शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
5
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
6
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
7
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
8
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
9
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
10
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
11
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
12
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
13
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
14
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
15
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
16
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
17
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
18
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
19
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
20
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
Daily Top 2Weekly Top 5

समृद्ध महाराष्ट्र ‘जनकल्याण’ फसले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2018 00:32 IST

महाराष्ट्र सरकारतर्फे महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण योजना राबविण्यात येत आहे. मात्र या योजनेचे केवळ २६ टक्के कामे झाल्याने समृद्ध महाराष्ट्रात ‘जनकल्याण’ फसल्याचे चित्र आहे.

ठळक मुद्देकेवळ २६ टक्के कामे : अमृत कुंड, शेततळी, वृक्षारोपणाचा अभाव

नरेश रहिले ।ऑनलाईन लोकमतगोंदिया : महाराष्ट्र सरकारतर्फे महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण योजना राबविण्यात येत आहे. मात्र या योजनेचे केवळ २६ टक्के कामे झाल्याने समृद्ध महाराष्ट्रात ‘जनकल्याण’ फसल्याचे चित्र आहे.राजस्थान व मध्यप्रदेश सरकारच्या धर्तीवर महाराष्ट्रात ‘समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण योजना’ सुरू करण्याचा निर्णय आॅक्टोबर २०१६ मध्ये राज्य सरकारने घेतला. या योजनेतून अहिल्यादेवी सिंचन विहिरी, अमृत कुंड शेततळी, भूसंजीवनी वर्मी कंपोस्टिंग, भूसंजीवनी नाडेप कंपोस्टिंग, कल्पवृक्ष फळबाग, निर्मल शौचालय, निर्मल शोषखड्डे, समृद्ध गाव, तलाव व जल संरक्षणाहस ११ सूत्री कामांना पूर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनी योजनेची घोषणा केली. यासाठी १० कोटी रूपयांचा निधीची तरतूद केली होती. या योजनेच्या माध्यमातून ग्रामीण महाराष्ट्राचा चेहरा बदलविणे, शेतकऱ्यांचे उत्पादन दुप्पट वाढविणे हा उद्देश होता.या योजनेंतर्गत निर्मल व स्वच्छ बनवायचे होते. सरकारतर्फे ग्रामीण भागाची स्थिती सुधारण्यासाठी ग्राम पंचायत स्तरावर ही योजना सुरू करण्यात आली. योजनेंर्गत होणाऱ्या कामांसाठी गोंदिया जिल्ह्यातील ५५३ ग्रामपंचयातींनी ग्रामसभेचे आयोजन केले होते. ११ सूत्री कामांसाठी ७५ हजार ८७१ अर्ज आले होते. यातील ७१ हजार ४८० अर्जांना प्रशासकीय व तांत्रिक मान्यता प्रदान करण्यात आली. यातील १९ हजार ७७७ कामे सुरू आहेत. तर १२ हजार ३३ कामी पूर्ण झाले आहेत. जिल्ह्यात सर्वाधिक काम समृद्ध गाव तलावांचे झाले आहेत. ४६१ लोकांकडून शेततळ्यासाठी अर्ज करण्यात आले होते. परंतु ४४५ मंजुरी मिळाली आहे. २५० कामे सुरू असून १३१ कामे (५४.२३ टक्के) पूर्ण झाले आहेत.जिल्ह्यात एकही अमृत कुंड शेततळी नाही‘समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण योजना’ च्या ११ सुत्री कामांमध्ये अमृत कुंड शेततळीसाठी २६ अर्ज आले होते. यातील ४ अर्ज मंजूर करण्यात आले. परंतु यातील एकही काम करण्यात आले नाही. नंदनवन वृक्षारोपण योजनेसाठी १०८ अर्ज मंजूर करुनही एकही काम पूर्ण झाले नाही. १०४ कामे सुरू आहेत. अहिल्यादेवी सिंचन विहिरींसाठी ६९२ अर्ज आले होते. ५९६ अर्जाला प्रशासकीय व तांत्रीक मंजुरी देण्यात आली. ३४० कामे सुरू आहेत. १११ विहिरी तयार झाल्या आहेत. भूसंजीवनी कर्मी कंपोस्टिंगच्या२७९ पैकी १०८ कामे सुरू आहेत.१११ कामे पूर्ण झाले आहेत. भूसंजीवनी नापेड कंपोस्टिंगचे २५१ पैकी ३६ काम सुरू आहेत. तर ३० कामे पूर्ण झाले आहेत. समृद्ध गाव योजनेसाठी ५ हजार ४६६ अर्ज आले होते. ४ हजार ७०४ अर्जांना प्रशासकीय व तांत्रीक मान्यता मिळाली. ९९१ कामे पूर्ण झाले. तर १७५१ कामे सुरू आहेत.निर्मल शोषखड्ड्यांचे २३.८० टक्के कामया योजनेंतर्गत निर्मल शोषखड्ड्यांसाठी ३८ हजार ८९ अर्ज आले होते. यातील ३६ हजार ७ अर्जांना प्रशासकीय व तांत्रिक मंजुरी देण्यात आली. यातील ९ हजार ६५ शोषखड्यांचे काम सुरू आहेत. तर ६ हजार ५४० (२३.८० टक्के ) शोषखड्ड्यांचे काम पूर्ण झाले आहेत. निर्मल शौचालयाचे ३० हजार ३६५ अर्ज आले होते. यातील २९ हजार ८६ शौचालयांना प्रशासकीय व तांत्रिक मंजुरी देण्यात आली. ८ हजार १२३ शौचालयाचे काम सुरू आहेत.तर ४ हजार ११९ (२६.७५ टक्के ) काम पूर्ण झाले आहेत.