शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

जनतेला मूलभूत सुविधा द्या ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:38 IST

आमगाव : आमगाव नगर परिषद स्थापनेपासून सहा वर्षे लोटूनही शासन - प्रशासनाने नागरिक सुविधा विकासासाठी पाठ फिरविल्याने नागरिकांना विकासापासून ...

आमगाव : आमगाव नगर परिषद स्थापनेपासून सहा वर्षे लोटूनही शासन - प्रशासनाने नागरिक सुविधा विकासासाठी पाठ फिरविल्याने नागरिकांना विकासापासून वंचित राहावे लागत आहे. त्यामुळे हा प्रश्न मार्गी लावण्यात यावा, या मागणीचे निवेदन प्रशासकामार्फत राज्य शासनाला आमगाव नगर परिषद संघर्ष समितीने दिले.

आमगाव नगर परिषदेची स्थापना

नागरिक मागणीला पुढे करून शासनाने राज्यातील अनेक तालुका ठिकाणी नगर पंचायत तर काही ठिकाणी नगर परिषदेची स्थापना करून विकासाला गती दिली. आमगाव नगर परिषदेची स्थापनाही शासनाने आठ गावांना समायोजित करून केली. परंतु राजकारण्यांच्या श्रेय लाटण्याच्या नादात हा प्रश्न प्रलंबित आहे. काही व्यक्तींनी नगर परिषद नको म्हणून सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. तर राज्य शासनाने विकासाच्या दृष्टीने नगर परिषद व्हावी यासाठी न्यायालयात बाजू मांडली आहे. शासन व काही राजकीय व्यक्तींमुळे सलग सहा वर्षे आमगाववासीयांना विकासापासून वंचित राहावे लागत आहे. शासनाच्या योजनांचा लाभ देण्यात यावा यासाठी नागरिकांच्या पुढाकाराने संघर्ष समिती स्थापन करून आठ गावांमध्ये नागरिकांच्या पुढाकाराने हक्कासाठी संघर्ष सुरू केला आहे. आमगाव नगर परिषद क्षेत्रातील विकासकामे करावीत यासाठी नगर परिषद संघर्ष समितीने प्रशासकामार्फत शासनाला निवेदन दिले. शिष्टमंडळात संघर्ष समितीचे यशवंत मानकर, रवी क्षीरसागर, प्रा. सुभाष आकरे, उत्तम नंदेश्वर, शंभूप्रसाद अग्रीका, राजकुमार फुंडे, राजकुमार श्यामकुवर, भोला गुप्ता, पिंटू अग्रवाल, कमलबापू बहेकार, गजानन भांडारकर, रमण डेकाटे, संतोष श्रीखंडे, प्रभादेवी उपराडे, डॉ. सुनंदा नागपुरे, जयश्री पुंडकर व नगर परिषद परिक्षेत्रातील आठ गावांतील सदस्यांचा समावेश होता.

....

या आहेत प्रमुख मागण्या

न्यायालयात दाखल याचिकेचा निर्णय त्वरित घेण्यात यावा, घरकूल योजना, निवासी पट्टे, शौचालय योजना, रोजगार हमी योजनेची कामे, वाढीव पाणीपुरवठा, रस्ते नाल्यांचे बांधकाम व दुरुस्ती, नगरोत्थान विशेष निधी, दलित वस्ती योजना, स्वच्छता याकरिता प्रस्ताव निधी व मंजुरी देण्यात यावी. त्याचप्रमाणे शासन योजनेतील मंजूर कामे तत्काळ कार्यारंभ आदेश देण्यात यावे, आठ कोटी मंजूर निधीची कामे तत्काळ सुरू करावी अशा विविध मागण्यांचे निवेदन प्रशासक दयाराम भोयर यांना देण्यात आले.

......