शहरं
Join us  
Trending Stories
1
पीएम मोदींच्या स्वागतास अख्खे मंत्रिमंडळच आले; भारत मालदीवला 'इतके' कर्ज देणार
2
आजचे राशीभविष्य २६ जुलै २०२५: 'या' ३ राशीच्या लोकांसाठी लाभाचा दिवस, अपूर्ण कामे पूर्ण होतील
3
कारगिल विजयदिन : वयाच्या विसाव्या वर्षी पती शहीद, आता मुलगाही देशसेवेसाठी झाला सज्ज
4
बापरे! १४,२९८ पुरुषांना ‘लाडकी बहीण’चा लाभ! डल्ला मारला कसा?
5
केवळ ‘आय लव्ह यू’ म्हणणे हा लैंगिक छळ नाही; छत्तीसगड उच्च न्यायालयाचा निकाल
6
राज्यात ८०० कोटींचा रुग्णवाहिका घोटाळा, निधी गेला श्रीकांत शिंदेंच्या ट्रस्टकडे : खा. राऊत 
7
डॉक्टरांनी रुग्णाला उंदीर अन् एटीएम समजून वागवले, डॉक्टरवरील गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार
8
महाराष्ट्रात ‘पीएम-किसान’ लाभार्थी संख्येत चौपट वाढ! शेतकऱ्यांच्या खात्यात किती
9
संपादकीय : करार ब्रिटनशी, संदेश अमेरिकेला: भारताच्या परराष्ट्र धोरणाची नवी दिशा!
10
माणिकराव कोकाटेंची गच्छंती की खातेबदल? पक्षात खल सुरू
11
निवडणूक आयोगाविरोधात विरोधक झाले आक्रमक; बॅनर्स फाडून थेट कचऱ्यात टाकले
12
अश्लील कंटेंट दाखविणाऱ्या उल्लू, देसिफ्लिक्ससह २५ ॲपवर बंदी
13
IND vs ENG 4th Test Day 3 Stumps: टीम इंडियानं ५ विकेट्स घेतल्या; पण अख्खा दिवस यजमानांनी गाजवला
14
आधी मोदींवर थेट हल्ला, आता गाठणार गुजरात, राहुल गांधींची मोठी खेळी, मोदी-भाजपाच्या अडचणी वाढणार?
15
Ben Stokes Retires Hurt : स्टोक्सनं पहिली फिफ्टी ठोकली अन् मग मैदान सोडायची वेळ आली, कारण...
16
अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेचा मुंबईकरांना भुर्दंड का?  मुंबई महानगरपालिकेवर उच्च न्यायालयाचे ताशेरे
17
विद्यार्थी म्हणाले, गुरुजी छप्पर कोसळतंय, पण शिक्षकांनी दरडावून बसवून ठेवले, शाळा दुर्घटनेत धक्कादायक माहिती समोर  
18
LOCजवळ भूसुरुंग स्फोट, अग्निवीराला वीरमरण, २ जवान जखमी, पहलगाम हल्ला करणाऱ्या संघटनेने स्वीकारली जबाबदारी 
19
ब्लॅकमेल करणाऱ्या प्रेयसीचा खून, मृतदेह दौलताबाद घाटात फेकून प्रियकर पोलिस ठाण्यात हजर
20
ना कोळसा, ना डिझेल, ना वीज, भारतातील पहिली हायड्रोजन ट्रेन या इंधनावर चालणार? चाचणी यशस्वी

पाणीटंचाई निवारणार्थ पंधराव्या वित्त आयोगातून निधी द्या ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 04:23 IST

गोंदिया : जिल्ह्यातील ग्रामीण भागात उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच पाणीटंचाईची बिकट समस्या निर्माण झाली आहे. यावर त्वरित उपाययोजना करण्यासाठी निधी उपलब्ध ...

गोंदिया : जिल्ह्यातील ग्रामीण भागात उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच पाणीटंचाईची बिकट समस्या निर्माण झाली आहे. यावर त्वरित उपाययोजना करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात यावा. तसेच पाणीपुरवठा योजनेचे बिल थकीत असल्याने अनेक योजनांचा विद्युतपुरवठा खंडित आहे. यासाठी ग्रामपंचायतींना पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतून वीज बिल भरण्याची परवानगी देण्यात यावी, या आशयाचे पत्र खा. प्रफुल्ल पटेल यांच्या माध्यमातून पाणीपुरवठा राज्यमंत्री संजय बन्सोडे यांना देण्यात आले.

जिल्ह्यात अनेक प्रादेशिक पाणीपुरवठा योजना असून, यापैकी अनेक योजनांचे हस्तांतरण जिल्हा परिषदेकडे करण्यात आले नाही. त्यामुळे देखभाल-दुरुस्ती आणि थकीत वीज बिलामुळे अनेक पाणीपुरवठा योजना बंद आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात पाणीटंचाईची गंभीर समस्या आहे. जि.प. ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडे बहुतेक ठिकाणी नळ योजनांचे पाणी उचल करण्याच्या स्रोतात पाणीच उपलब्ध नाही. त्यामुळे अशा याेजनांचे सर्वेक्षण करून नवीन स्रोत उपलब्ध करून देण्यासाठी विशेष बाब म्हणून लागणारा निधी उपलब्ध करून देण्यात यावा. अनेक गावांत नळ योजना ग्रामपंचायतीच्या माध्यमातून चालविण्यात येतेे; पण वसूल करण्यात येणारी पाणीपट्टीची रक्कम फारच अल्प असल्याने ग्रामपंचायतीसमोर वीज बिल भरण्याचा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे ग्रामपंचायतींना शासनाने यासाठी मदत करण्याची गरज आहे. अर्जुनी मोरगाव तालुक्यात चार प्रादेशिक पाणीपुरवठा योजना कार्यान्वित आहेत. चारही योजना शिखर समितीच्या माध्यमातून सुरू आहेत. पाण्याचे स्रोत बळकट असल्याने तालुक्यातील ५० गावांना नियमित पाणीपुरवठा केला जातो; परंतु या योजनेचे बांधकाम १९९७ मध्ये झाले असल्याने या योजनेचे पुनरुज्जीवन करण्याची आवश्यकता आहे. वार्षिक पाणीपट्टीतून ही योजना चालविताना तूट निर्माण होत आहे. त्यामुळे शासनाने ही तूट भरण्यासाठी मदत करावी. आदी विविध मागण्यांचे खा. प्रफुल्ल पटेल यांचे पत्र माजी आ. राजेंद्र जैन, आ. मनोहर चंद्रिकापुरे, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य गंगाधर परशुरामकर, विनीत शहारे यांनी पाणीपुरवठा राज्यमंत्री संजय बनसोडे यांना दिले.

......

थकीत ५० टक्के अनुदान त्वरित द्या

जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी पाणीपुरवठा योजनेच्या वीज बिलाची रक्कम भरली आहे. यापैकी ५० टक्के अनुदान शासनाकडून ग्रामपंचायतींना दिले जाते; पण मागील चार वर्षांपासून हे अनुदान अद्यापही उपलब्ध करून देण्यात आले नाही. २०१७ पासून प्रलंबित असलेल्या अनुदानाची रक्कम त्वरित उपलब्ध करून दिल्यास अनेक पाणीपुरवठा योजना पुन्हा सुरळीत सुरू करण्यास मदत होईल.

गोंदिया शहरासाठी तीन कोटी रुपयांच्या निधीची गरज

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागांतर्गत गोंदिया शहराला पाणीपुरवठा करण्यात येतो. पाणीपुरवठा करणाऱ्या १८ लाख लिटर क्षमतेच्या दोन टाक्या जुन्या झाल्या आहेत. त्यामुळे नवीन टाकी बांधण्यासाठी दोन कोटी रुपये आणि जुने जलशुद्धीकरण केंद्र व पंपाची दुरुस्ती करण्यासाठी एक कोटी रुपये असा एकूण तीन कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात यावा. गोंदिया शहराच्या वाढीव भागात पाणीपुरवठा करण्यासाठी १५ ते २० किमी पाइपलाइन टाकण्यासाठी ४ कोटी, कुडवा व कटंगीकला या गावांमध्येे वाढीव वितरणासाठी पाणी टाकी बांधण्यासाठी जलजीवन मिशनअंतर्गत १० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात यावा. दोन पाणीपुरवठा योजनांना त्वरित मंजुरी द्या, नगर पंचायत सडक अर्जुनी व अर्जुनी मोरगाव येथील प्रस्तावित असलेल्या नवीन पाणीपुरवठा योजना तातडीने मंजूर करण्यात याव्यात, अशीही मागणी करण्यात आली आहे.