शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

२९० तलावांत होणार मासोळ्यांचे संवर्धन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2017 00:08 IST

ग्रामीण भागातील लोकांना रोजगार मिळावा यासाठी महाराष्टÑ शासनाने यावर्षीपासून तलाव तेथे मासोळी अभियान राबविण्याचा निर्णय घेतला आहे.

ठळक मुद्देतलाव तेथे मासोळी अभियान : पाण्याअभावी नियोजित २२६ तलाव मासोळ्यांविना

नरेश रहिले।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : ग्रामीण भागातील लोकांना रोजगार मिळावा यासाठी महाराष्टÑ शासनाने यावर्षीपासून तलाव तेथे मासोळी अभियान राबविण्याचा निर्णय घेतला आहे. सन २०१७-१८ या वर्षासाठी जिल्ह्यातील ५१६ तलावांची निवड करण्यात आली होती. यातील २९० तलावांमध्ये मासे टाकण्यात आले. तर २२६ तलावांत पाण्याचा ठणठणाट असल्याने मासोळ्यांचे उत्पादन या तलावात यंदा घेता येणार नाही.गोंदिया तलावांचा जिल्हा म्हणून प्रसिध्द आहे. मालगुजारी तलावांसह मोठ्या प्रमाणात तलावांची संख्या असल्याने या तलावांमध्ये मासेमारीचा व्यवसाय चांगला होऊ शकतो. याच दृष्टीने शासनाने तलाव तेथे मासोळी अभियान राबविण्याचे ठरविले. यासाठी जिल्हा परिषदेने गोंदिया जिल्ह्यातील ५१६ तलाव मासोळी उत्पादनासाठी निवडले होते. परंतु यंदा पावसाअभावी अनेक तलावांमध्ये पाण्याचा ठणठणाट असल्यामुळे २२६ तलावांमध्ये मासोळी संवर्धन करता येणार नाही. अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील ५५ तलावांची निवड करण्यात आली होती. त्यापैकी ५ तलावांमध्ये ११३.५ लाख जिरे टाकण्यात आले आहेत. देवरी तालुक्यातील ४९ तलावांची निवड करण्यात आली होती. त्यापैकी १४ तलावात २९० किलो बोटूकली तर ४ तलावांमध्ये ३ लाख जिरे टाकण्यात आले. आमगाव तालुक्यातील २४ तलावांची निवड करण्यात आली होती. त्यापैकी ४ तलावात ६५ किलो बोटूकली तर ११ तलावांमध्ये ६५ लाख जिरे टाकण्यात आले. गोंदिया तालुक्यातील ९५ तलावांची निवड करण्यात आली होती. त्यापैकी ६८ तलावात ३२१ किलो बोटूकली तर ५३ तलावांमध्ये १३० लाख जिरे टाकण्यात आले. सालेकसा तालुक्यातील ७४ तलावांची निवड करण्यात आली होती. त्यापैकी ४९ तलावात ७११ किलो बोटूकली तर ४ तलावांमध्ये १४ लाख जिरे टाकण्यात आले. सडक-अर्जुनी तालुक्यातील ७८ तलावांची निवड करण्यात आली होती. त्यापैकी २१ तलावात २३० किलो बोटूकली तर ९ तलावांमध्ये ३० लाख जिरे टाकण्यात आले. तिरोडा तालुक्यातील ६६ तलावांची निवड करण्यात आली होती. त्यापैकी ५ तलावात १३० किलो बोटूकली तर ९ तलावांमध्ये ५५ लाख जिरे टाकण्यात आले. गोरेगाव तालुक्यातील ७५ तलावांची निवड करण्यात आली होती. त्यापैकी २३ तलावात ३१४ किलो बोटूकली तर ११ तलावांमध्ये ७४ लाख जिरे टाकण्यात आले. गोंदिया जिल्ह्यातील ५१६ तलावांची निवड करण्यात आली होती. त्यापैकी १८४ तलावात २०६१ किलो बोटूकली तर १०६ तलावांमध्ये ४८४.५ लाख जिरे टाकण्यात आले आहेत.८५३५ क्विंटल मासोळ्यांचे उत्पादनजिल्ह्यातील २९० तलावांमध्ये मासोळ्यांचे संवर्धन होत असल्यामुळे या तलावातून ८ हजार ५३५ क्विंटल मासोळ्यांचे उत्पादन होणार असल्याचा अंदाज जिल्हा परिषदेने वर्तविला आहे. गाव तेथे मासोळी अभियानाला गोंदिया जिल्ह्यात यशस्वी करण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी रवींद्र ठाकरे, जि.प. अध्यक्ष उषाताई मेंढे, उपमुख्य कार्यपालन अधिकारी (पंचायत) राजेश बागडे व इतर अधिकारी कामाला लागले आहेत.गोंदिया जिल्हा तलावांचा जिल्हा असल्यामुळे या जिल्ह्यात मत्स्य व्यवसायाला वाव आहे. मालगुजारी तलावांमध्ये सहजरीत्या मोठ्या प्रमाणात मासोळ्यांचे उत्पादन घेतले जावू शकते. यासाठी शासनाचे तलाव तेथे मासोळी अभियान जिल्ह्यात यशस्वी होणार आहे. यंदा दुष्काळामुळे संपूर्ण तलावात मासोळ्यांचे उत्पादन घेतले जात नसले तरी २९० तलावांमध्ये मासोळ्यांचे संवर्धन केले जाणार आहे.रवींद्र ठाकरेमुख्य कार्यपालन अधिकारीजि.प.गोंदिया