शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील प्रकल्प आॅक्सिजनवर

By admin | Updated: January 25, 2016 03:16 IST

जिल्ह्यातील चार प्रमुख प्रकल्पांसह अन्य मध्यम व लघु प्रकल्पांत आतापासूनच पाण्याची पातळी खालावत चालल्याचे

गोंदिया : जिल्ह्यातील चार प्रमुख प्रकल्पांसह अन्य मध्यम व लघु प्रकल्पांत आतापासूनच पाण्याची पातळी खालावत चालल्याचे चित्र दिसून येत आहे. हिवाळ््यातच या प्रकल्पांत मोजका पाणी साठी शिल्लक असल्याची आकडेवारी असल्याने उन्हाळ््यात जिल्ह्यात पाणी पेटणार असल्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रकल्पच आता आॅक्सीजनवर असल्याने पाणी टंचाई रबी हंगामालाही परिणामकारक ठरणार असल्याचे चित्र आहे. पावसाने दगा दिल्याने शेतीपासून सिंचनापर्यंत सर्वच गणित चुकल्याचे उत्तर आता पुढे येत आहे. पावसाच्या या खेळीमुळे जिल्ह्यातील प्रकल्पांची तहानही भागलेली नाही. हेच कारण आहे की, ऐन हिवाळ््यात जिल्ह्यातील प्रकल्पांत आतापासूनच पाण्याची टंचाई दिसून येत आहे. जिल्ह्याला पाण्याचा पुरवठा करणाऱ्या चार प्रमुख प्रकल्पांची स्थिती बघता यंदाचा उन्हाळा कसा जाणार हा विचार न करणेच बरे वाटते. कारण ३१८.८५ दलघमी क्षमता असलेल्या इटियाडोह प्रकल्पात आजघडीला ६१.५२ दलघमी (१९.२९ टक्के) एवढाच पाणी साठा शिल्लक आहे. १५९.७८ दलघमी क्षमता असलेल्या सिरपूर प्रकल्पात ६७.९९ दलघमी (४२.५६ टक्के), ४३.५३ दलघमी क्षमता असलेल्या पूजारीटोला प्रकल्पात २०.९१ दलघमी (४८.०४ टक्के) तर २७.७२ दलघमी क्षमता असलेल्या कालीसरार प्रकल्पात ०.३२ दलघमी म्हणजेच १.१६ टक्के एवढाच पाणी साठा शिल्लक आहे. या प्रमुख प्रकल्पांची ही स्थिती असताना अन्य जिल्ह्यातील १० मध्यम व २० लघु प्रकल्पांचीही स्थिती यापासून काही वेगळी नाही. मध्यम प्रकल्पांतील बोदलकसा, चोरखमारा, चुलबंद, खैरबंधा, रेंगेपार, संग्रामपूरव उमरझरी प्रकल्पांत ५० टक्केच्या आत पाणी साठा शिल्लक असून फक्त मानागड, कटंगी व कलपाथरी प्रकल्पांत ५० टक्केच्यावर पाणी साठा आहे. शिवाय लघु प्रकल्पांतील एकाही प्रकल्पात ५० टक्के च्यावर पाणी साठा शिल्लक नसल्याचे चित्र आहे. हा सर्व प्रकार बघता येणारा काळ कठीणच असल्याचे चित्र आतापासूनच दिसून येत आहे. अशात शेतकरी मात्र पुन्हा संकटात अडकला असून त्याला रबीची चिंता लागली आहे. (शहर प्रतिनिधी)प्रश्न रबीच्या सिंचनाचा ४प्रकल्पांतील पाण्याची ही स्थिती लक्षात घेता आता यातून रबी हंगामासाठी सिंचन कसे करता येईल अशा प्रश्न येथे पडतो. पावसामुळे खरिपाचा हंगाम शेतकरी गमावून बसले आहेत. रबी हंगामापासून शेतकरी आशा लावून बसला होता. मात्र प्रकल्पांतही पाणी नसल्याने शेतीसाठी पाणी आणावे कोठून अशा पेचात शेतकरी अडकला आहे. त्यामुळे रबीच्या सिंचनावर आता शासनाकडून काय पाऊल उचलले जाते यावरच रबीचा हंगाम निर्भर आहे. सर्वच मामा तलाव आटले ४एकेकाळी शेतीला हातभार लावणारे मामा तलाव आतामात्र शेतीसाठी काहीच करू शकत नसल्याचे दिसत आहे. कारण ३८ तलावांची नोंद असलेल्या पाटबंधारे विभागाकडील आकडेवारीनुसार एकाही मामा तलावात पाणी साठा नाही. आश्चर्याची बाब म्हणजे, पाटबंधारे विभागाकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार फक्त मालीदुंगा तलावात १.००३ टक्के पाणी साठा असल्याची नोंद आहे. तर अन्य ३७ तलावांत शून्य टक्के पाणी साठा दशर्विला जात आहे.लघु प्रकल्पांनाही लागली घरघर ४जिल्ह्यात २० लघु प्रकल्प असून यातील बहुतांश प्रकल्प आतापासूनच रिते झाल्याची नोंद आहे. यातील आक्टीटोला व हरी प्रकल्प आटल्याची नोंद झाली असून डोंगरगाव, गुमडोह, पांगडी, रेहाडी, रिसाला, सोनेगाव, सालेगाव, सडेपार, सेरपार, वडेगाव या प्रकल्पांत १० टक्केच्या आत पाणी साठा आहे. उर्वरीत प्रकल्पांचीही स्थिती अशीच असून ४६ टक्केच्यावर एकाही प्रकल्पात पाणी साठा असल्याची नोंद नाही. तर मध्यम प्रकल्पातील खैरबंधा प्रकल्पातही ७.३३ टक्के पाणी साठा असल्याची नोंद आहे.