ टक्के, खमारी २०.९० टक्के, काटी १.९३ टक्के, कोसमतोंडी ११.५५ टक्के, कोकना १४.४५ टक्के, खोडशिवनी ८.२२ टक्के, खाडीपार १.५७ टक्के, मालीदुंगा ३४.७७ टक्के, मेंढा १.७० टक्के, मोरगाव २.२२ टक्के, माहुरकू डा ५८.१० टक्के, निमगाव ११.८९ टक्के, पळसगाव डव्वा २.९४ टक्के, पुतळी ५०.८२ टक्के, सौंदड २०.९७ टक्के एवढाच पाणीसाठी शिल्लक आहे. जिल्ह्यातील जलस्त्रोतांची ही स्थिती बघता पाऊस न बरसल्यास या प्रकल्पसुद्धा आटून पाणी पेटण्याची स्पष्ट चिन्हे दिसून येत आहे. (शहर प्रतिनिधी)