शहरं
Join us  
Trending Stories
1
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
2
POKमध्ये पाकचे अत्याचार, भारताची पहिली प्रतिक्रिया; असीम मुनीर यांचा घेतला खरपूस समाचार
3
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
4
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा
5
“मुंबईच्या गरब्यात सेलिब्रिटींवर लाखोंची उधळण, तेच पैसे शेतऱ्यांना दिले असते”: रोहित पाटील
6
इंट्राडे उच्चांकावरून थेट ११% घसरला हा शेअर, गुंतवणूकदारांना मोठा फटका; रेखा झुनझुनवालांचीही गुंतवणूक
7
Bhiwandi Crime: तोंडात कुरकुरे अन् निपचित पडलेला मृतदेह; कोर्टातून फरार झालेल्या आरोपीचा चिमुकलीवर अत्याचार
8
सचिन तेंडुलकरची गुंतवणूक असलेला शेअर रॉकेट बनला, झटक्यात 10% वधारला! दिला जातोय खरेदीचा सल्ला
9
Navi Mumbai Crime: इन्स्टाग्रावर ओळख, वाशीमध्ये भेटायला बोलावले; 16 वर्षाच्या मुलीवर कारमध्येच...
10
Kojagiri Purnima 2025:कोजागरी पौर्णिमेला चंद्र प्रकाश अंगावर घ्यावा असे म्हणतात; का ते माहितीय?
11
मुंबई-पुण्यात घरांच्या विक्रीत १७% घट; 'या' कारणांमुळे ग्राहकांनी फिरवली पाठ; किमती कमी होणार का?
12
‘आयुष्मान भारत’ योजना बंद पडली? नागपूरच्या रुग्णालयांमध्ये उघडकीस आले धक्कादायक वास्तव; रुग्णांना सेवा नाकारल्या
13
Video - "देवाने हे नियम बनवले नाहीत..."; शॉर्ट्स घालून महिलेने मंदिरात प्रवेश केल्याने मोठा गोंधळ
14
VIDEO: 'पॉवर हिटिंग'! ३ वर्षांच्या चिमुरड्याची बॅटिंग पाहून तुम्हीही म्हणाल- What a Shot!
15
मृत्यूचे कुंड : १०० हून अधिक लोकांना गायब करणारी रहस्यमयी विहीर! ४० मीटर लांब, शास्त्रज्ञांनाही उलगडेना...
16
आशिया चषकातील वादानंतर हवाई दल प्रमुखांचा मोठा दावा; भारताने पाकिस्तानची पाच लढाऊ विमाने पाडली 
17
कोजागरी शरद पौर्णिमा २०२५: पंचकाची अशुभ छाया अन् अमंगल काळ, शुभ मुहूर्त कधी? लक्ष्मी लाभेल!
18
"मी आभार मानतो, त्यांनी माझे 1000 रुपये वाचवले...!"; फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंची खिल्ली उडवली, नेमकं काय म्हणाले?
19
Dombivli Crime: मोबाईलचा पासवर्ड बदलला, कुटुंबात राडा! आई, दोन्ही मुले, आजोबामध्ये तुंबळ हाणामारी
20
अमानुष! लेकीशी भांडण... सासरच्यांनी जावयाला विष पाजलं, पळवून पळवून मारलं; झाला मृत्यू

जिल्ह्यातील प्रकल्प ऑक्सिजनवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2019 21:50 IST

जिल्ह्यातील चार प्रमुख प्रकल्पांसह अन्य मध्यम व लघु प्रकल्पांत पाण्याची पातळी खालावत चालल्याचे चित्र दिसून येत आहे. या प्रकल्पांत मोजकाच पाणी साठा शिल्लक असल्याची आकडेवारी असल्याने मान्सून येईपर्यंत यातील पाणी आणखी घटणार असल्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रकल्पच आता ऑक्सिजनवर असल्याने पावसाने यंदा साथ देण्याची गरज आहे.

ठळक मुद्देपाणीसाठा घटत चालला : मध्यम व लघु प्रकल्पही कोरडे

कपिल केकत।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यातील चार प्रमुख प्रकल्पांसह अन्य मध्यम व लघु प्रकल्पांत पाण्याची पातळी खालावत चालल्याचे चित्र दिसून येत आहे. या प्रकल्पांत मोजकाच पाणी साठा शिल्लक असल्याची आकडेवारी असल्याने मान्सून येईपर्यंत यातील पाणी आणखी घटणार असल्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रकल्पच आता ऑक्सिजनवर असल्याने पावसाने यंदा साथ देण्याची गरज आहे.पावसाने दगा दिल्याने शेतीपासून सिंचनापर्यंत सर्वच गणित चुकल्याचे उत्तर आता पुढे येत आहे. पावसाच्या या खेळीमुळे जिल्ह्यातील प्रकल्पांची तहानही भागलेली नाही. हेच कारण आहे की, पावसाळ््याला आणखी महिनाभर असताना जिल्ह्यातील प्रकल्पांत पाण्याची टंचाई दिसून येत आहे. जिल्ह्याला पाण्याचा पुरवठा करणाऱ्या चार प्रमुख प्रकल्पांची स्थिती बघता पाण्याचे नियोजन करणे खरच गरजेचे आहे असे दिसून येते.जिल्ह्यातील चार प्रमुख प्रकल्पांतील सर्वात मोठे प्रकल्प म्हणजे इटियाडोह असून ३१७.८७ दलघमी क्षमतेच्या या प्रकल्पात आजघडीला ७८.४३ दलघमी एवढा पाणी साठा असून त्याची २४.६७ एवढी टक्केवारी आहे. सिरपूर प्रकल्पाची १५९.७८ दलघमी एवढी क्षमता असून आजघडीला या प्रकल्पात ३५.८८ दलघमी एवढा पाणीसाठा असून त्याची २२.४५ एवढी टक्केवारी आहे. पूजारीटोला प्रकल्पाची ४३.५३ दलघमी पाणी साठवण क्षमता असून आजघडीला या प्रकल्पात १३.०६ दलघमी पाणीसाठा असून त्याची ३० एवढी टक्केवारी आहे.या प्रमुख प्रकल्पांची ही स्थिती असताना जिल्ह्यातील अन्य नऊ मध्यम व २२ लघु प्रकल्पांचीही स्थिती यापासून काही वेगळी नाही. मध्यम प्रकल्पांतील बोदलकसा, चोरखमारा, चुलबंद, खैरबंधा, मानागड, रेंगेपार, संग्रामपूर प्रकल्पांची स्थितीही बरी नाही. या प्रकल्पांतही मोजकाच पाणीसाठा असल्याने उन्हाळ््यात तेही साथ सोडणार असल्याचे दिसते. फक्त कटंगी प्रकल्पात आजघडीला ३५.४३ टक्के व कलपाथरी प्रकल्पात ३९.३९ टक्के पाणीसाठा दिसून येत आहे. शिवाय लघु प्रकल्पांचीही स्थिती कही बरी नसल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्याला वर्षभर पाण्याचा पुरवठा करणारे हे प्रकल्प असून आणखी दोन महिन्यांत हे प्रकल्प मात्र आटणार असल्याचेही दिसते.मामा तलावही आटलेएकेकाळी शेतीला हातभार लावणारे मामा तलाव आतामात्र शेतीसाठी काहीच करू शकत नसल्याचे दिसत आहे. कारण ३८ तलावांची नोंद असलेल्या पाटबंधारे विभागाकडील आकडेवारीनुसार या तलावांची स्थितीही काही ठीक नाही. मामा तलावातून अवघ्या गावांचा वापर होत होता. शिवाय शेतीची सुद्धा सोय होऊन जात होती. आजघडीला मात्र मामा तलावांनाच जीवनदानाची गरज आहे. तलावांतील गाळ काढून त्यांना जीवनदान मिळाल्यास हेच तलाव पुन्हा गावांसाठी जीवनदायी ठरणार.