शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
2
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
3
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
4
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
5
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
6
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर
7
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
8
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
9
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
10
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
11
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
12
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
13
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
14
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
15
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
16
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
17
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
18
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
19
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
20
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान

पाणीटंचाई निवारणार्थ पंधराव्या वित्त आयोगातून निधी द्या ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 04:23 IST

गोंदिया : जिल्ह्यातील ग्रामीण भागात उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच पाणीटंचाईची बिकट समस्या निर्माण झाली आहे. यावर त्वरित उपाययोजना करण्यासाठी निधी उपलब्ध ...

गोंदिया : जिल्ह्यातील ग्रामीण भागात उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच पाणीटंचाईची बिकट समस्या निर्माण झाली आहे. यावर त्वरित उपाययोजना करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात यावा. तसेच पाणीपुरवठा योजनेचे बिल थकीत असल्याने अनेक योजनांचा विद्युतपुरवठा खंडित आहे. यासाठी ग्रामपंचायतींना पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतून वीज बिल भरण्याची परवानगी देण्यात यावी, या आशयाचे पत्र खा. प्रफुल्ल पटेल यांच्या माध्यमातून पाणीपुरवठा राज्यमंत्री संजय बन्सोडे यांना देण्यात आले.

जिल्ह्यात अनेक प्रादेशिक पाणीपुरवठा योजना असून, यापैकी अनेक योजनांचे हस्तांतरण जिल्हा परिषदेकडे करण्यात आले नाही. त्यामुळे देखभाल-दुरुस्ती आणि थकीत वीज बिलामुळे अनेक पाणीपुरवठा योजना बंद आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात पाणीटंचाईची गंभीर समस्या आहे. जि.प. ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडे बहुतेक ठिकाणी नळ योजनांचे पाणी उचल करण्याच्या स्रोतात पाणीच उपलब्ध नाही. त्यामुळे अशा याेजनांचे सर्वेक्षण करून नवीन स्रोत उपलब्ध करून देण्यासाठी विशेष बाब म्हणून लागणारा निधी उपलब्ध करून देण्यात यावा. अनेक गावांत नळ योजना ग्रामपंचायतीच्या माध्यमातून चालविण्यात येतेे; पण वसूल करण्यात येणारी पाणीपट्टीची रक्कम फारच अल्प असल्याने ग्रामपंचायतीसमोर वीज बिल भरण्याचा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे ग्रामपंचायतींना शासनाने यासाठी मदत करण्याची गरज आहे. अर्जुनी मोरगाव तालुक्यात चार प्रादेशिक पाणीपुरवठा योजना कार्यान्वित आहेत. चारही योजना शिखर समितीच्या माध्यमातून सुरू आहेत. पाण्याचे स्रोत बळकट असल्याने तालुक्यातील ५० गावांना नियमित पाणीपुरवठा केला जातो; परंतु या योजनेचे बांधकाम १९९७ मध्ये झाले असल्याने या योजनेचे पुनरुज्जीवन करण्याची आवश्यकता आहे. वार्षिक पाणीपट्टीतून ही योजना चालविताना तूट निर्माण होत आहे. त्यामुळे शासनाने ही तूट भरण्यासाठी मदत करावी. आदी विविध मागण्यांचे खा. प्रफुल्ल पटेल यांचे पत्र माजी आ. राजेंद्र जैन, आ. मनोहर चंद्रिकापुरे, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य गंगाधर परशुरामकर, विनीत शहारे यांनी पाणीपुरवठा राज्यमंत्री संजय बनसोडे यांना दिले.

......

थकीत ५० टक्के अनुदान त्वरित द्या

जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी पाणीपुरवठा योजनेच्या वीज बिलाची रक्कम भरली आहे. यापैकी ५० टक्के अनुदान शासनाकडून ग्रामपंचायतींना दिले जाते; पण मागील चार वर्षांपासून हे अनुदान अद्यापही उपलब्ध करून देण्यात आले नाही. २०१७ पासून प्रलंबित असलेल्या अनुदानाची रक्कम त्वरित उपलब्ध करून दिल्यास अनेक पाणीपुरवठा योजना पुन्हा सुरळीत सुरू करण्यास मदत होईल.

गोंदिया शहरासाठी तीन कोटी रुपयांच्या निधीची गरज

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागांतर्गत गोंदिया शहराला पाणीपुरवठा करण्यात येतो. पाणीपुरवठा करणाऱ्या १८ लाख लिटर क्षमतेच्या दोन टाक्या जुन्या झाल्या आहेत. त्यामुळे नवीन टाकी बांधण्यासाठी दोन कोटी रुपये आणि जुने जलशुद्धीकरण केंद्र व पंपाची दुरुस्ती करण्यासाठी एक कोटी रुपये असा एकूण तीन कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात यावा. गोंदिया शहराच्या वाढीव भागात पाणीपुरवठा करण्यासाठी १५ ते २० किमी पाइपलाइन टाकण्यासाठी ४ कोटी, कुडवा व कटंगीकला या गावांमध्येे वाढीव वितरणासाठी पाणी टाकी बांधण्यासाठी जलजीवन मिशनअंतर्गत १० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात यावा. दोन पाणीपुरवठा योजनांना त्वरित मंजुरी द्या, नगर पंचायत सडक अर्जुनी व अर्जुनी मोरगाव येथील प्रस्तावित असलेल्या नवीन पाणीपुरवठा योजना तातडीने मंजूर करण्यात याव्यात, अशीही मागणी करण्यात आली आहे.