शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
2
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
3
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
4
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
5
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
6
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
7
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
8
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
9
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
10
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
11
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
12
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
13
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
14
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
15
"मी आता फोन वापरणार नाही"; लेकीला मोबाईलपासून दूर करण्यासाठी पालकांचा जबरदस्त जुगाड
16
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
17
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
18
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
19
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
20
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?

२९० तलावांत होणार मासोळ्यांचे संवर्धन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2017 00:08 IST

ग्रामीण भागातील लोकांना रोजगार मिळावा यासाठी महाराष्टÑ शासनाने यावर्षीपासून तलाव तेथे मासोळी अभियान राबविण्याचा निर्णय घेतला आहे.

ठळक मुद्देतलाव तेथे मासोळी अभियान : पाण्याअभावी नियोजित २२६ तलाव मासोळ्यांविना

नरेश रहिले।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : ग्रामीण भागातील लोकांना रोजगार मिळावा यासाठी महाराष्टÑ शासनाने यावर्षीपासून तलाव तेथे मासोळी अभियान राबविण्याचा निर्णय घेतला आहे. सन २०१७-१८ या वर्षासाठी जिल्ह्यातील ५१६ तलावांची निवड करण्यात आली होती. यातील २९० तलावांमध्ये मासे टाकण्यात आले. तर २२६ तलावांत पाण्याचा ठणठणाट असल्याने मासोळ्यांचे उत्पादन या तलावात यंदा घेता येणार नाही.गोंदिया तलावांचा जिल्हा म्हणून प्रसिध्द आहे. मालगुजारी तलावांसह मोठ्या प्रमाणात तलावांची संख्या असल्याने या तलावांमध्ये मासेमारीचा व्यवसाय चांगला होऊ शकतो. याच दृष्टीने शासनाने तलाव तेथे मासोळी अभियान राबविण्याचे ठरविले. यासाठी जिल्हा परिषदेने गोंदिया जिल्ह्यातील ५१६ तलाव मासोळी उत्पादनासाठी निवडले होते. परंतु यंदा पावसाअभावी अनेक तलावांमध्ये पाण्याचा ठणठणाट असल्यामुळे २२६ तलावांमध्ये मासोळी संवर्धन करता येणार नाही. अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील ५५ तलावांची निवड करण्यात आली होती. त्यापैकी ५ तलावांमध्ये ११३.५ लाख जिरे टाकण्यात आले आहेत. देवरी तालुक्यातील ४९ तलावांची निवड करण्यात आली होती. त्यापैकी १४ तलावात २९० किलो बोटूकली तर ४ तलावांमध्ये ३ लाख जिरे टाकण्यात आले. आमगाव तालुक्यातील २४ तलावांची निवड करण्यात आली होती. त्यापैकी ४ तलावात ६५ किलो बोटूकली तर ११ तलावांमध्ये ६५ लाख जिरे टाकण्यात आले. गोंदिया तालुक्यातील ९५ तलावांची निवड करण्यात आली होती. त्यापैकी ६८ तलावात ३२१ किलो बोटूकली तर ५३ तलावांमध्ये १३० लाख जिरे टाकण्यात आले. सालेकसा तालुक्यातील ७४ तलावांची निवड करण्यात आली होती. त्यापैकी ४९ तलावात ७११ किलो बोटूकली तर ४ तलावांमध्ये १४ लाख जिरे टाकण्यात आले. सडक-अर्जुनी तालुक्यातील ७८ तलावांची निवड करण्यात आली होती. त्यापैकी २१ तलावात २३० किलो बोटूकली तर ९ तलावांमध्ये ३० लाख जिरे टाकण्यात आले. तिरोडा तालुक्यातील ६६ तलावांची निवड करण्यात आली होती. त्यापैकी ५ तलावात १३० किलो बोटूकली तर ९ तलावांमध्ये ५५ लाख जिरे टाकण्यात आले. गोरेगाव तालुक्यातील ७५ तलावांची निवड करण्यात आली होती. त्यापैकी २३ तलावात ३१४ किलो बोटूकली तर ११ तलावांमध्ये ७४ लाख जिरे टाकण्यात आले. गोंदिया जिल्ह्यातील ५१६ तलावांची निवड करण्यात आली होती. त्यापैकी १८४ तलावात २०६१ किलो बोटूकली तर १०६ तलावांमध्ये ४८४.५ लाख जिरे टाकण्यात आले आहेत.८५३५ क्विंटल मासोळ्यांचे उत्पादनजिल्ह्यातील २९० तलावांमध्ये मासोळ्यांचे संवर्धन होत असल्यामुळे या तलावातून ८ हजार ५३५ क्विंटल मासोळ्यांचे उत्पादन होणार असल्याचा अंदाज जिल्हा परिषदेने वर्तविला आहे. गाव तेथे मासोळी अभियानाला गोंदिया जिल्ह्यात यशस्वी करण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी रवींद्र ठाकरे, जि.प. अध्यक्ष उषाताई मेंढे, उपमुख्य कार्यपालन अधिकारी (पंचायत) राजेश बागडे व इतर अधिकारी कामाला लागले आहेत.गोंदिया जिल्हा तलावांचा जिल्हा असल्यामुळे या जिल्ह्यात मत्स्य व्यवसायाला वाव आहे. मालगुजारी तलावांमध्ये सहजरीत्या मोठ्या प्रमाणात मासोळ्यांचे उत्पादन घेतले जावू शकते. यासाठी शासनाचे तलाव तेथे मासोळी अभियान जिल्ह्यात यशस्वी होणार आहे. यंदा दुष्काळामुळे संपूर्ण तलावात मासोळ्यांचे उत्पादन घेतले जात नसले तरी २९० तलावांमध्ये मासोळ्यांचे संवर्धन केले जाणार आहे.रवींद्र ठाकरेमुख्य कार्यपालन अधिकारीजि.प.गोंदिया