शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

पाणीटंचाई निवारणार्थ पंधराव्या वित्त आयोगातून निधी द्या ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 04:23 IST

गोंदिया : जिल्ह्यातील ग्रामीण भागात उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच पाणीटंचाईची बिकट समस्या निर्माण झाली आहे. यावर त्वरित उपाययोजना करण्यासाठी निधी उपलब्ध ...

गोंदिया : जिल्ह्यातील ग्रामीण भागात उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच पाणीटंचाईची बिकट समस्या निर्माण झाली आहे. यावर त्वरित उपाययोजना करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात यावा. तसेच पाणीपुरवठा योजनेचे बिल थकीत असल्याने अनेक योजनांचा विद्युतपुरवठा खंडित आहे. यासाठी ग्रामपंचायतींना पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतून वीज बिल भरण्याची परवानगी देण्यात यावी, या आशयाचे पत्र खा. प्रफुल्ल पटेल यांच्या माध्यमातून पाणीपुरवठा राज्यमंत्री संजय बन्सोडे यांना देण्यात आले.

जिल्ह्यात अनेक प्रादेशिक पाणीपुरवठा योजना असून, यापैकी अनेक योजनांचे हस्तांतरण जिल्हा परिषदेकडे करण्यात आले नाही. त्यामुळे देखभाल-दुरुस्ती आणि थकीत वीज बिलामुळे अनेक पाणीपुरवठा योजना बंद आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात पाणीटंचाईची गंभीर समस्या आहे. जि.प. ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडे बहुतेक ठिकाणी नळ योजनांचे पाणी उचल करण्याच्या स्रोतात पाणीच उपलब्ध नाही. त्यामुळे अशा याेजनांचे सर्वेक्षण करून नवीन स्रोत उपलब्ध करून देण्यासाठी विशेष बाब म्हणून लागणारा निधी उपलब्ध करून देण्यात यावा. अनेक गावांत नळ योजना ग्रामपंचायतीच्या माध्यमातून चालविण्यात येतेे; पण वसूल करण्यात येणारी पाणीपट्टीची रक्कम फारच अल्प असल्याने ग्रामपंचायतीसमोर वीज बिल भरण्याचा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे ग्रामपंचायतींना शासनाने यासाठी मदत करण्याची गरज आहे. अर्जुनी मोरगाव तालुक्यात चार प्रादेशिक पाणीपुरवठा योजना कार्यान्वित आहेत. चारही योजना शिखर समितीच्या माध्यमातून सुरू आहेत. पाण्याचे स्रोत बळकट असल्याने तालुक्यातील ५० गावांना नियमित पाणीपुरवठा केला जातो; परंतु या योजनेचे बांधकाम १९९७ मध्ये झाले असल्याने या योजनेचे पुनरुज्जीवन करण्याची आवश्यकता आहे. वार्षिक पाणीपट्टीतून ही योजना चालविताना तूट निर्माण होत आहे. त्यामुळे शासनाने ही तूट भरण्यासाठी मदत करावी. आदी विविध मागण्यांचे खा. प्रफुल्ल पटेल यांचे पत्र माजी आ. राजेंद्र जैन, आ. मनोहर चंद्रिकापुरे, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य गंगाधर परशुरामकर, विनीत शहारे यांनी पाणीपुरवठा राज्यमंत्री संजय बनसोडे यांना दिले.

......

थकीत ५० टक्के अनुदान त्वरित द्या

जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी पाणीपुरवठा योजनेच्या वीज बिलाची रक्कम भरली आहे. यापैकी ५० टक्के अनुदान शासनाकडून ग्रामपंचायतींना दिले जाते; पण मागील चार वर्षांपासून हे अनुदान अद्यापही उपलब्ध करून देण्यात आले नाही. २०१७ पासून प्रलंबित असलेल्या अनुदानाची रक्कम त्वरित उपलब्ध करून दिल्यास अनेक पाणीपुरवठा योजना पुन्हा सुरळीत सुरू करण्यास मदत होईल.

गोंदिया शहरासाठी तीन कोटी रुपयांच्या निधीची गरज

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागांतर्गत गोंदिया शहराला पाणीपुरवठा करण्यात येतो. पाणीपुरवठा करणाऱ्या १८ लाख लिटर क्षमतेच्या दोन टाक्या जुन्या झाल्या आहेत. त्यामुळे नवीन टाकी बांधण्यासाठी दोन कोटी रुपये आणि जुने जलशुद्धीकरण केंद्र व पंपाची दुरुस्ती करण्यासाठी एक कोटी रुपये असा एकूण तीन कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात यावा. गोंदिया शहराच्या वाढीव भागात पाणीपुरवठा करण्यासाठी १५ ते २० किमी पाइपलाइन टाकण्यासाठी ४ कोटी, कुडवा व कटंगीकला या गावांमध्येे वाढीव वितरणासाठी पाणी टाकी बांधण्यासाठी जलजीवन मिशनअंतर्गत १० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात यावा. दोन पाणीपुरवठा योजनांना त्वरित मंजुरी द्या, नगर पंचायत सडक अर्जुनी व अर्जुनी मोरगाव येथील प्रस्तावित असलेल्या नवीन पाणीपुरवठा योजना तातडीने मंजूर करण्यात याव्यात, अशीही मागणी करण्यात आली आहे.