शहरं
Join us  
Trending Stories
1
आषाढी एकादशी सोहळा; मुख्यमंत्र्यांची शासकीय महापूजा; नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
2
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
3
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...
4
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
5
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
6
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
7
IND VS ENG : ऋषभ पंतनं केला षटकारांचा महाविक्रम, बेन स्टोक्स-मॅथ्यू हेडनलाही टाकलं मागे
8
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
9
Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO)
10
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
11
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट
12
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
13
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
14
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
15
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
16
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
17
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
18
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
19
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!
20
PHOTOS: जसप्रीत बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...

जिल्ह्यातील प्रकल्प आॅक्सिजनवर

By admin | Updated: January 25, 2016 03:16 IST

जिल्ह्यातील चार प्रमुख प्रकल्पांसह अन्य मध्यम व लघु प्रकल्पांत आतापासूनच पाण्याची पातळी खालावत चालल्याचे

गोंदिया : जिल्ह्यातील चार प्रमुख प्रकल्पांसह अन्य मध्यम व लघु प्रकल्पांत आतापासूनच पाण्याची पातळी खालावत चालल्याचे चित्र दिसून येत आहे. हिवाळ््यातच या प्रकल्पांत मोजका पाणी साठी शिल्लक असल्याची आकडेवारी असल्याने उन्हाळ््यात जिल्ह्यात पाणी पेटणार असल्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रकल्पच आता आॅक्सीजनवर असल्याने पाणी टंचाई रबी हंगामालाही परिणामकारक ठरणार असल्याचे चित्र आहे. पावसाने दगा दिल्याने शेतीपासून सिंचनापर्यंत सर्वच गणित चुकल्याचे उत्तर आता पुढे येत आहे. पावसाच्या या खेळीमुळे जिल्ह्यातील प्रकल्पांची तहानही भागलेली नाही. हेच कारण आहे की, ऐन हिवाळ््यात जिल्ह्यातील प्रकल्पांत आतापासूनच पाण्याची टंचाई दिसून येत आहे. जिल्ह्याला पाण्याचा पुरवठा करणाऱ्या चार प्रमुख प्रकल्पांची स्थिती बघता यंदाचा उन्हाळा कसा जाणार हा विचार न करणेच बरे वाटते. कारण ३१८.८५ दलघमी क्षमता असलेल्या इटियाडोह प्रकल्पात आजघडीला ६१.५२ दलघमी (१९.२९ टक्के) एवढाच पाणी साठा शिल्लक आहे. १५९.७८ दलघमी क्षमता असलेल्या सिरपूर प्रकल्पात ६७.९९ दलघमी (४२.५६ टक्के), ४३.५३ दलघमी क्षमता असलेल्या पूजारीटोला प्रकल्पात २०.९१ दलघमी (४८.०४ टक्के) तर २७.७२ दलघमी क्षमता असलेल्या कालीसरार प्रकल्पात ०.३२ दलघमी म्हणजेच १.१६ टक्के एवढाच पाणी साठा शिल्लक आहे. या प्रमुख प्रकल्पांची ही स्थिती असताना अन्य जिल्ह्यातील १० मध्यम व २० लघु प्रकल्पांचीही स्थिती यापासून काही वेगळी नाही. मध्यम प्रकल्पांतील बोदलकसा, चोरखमारा, चुलबंद, खैरबंधा, रेंगेपार, संग्रामपूरव उमरझरी प्रकल्पांत ५० टक्केच्या आत पाणी साठा शिल्लक असून फक्त मानागड, कटंगी व कलपाथरी प्रकल्पांत ५० टक्केच्यावर पाणी साठा आहे. शिवाय लघु प्रकल्पांतील एकाही प्रकल्पात ५० टक्के च्यावर पाणी साठा शिल्लक नसल्याचे चित्र आहे. हा सर्व प्रकार बघता येणारा काळ कठीणच असल्याचे चित्र आतापासूनच दिसून येत आहे. अशात शेतकरी मात्र पुन्हा संकटात अडकला असून त्याला रबीची चिंता लागली आहे. (शहर प्रतिनिधी)प्रश्न रबीच्या सिंचनाचा ४प्रकल्पांतील पाण्याची ही स्थिती लक्षात घेता आता यातून रबी हंगामासाठी सिंचन कसे करता येईल अशा प्रश्न येथे पडतो. पावसामुळे खरिपाचा हंगाम शेतकरी गमावून बसले आहेत. रबी हंगामापासून शेतकरी आशा लावून बसला होता. मात्र प्रकल्पांतही पाणी नसल्याने शेतीसाठी पाणी आणावे कोठून अशा पेचात शेतकरी अडकला आहे. त्यामुळे रबीच्या सिंचनावर आता शासनाकडून काय पाऊल उचलले जाते यावरच रबीचा हंगाम निर्भर आहे. सर्वच मामा तलाव आटले ४एकेकाळी शेतीला हातभार लावणारे मामा तलाव आतामात्र शेतीसाठी काहीच करू शकत नसल्याचे दिसत आहे. कारण ३८ तलावांची नोंद असलेल्या पाटबंधारे विभागाकडील आकडेवारीनुसार एकाही मामा तलावात पाणी साठा नाही. आश्चर्याची बाब म्हणजे, पाटबंधारे विभागाकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार फक्त मालीदुंगा तलावात १.००३ टक्के पाणी साठा असल्याची नोंद आहे. तर अन्य ३७ तलावांत शून्य टक्के पाणी साठा दशर्विला जात आहे.लघु प्रकल्पांनाही लागली घरघर ४जिल्ह्यात २० लघु प्रकल्प असून यातील बहुतांश प्रकल्प आतापासूनच रिते झाल्याची नोंद आहे. यातील आक्टीटोला व हरी प्रकल्प आटल्याची नोंद झाली असून डोंगरगाव, गुमडोह, पांगडी, रेहाडी, रिसाला, सोनेगाव, सालेगाव, सडेपार, सेरपार, वडेगाव या प्रकल्पांत १० टक्केच्या आत पाणी साठा आहे. उर्वरीत प्रकल्पांचीही स्थिती अशीच असून ४६ टक्केच्यावर एकाही प्रकल्पात पाणी साठा असल्याची नोंद नाही. तर मध्यम प्रकल्पातील खैरबंधा प्रकल्पातही ७.३३ टक्के पाणी साठा असल्याची नोंद आहे.