शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या जाहीरनाम्यातच घोषणा, ३० जून २०२६ पूर्वी शेतकऱ्यांची केली जाणार कर्जमाफी: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
2
आजचे राशीभविष्य - ३१ ऑक्टोबर २०२५; विवाहेच्छुकांचे विवाह जुळतील, मित्रांकडून भेटवस्तू मिळतील
3
मुंबईत ऑडिशनच्या नावे १७ मुलांसह २० जणांना ठेवले ओलिस; अपहरणकर्त्याचे एन्काऊंटर करत सर्वांची नाट्यमयरीत्या सुटका
4
दोन नोटिशींना प्रतिसाद नाही; उद्धव ठाकरे यांना आयोगाची कारणे दाखवा नोटीस
5
'गोंधळ कायम ठेवून निवडणुका म्हणजे मॅच फिक्सिंग'; राज ठाकरे यांचा आरोप, ईव्हीएम सेटिंगचे प्रात्यक्षिक
6
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
7
ऑडिशनमध्ये निवड झालेली मुले ग्रामीण भागातील; खिडकीतून आत जाऊन फिल्मी स्टाइलने सुटका
8
तिसरीपासून 'एआय' शिकणार मुलं; पुढील वर्षांपासून अंमलबजावणी, एक कोटी शिक्षकांना प्रशिक्षण
9
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
10
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
11
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
12
क्रिकेटच्या देवाकडून जेमी-हरमनप्रीतला शाब्बासकी! ऐतिहासिक विजय युवी, एबी आणि गंभीरलाही भावला
13
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
14
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
15
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
16
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
17
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
18
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
19
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
20
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम

समृद्ध महाराष्ट्र ‘जनकल्याण’ फसले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2018 00:32 IST

महाराष्ट्र सरकारतर्फे महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण योजना राबविण्यात येत आहे. मात्र या योजनेचे केवळ २६ टक्के कामे झाल्याने समृद्ध महाराष्ट्रात ‘जनकल्याण’ फसल्याचे चित्र आहे.

ठळक मुद्देकेवळ २६ टक्के कामे : अमृत कुंड, शेततळी, वृक्षारोपणाचा अभाव

नरेश रहिले ।ऑनलाईन लोकमतगोंदिया : महाराष्ट्र सरकारतर्फे महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण योजना राबविण्यात येत आहे. मात्र या योजनेचे केवळ २६ टक्के कामे झाल्याने समृद्ध महाराष्ट्रात ‘जनकल्याण’ फसल्याचे चित्र आहे.राजस्थान व मध्यप्रदेश सरकारच्या धर्तीवर महाराष्ट्रात ‘समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण योजना’ सुरू करण्याचा निर्णय आॅक्टोबर २०१६ मध्ये राज्य सरकारने घेतला. या योजनेतून अहिल्यादेवी सिंचन विहिरी, अमृत कुंड शेततळी, भूसंजीवनी वर्मी कंपोस्टिंग, भूसंजीवनी नाडेप कंपोस्टिंग, कल्पवृक्ष फळबाग, निर्मल शौचालय, निर्मल शोषखड्डे, समृद्ध गाव, तलाव व जल संरक्षणाहस ११ सूत्री कामांना पूर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनी योजनेची घोषणा केली. यासाठी १० कोटी रूपयांचा निधीची तरतूद केली होती. या योजनेच्या माध्यमातून ग्रामीण महाराष्ट्राचा चेहरा बदलविणे, शेतकऱ्यांचे उत्पादन दुप्पट वाढविणे हा उद्देश होता.या योजनेंतर्गत निर्मल व स्वच्छ बनवायचे होते. सरकारतर्फे ग्रामीण भागाची स्थिती सुधारण्यासाठी ग्राम पंचायत स्तरावर ही योजना सुरू करण्यात आली. योजनेंर्गत होणाऱ्या कामांसाठी गोंदिया जिल्ह्यातील ५५३ ग्रामपंचयातींनी ग्रामसभेचे आयोजन केले होते. ११ सूत्री कामांसाठी ७५ हजार ८७१ अर्ज आले होते. यातील ७१ हजार ४८० अर्जांना प्रशासकीय व तांत्रिक मान्यता प्रदान करण्यात आली. यातील १९ हजार ७७७ कामे सुरू आहेत. तर १२ हजार ३३ कामी पूर्ण झाले आहेत. जिल्ह्यात सर्वाधिक काम समृद्ध गाव तलावांचे झाले आहेत. ४६१ लोकांकडून शेततळ्यासाठी अर्ज करण्यात आले होते. परंतु ४४५ मंजुरी मिळाली आहे. २५० कामे सुरू असून १३१ कामे (५४.२३ टक्के) पूर्ण झाले आहेत.जिल्ह्यात एकही अमृत कुंड शेततळी नाही‘समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण योजना’ च्या ११ सुत्री कामांमध्ये अमृत कुंड शेततळीसाठी २६ अर्ज आले होते. यातील ४ अर्ज मंजूर करण्यात आले. परंतु यातील एकही काम करण्यात आले नाही. नंदनवन वृक्षारोपण योजनेसाठी १०८ अर्ज मंजूर करुनही एकही काम पूर्ण झाले नाही. १०४ कामे सुरू आहेत. अहिल्यादेवी सिंचन विहिरींसाठी ६९२ अर्ज आले होते. ५९६ अर्जाला प्रशासकीय व तांत्रीक मंजुरी देण्यात आली. ३४० कामे सुरू आहेत. १११ विहिरी तयार झाल्या आहेत. भूसंजीवनी कर्मी कंपोस्टिंगच्या२७९ पैकी १०८ कामे सुरू आहेत.१११ कामे पूर्ण झाले आहेत. भूसंजीवनी नापेड कंपोस्टिंगचे २५१ पैकी ३६ काम सुरू आहेत. तर ३० कामे पूर्ण झाले आहेत. समृद्ध गाव योजनेसाठी ५ हजार ४६६ अर्ज आले होते. ४ हजार ७०४ अर्जांना प्रशासकीय व तांत्रीक मान्यता मिळाली. ९९१ कामे पूर्ण झाले. तर १७५१ कामे सुरू आहेत.निर्मल शोषखड्ड्यांचे २३.८० टक्के कामया योजनेंतर्गत निर्मल शोषखड्ड्यांसाठी ३८ हजार ८९ अर्ज आले होते. यातील ३६ हजार ७ अर्जांना प्रशासकीय व तांत्रिक मंजुरी देण्यात आली. यातील ९ हजार ६५ शोषखड्यांचे काम सुरू आहेत. तर ६ हजार ५४० (२३.८० टक्के ) शोषखड्ड्यांचे काम पूर्ण झाले आहेत. निर्मल शौचालयाचे ३० हजार ३६५ अर्ज आले होते. यातील २९ हजार ८६ शौचालयांना प्रशासकीय व तांत्रिक मंजुरी देण्यात आली. ८ हजार १२३ शौचालयाचे काम सुरू आहेत.तर ४ हजार ११९ (२६.७५ टक्के ) काम पूर्ण झाले आहेत.