शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

लोकसुधारणेचे विद्यालय सामुदायिक प्रार्थना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2018 23:59 IST

लोकमत न्यूज नेटवर्कआमगाव : राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सर्व धर्माचा समन्वय साधण्यासाठी सामुदायीक प्रार्थना सुरू केली. जगात विश्वशांती नांदावी यासाठी आचार, विचार, व्यवहार बदलवून टाकणाऱ्या प्रार्थनेची सवय मुला-मुलींना लावा. उद्याचे भविष्य असलेल्या चिमुकल्यांना सुसंस्कार देण्यासाठी प्रार्थनेची गोडी लावावी. कारण लोकसुधारणेचे विद्यालय सामुदायीक प्रार्थना आहे असे प्रतिपादन हभप एम.ए. ठाकूर यांनी केले.जवळील ग्राम ...

ठळक मुद्देएम.ए.ठाकूर : तुकडोजी महाराज पुण्यतिथी महोत्सवाची सांगता

लोकमत न्यूज नेटवर्कआमगाव : राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सर्व धर्माचा समन्वय साधण्यासाठी सामुदायीक प्रार्थना सुरू केली. जगात विश्वशांती नांदावी यासाठी आचार, विचार, व्यवहार बदलवून टाकणाऱ्या प्रार्थनेची सवय मुला-मुलींना लावा. उद्याचे भविष्य असलेल्या चिमुकल्यांना सुसंस्कार देण्यासाठी प्रार्थनेची गोडी लावावी. कारण लोकसुधारणेचे विद्यालय सामुदायीक प्रार्थना आहे असे प्रतिपादन हभप एम.ए. ठाकूर यांनी केले.जवळील ग्राम पदमपूर येथील श्री गुरूदेव सेवा मंडळातर्फे २५ डिसेंबर ते १ जानेवारी दरम्यान आयोजित राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या पुण्यतिथी महोत्सवाच्या समारोपीय कार्यक्रमात दहिकाला प्रसंगी ते बोलत होते. पुढे बोलताना ठाकूर यांनी, जगात शांती नांदावी, सर्व जिव-जंतूंचे भले मागणाऱ्या तुकडोजी महाराजांनी आदर्श ग्राम निर्मीती मांडली. ग्रामगीतेतून प्रत्येक गोष्टीचे महत्व समजावून दिले. ‘जिच्या हाती पाळण्याची दोरी, तिच जगाते उद्धरी, ऐशी वर्णीली मातेची थोरी शेकडो गुरूहुनी’ म्हणत महिला आपल्या संततीला संस्कारक्षम बनवू शकते असे सांगीतले.व्यसनांवर बोलताना त्यांनी, व्यसनांची समाजाला कीड लागली आहे. या व्यसनांपासून समाजाला दूर ठेवण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करायला हवे. दुधापेक्षा दारूची किंमत अधिक आहे. सुदृढ शरीरासाठी दुधाची गरज असते दारूची नाही. परंतु स्वत:च्या खिशातील पैसे दारूवर खर्च करून अपमान ओढावून घेणारे आपला संसार उद्ध्वस्त करतात. दारूसारखे व्यसन अख्या कुटुंबाला संपविते असेही ते म्हणाले.दहीकाला करण्यासाठी श्री भवभूती महिला भजन मंडळाच्या यशोदा रहिले, सिता वारंगे, लक्ष्मी मेंढे, भागरथा भांडारकर, लक्ष्मी डोये, पारबता डोये, शांता खरकाटे, शंकर वारंगे यांनी भजन गात गणपती मंदिरातून दहिहंडी कार्यक्रमास्थळी आणली. आरती बनवारीया यांनी दहीहंडी डोक्यावर घेतली होती. गोपालकाल्याचे भजन सादर करून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. नंतर महाप्रसादाचा कार्यक्रम घेण्यात आला.विशेष म्हणजे कार्यक्रमांतर्गत श्री गुरूदेव सेवा मंडळाच्यावतीने ग्राम स्वच्छता अभियान राबवून शोभायात्रा काढण्यात आली. कार्यक्रमासाठी श्री गुरूदेव सेवा मंडळाचे कार्यकर्ते अशोक चुटे, शंकर वारंगे, आडकु वंजारी, डॉ. भरत हुकरे, पुनाराम भांडारकर, ललीत भांडारकर, श्रीकृष्ण डोये, घनश्याम बागडे, फागुलाल डुंबरकांबळे, ग्यानिराम ठाकरे व इतर सदस्यांनी सहकार्य केले.