शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
3
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
4
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
5
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
6
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
7
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
8
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
9
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
10
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
11
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
12
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
13
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
14
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
15
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
16
कोयनेत साडेचार टीएमसी पाणीसाठा वाढला; धरणातून विसर्ग सुरू 
17
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
18
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार
19
Tejasswi Prakash : "मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप?
20
IPL मधील टॉपर 'टेस्ट'मध्ये फेल; पदार्पणाच्या सामन्यात पदरी पडला भोपळा!

जिल्ह्यातील प्रकल्प ऑक्सिजनवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2019 21:50 IST

जिल्ह्यातील चार प्रमुख प्रकल्पांसह अन्य मध्यम व लघु प्रकल्पांत पाण्याची पातळी खालावत चालल्याचे चित्र दिसून येत आहे. या प्रकल्पांत मोजकाच पाणी साठा शिल्लक असल्याची आकडेवारी असल्याने मान्सून येईपर्यंत यातील पाणी आणखी घटणार असल्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रकल्पच आता ऑक्सिजनवर असल्याने पावसाने यंदा साथ देण्याची गरज आहे.

ठळक मुद्देपाणीसाठा घटत चालला : मध्यम व लघु प्रकल्पही कोरडे

कपिल केकत।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यातील चार प्रमुख प्रकल्पांसह अन्य मध्यम व लघु प्रकल्पांत पाण्याची पातळी खालावत चालल्याचे चित्र दिसून येत आहे. या प्रकल्पांत मोजकाच पाणी साठा शिल्लक असल्याची आकडेवारी असल्याने मान्सून येईपर्यंत यातील पाणी आणखी घटणार असल्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रकल्पच आता ऑक्सिजनवर असल्याने पावसाने यंदा साथ देण्याची गरज आहे.पावसाने दगा दिल्याने शेतीपासून सिंचनापर्यंत सर्वच गणित चुकल्याचे उत्तर आता पुढे येत आहे. पावसाच्या या खेळीमुळे जिल्ह्यातील प्रकल्पांची तहानही भागलेली नाही. हेच कारण आहे की, पावसाळ््याला आणखी महिनाभर असताना जिल्ह्यातील प्रकल्पांत पाण्याची टंचाई दिसून येत आहे. जिल्ह्याला पाण्याचा पुरवठा करणाऱ्या चार प्रमुख प्रकल्पांची स्थिती बघता पाण्याचे नियोजन करणे खरच गरजेचे आहे असे दिसून येते.जिल्ह्यातील चार प्रमुख प्रकल्पांतील सर्वात मोठे प्रकल्प म्हणजे इटियाडोह असून ३१७.८७ दलघमी क्षमतेच्या या प्रकल्पात आजघडीला ७८.४३ दलघमी एवढा पाणी साठा असून त्याची २४.६७ एवढी टक्केवारी आहे. सिरपूर प्रकल्पाची १५९.७८ दलघमी एवढी क्षमता असून आजघडीला या प्रकल्पात ३५.८८ दलघमी एवढा पाणीसाठा असून त्याची २२.४५ एवढी टक्केवारी आहे. पूजारीटोला प्रकल्पाची ४३.५३ दलघमी पाणी साठवण क्षमता असून आजघडीला या प्रकल्पात १३.०६ दलघमी पाणीसाठा असून त्याची ३० एवढी टक्केवारी आहे.या प्रमुख प्रकल्पांची ही स्थिती असताना जिल्ह्यातील अन्य नऊ मध्यम व २२ लघु प्रकल्पांचीही स्थिती यापासून काही वेगळी नाही. मध्यम प्रकल्पांतील बोदलकसा, चोरखमारा, चुलबंद, खैरबंधा, मानागड, रेंगेपार, संग्रामपूर प्रकल्पांची स्थितीही बरी नाही. या प्रकल्पांतही मोजकाच पाणीसाठा असल्याने उन्हाळ््यात तेही साथ सोडणार असल्याचे दिसते. फक्त कटंगी प्रकल्पात आजघडीला ३५.४३ टक्के व कलपाथरी प्रकल्पात ३९.३९ टक्के पाणीसाठा दिसून येत आहे. शिवाय लघु प्रकल्पांचीही स्थिती कही बरी नसल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्याला वर्षभर पाण्याचा पुरवठा करणारे हे प्रकल्प असून आणखी दोन महिन्यांत हे प्रकल्प मात्र आटणार असल्याचेही दिसते.मामा तलावही आटलेएकेकाळी शेतीला हातभार लावणारे मामा तलाव आतामात्र शेतीसाठी काहीच करू शकत नसल्याचे दिसत आहे. कारण ३८ तलावांची नोंद असलेल्या पाटबंधारे विभागाकडील आकडेवारीनुसार या तलावांची स्थितीही काही ठीक नाही. मामा तलावातून अवघ्या गावांचा वापर होत होता. शिवाय शेतीची सुद्धा सोय होऊन जात होती. आजघडीला मात्र मामा तलावांनाच जीवनदानाची गरज आहे. तलावांतील गाळ काढून त्यांना जीवनदान मिळाल्यास हेच तलाव पुन्हा गावांसाठी जीवनदायी ठरणार.