शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

लोकार्पणासाठी जनतेची गळचेपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2019 23:11 IST

येथे १३२ केव्ही. क्षमतेचे विद्युत उपकेंद्र तयार करण्यात आले. या उपकेंद्राचे कामही पूर्ण झाले असून केवळ बटन दाबून सुरु वात करायची आहे. मात्र ते कुणाच्या हस्ते करायचे यासाठी जनतेची गळचेपी केली जात आहे. आता हा मुहूर्त केव्हा निघणार यासाठी अर्जुनीवासी आसुसलेले आहेत.

ठळक मुद्देउपकेंद्रांना मुहूर्ताची वाट : अर्जुनीवासीयांच्या नजरा लागून

संतोष बुकावन।लोकमत न्यूज नेटवर्कअर्जुनी-मोरगाव : येथे १३२ केव्ही. क्षमतेचे विद्युत उपकेंद्र तयार करण्यात आले. या उपकेंद्राचे कामही पूर्ण झाले असून केवळ बटन दाबून सुरु वात करायची आहे. मात्र ते कुणाच्या हस्ते करायचे यासाठी जनतेची गळचेपी केली जात आहे. आता हा मुहूर्त केव्हा निघणार यासाठी अर्जुनीवासी आसुसलेले आहेत.येथे यापूर्वी 66 केव्ही. विद्युत उपकेंद्र होते. ते १३२ केव्ही. मध्ये पराविर्तत झाले. १३२ केव्ही. चे काम सुरू असताना काही प्रमाणात हालअपेष्टा झाल्या. आता काम पूर्ण होऊन महिन्यापेक्षा अधिक कालावधी लोटला व केवळ बटन दाबून केंद्र सुरू करण्याची औपचारिकता शिल्लक आहे. मात्र हे ग्रहणच सुटेना, पारेषण विभागाला कुणाची प्रतिक्षा आहे तेच कळायला मार्ग नाही. अर्जुनी-मोरगाव कार्यक्षेत्रातील अर्जुनी ते घुसोबाटोला दरम्यान १०४ ट्रान्सफॉर्मर आहेत. अर्जुनीसाठी साकोलीवरून ३३ केव्हीची मागणी असून प्रत्यक्ष २७ केव्ही. मिळत आहे. नवेगावबांधला तर २५ केव्ही च मिळत आहे.एकीकडे पाऊस येत नसून कृषीपंप बंद आहेत. वीज दाब बरोबर राहत नसल्याने विजेवर चालणारी उपकरणे निकामी ठरत आहेत. अनेकदा वीजपुरवठा रात्री-बेरात्री कधीही खंडित होतो. थोडासा जरी पाऊस आला अथवा हवा जोराने वाहायला लागली की वीजपुरवठा बंद केला जातो. बोंडगावदेवी येथे नवीन उपकेंद्राचे काम काही दिवसांपूर्वी सुरू होते. या परिसरातील राईसमिल तीन महिन्यांपासून बंदच होती. विज वितरण कंपनीचे अधिकारी ग्राहकांनी विचारणा केल्यावर उद्धट उत्तर देत असल्याची तक्र ार एका व्यावसायिकाने केली आहे.येथे १३२ केव्ही. उपकेंद्राचे काम सुरू आहे तेव्हापासून तालुक्यातील जनता उसनवारीच्या विजेवरच जगत आहे. सद्या साकोली येथून पुरवठा सुरू आहे. औद्योगिक, घरगुती व कृषी ग्राहकांना वीज दिली जात आहे. मात्र अधिक दाब वाढल्याने वेळीअवेळी पुरवठा खंडित होणे तसेच विजेवर चालणारी उपकरणे वारंवार बंद पडून त्यात बिघाड होणे अशा प्रकारात वाढ होत असल्याने जनता त्रस्त झाली आहे.सद्या शेतीचा हंगाम सुरू आहे वरु णराजा रु सला असून पाऊस नसल्याने शेतकरी हवालिदल झाला आहे. शेतकऱ्यांवर निसर्ग तर कोपला आहेच पण शासकीय यंत्रणाही कोपली आहे. उदघाटन व समारंभांसाठी शेतकरी, सर्वसामान्य जनतेचा बळी घेणे एवढेच नव्हे तर त्यांच्या उदरिनर्वाहाच्या साधनावरच वज्राघात करणे कितपत योग्य आहे. नेमका हा विलंब कुणाकडून होत आहे हा संशोधनाचा विषय आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतांचे भांडवल करण्यासाठी लोकार्पणाचा देखावा निर्माण करण्याचा हा केविलवाणा प्रकार केला जात असल्याचा आरोप केला जात आहे.तांत्रिक समस्यांमुळे उशीरराजकीय हेतूने मतांचे भांडवल करण्यासाठी लोकार्पणास विलंब केला जात आहे असा जनतेचा आरोप आहे अशी विचारणा केल्यावर प्रतिक्रि या देताना पारेषणचे अधिकारी संजय वाढवे यांनी या बाबीचा इन्कार केला. वनविभागाचे काही प्रश्न, लाखांदूर परिसरातील समस्या होत्या. बटनची कळ दाबून लोकार्पण करण्याच्या प्रक्रि येत काही तांत्रिक अडचणी होत्या त्या आता पूर्ण झाल्या असून लवकरच हे विद्युत उपकेंद्र सुरू होईल अशीही माहिती त्यांनी दिली.

टॅग्स :electricityवीज