शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

२९० तलावांत होणार मासोळ्यांचे संवर्धन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2017 00:08 IST

ग्रामीण भागातील लोकांना रोजगार मिळावा यासाठी महाराष्टÑ शासनाने यावर्षीपासून तलाव तेथे मासोळी अभियान राबविण्याचा निर्णय घेतला आहे.

ठळक मुद्देतलाव तेथे मासोळी अभियान : पाण्याअभावी नियोजित २२६ तलाव मासोळ्यांविना

नरेश रहिले।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : ग्रामीण भागातील लोकांना रोजगार मिळावा यासाठी महाराष्टÑ शासनाने यावर्षीपासून तलाव तेथे मासोळी अभियान राबविण्याचा निर्णय घेतला आहे. सन २०१७-१८ या वर्षासाठी जिल्ह्यातील ५१६ तलावांची निवड करण्यात आली होती. यातील २९० तलावांमध्ये मासे टाकण्यात आले. तर २२६ तलावांत पाण्याचा ठणठणाट असल्याने मासोळ्यांचे उत्पादन या तलावात यंदा घेता येणार नाही.गोंदिया तलावांचा जिल्हा म्हणून प्रसिध्द आहे. मालगुजारी तलावांसह मोठ्या प्रमाणात तलावांची संख्या असल्याने या तलावांमध्ये मासेमारीचा व्यवसाय चांगला होऊ शकतो. याच दृष्टीने शासनाने तलाव तेथे मासोळी अभियान राबविण्याचे ठरविले. यासाठी जिल्हा परिषदेने गोंदिया जिल्ह्यातील ५१६ तलाव मासोळी उत्पादनासाठी निवडले होते. परंतु यंदा पावसाअभावी अनेक तलावांमध्ये पाण्याचा ठणठणाट असल्यामुळे २२६ तलावांमध्ये मासोळी संवर्धन करता येणार नाही. अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील ५५ तलावांची निवड करण्यात आली होती. त्यापैकी ५ तलावांमध्ये ११३.५ लाख जिरे टाकण्यात आले आहेत. देवरी तालुक्यातील ४९ तलावांची निवड करण्यात आली होती. त्यापैकी १४ तलावात २९० किलो बोटूकली तर ४ तलावांमध्ये ३ लाख जिरे टाकण्यात आले. आमगाव तालुक्यातील २४ तलावांची निवड करण्यात आली होती. त्यापैकी ४ तलावात ६५ किलो बोटूकली तर ११ तलावांमध्ये ६५ लाख जिरे टाकण्यात आले. गोंदिया तालुक्यातील ९५ तलावांची निवड करण्यात आली होती. त्यापैकी ६८ तलावात ३२१ किलो बोटूकली तर ५३ तलावांमध्ये १३० लाख जिरे टाकण्यात आले. सालेकसा तालुक्यातील ७४ तलावांची निवड करण्यात आली होती. त्यापैकी ४९ तलावात ७११ किलो बोटूकली तर ४ तलावांमध्ये १४ लाख जिरे टाकण्यात आले. सडक-अर्जुनी तालुक्यातील ७८ तलावांची निवड करण्यात आली होती. त्यापैकी २१ तलावात २३० किलो बोटूकली तर ९ तलावांमध्ये ३० लाख जिरे टाकण्यात आले. तिरोडा तालुक्यातील ६६ तलावांची निवड करण्यात आली होती. त्यापैकी ५ तलावात १३० किलो बोटूकली तर ९ तलावांमध्ये ५५ लाख जिरे टाकण्यात आले. गोरेगाव तालुक्यातील ७५ तलावांची निवड करण्यात आली होती. त्यापैकी २३ तलावात ३१४ किलो बोटूकली तर ११ तलावांमध्ये ७४ लाख जिरे टाकण्यात आले. गोंदिया जिल्ह्यातील ५१६ तलावांची निवड करण्यात आली होती. त्यापैकी १८४ तलावात २०६१ किलो बोटूकली तर १०६ तलावांमध्ये ४८४.५ लाख जिरे टाकण्यात आले आहेत.८५३५ क्विंटल मासोळ्यांचे उत्पादनजिल्ह्यातील २९० तलावांमध्ये मासोळ्यांचे संवर्धन होत असल्यामुळे या तलावातून ८ हजार ५३५ क्विंटल मासोळ्यांचे उत्पादन होणार असल्याचा अंदाज जिल्हा परिषदेने वर्तविला आहे. गाव तेथे मासोळी अभियानाला गोंदिया जिल्ह्यात यशस्वी करण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी रवींद्र ठाकरे, जि.प. अध्यक्ष उषाताई मेंढे, उपमुख्य कार्यपालन अधिकारी (पंचायत) राजेश बागडे व इतर अधिकारी कामाला लागले आहेत.गोंदिया जिल्हा तलावांचा जिल्हा असल्यामुळे या जिल्ह्यात मत्स्य व्यवसायाला वाव आहे. मालगुजारी तलावांमध्ये सहजरीत्या मोठ्या प्रमाणात मासोळ्यांचे उत्पादन घेतले जावू शकते. यासाठी शासनाचे तलाव तेथे मासोळी अभियान जिल्ह्यात यशस्वी होणार आहे. यंदा दुष्काळामुळे संपूर्ण तलावात मासोळ्यांचे उत्पादन घेतले जात नसले तरी २९० तलावांमध्ये मासोळ्यांचे संवर्धन केले जाणार आहे.रवींद्र ठाकरेमुख्य कार्यपालन अधिकारीजि.प.गोंदिया