शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान तणावावर आज संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची बैठक; बंद खोलीत चर्चेची मागणी
2
Donald Trump Tariffs: 'चीनवरील टॅरिफ कमी करण्यास तयार, कारण...'; डोनाल्ड ट्रम्प यांची अचानक नरमाईची भूमिका
3
Mumbai Fire: मुंबईत कपड्याच्या शोरुममध्ये अग्नितांडव! पाच मजली इमारतीत अडकलेले लहान मुलांसह १९ लोक
4
Stock Market Today: १६० अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला, TATA Motors चा शेअर सुस्साट; ऑटो-आयटी क्षेत्रात तेजी
5
पाकिस्तान सुधारत नाही! सलग ११ व्या दिवशी युद्धबंदीचे उल्लंघन; भारतीय सैनिकांनी धडा शिकवला
6
Video: चिनी फॅक्टरीत रोबोट अचानक झाला हिंसक; कर्मचाऱ्यांवर केला जीवघेणा हल्ला, मग...
7
FD द्वारे रक्कम होऊ शकते तिप्पट, अनेकांना माहितही नाही; ₹५ लाख जमा करा, ₹१५ लाखांपेक्षा जास्त मिळतील
8
मिचमिच डोळे, रडारचे कान...! एमजी अ‍ॅस्टरमधून पुण्यात आणि गावखेड्यात भटकंती, कशी वाटली एसयुव्ही...
9
"२ वर्ष अख्खं जग थांबलं होतं तेव्हा माझं घर यांच्यामुळे चाललं", प्रसाद ओकने कोणाला दिलं श्रेय?
10
'पाकिस्तान भारताविरुद्ध ४ दिवसही टीकू शकत नाही, कराची अन् लाहोरमध्ये गुरुकुल उघडणार'; बाबा रामदेव यांनी सुनावले
11
बारावीचा आज निकाल; या संकेतस्थळांवर पाहता येणार..., कुठे आणि कसा पहावा...
12
अनैतिक संबंधातून वाद, जळगावात भररस्त्यात घडला थरार; पाठलाग करत युवकाला कायमचं संपवलं
13
...म्हणून बाबिलने अर्जुन कपूर, अनन्या पांडेचं नाव घेतलं; अभिनेत्याच्या 'त्या' व्हिडिओनंतर टीमकडून स्पष्टीकरण
14
दूत पाठवले म्हणून अजितदादांची शिंदेंवर नाराजी, पुढे काय?
15
India Pakistan: युद्धाचे ढग गडद होताच मध्यस्थीसाठी मुस्लिम देश आला पुढे, 'हा' नेता येणार भारत दौऱ्यावर
16
कानपूरमध्ये ६ मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
17
जातीनिहाय जनगणनेची फार वर्षे वाट पाहिली, अखेर निर्णय झाला!
18
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: या व्यक्तींची लग्न जुळू शकतात; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
19
तंदूरी रोटी बनली मृत्यूचं कारण! लग्न समारंभात भिडले २ युवक; हाणामारीत दोघांचा जीव गेला
20
संपादकीय: ...शिक्षा शेतकरी भावाला! घोटाळा सरकारनेच मान्य केला हे बरे झाले...

जिल्ह्यातील प्रकल्प ऑक्सिजनवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2019 21:50 IST

जिल्ह्यातील चार प्रमुख प्रकल्पांसह अन्य मध्यम व लघु प्रकल्पांत पाण्याची पातळी खालावत चालल्याचे चित्र दिसून येत आहे. या प्रकल्पांत मोजकाच पाणी साठा शिल्लक असल्याची आकडेवारी असल्याने मान्सून येईपर्यंत यातील पाणी आणखी घटणार असल्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रकल्पच आता ऑक्सिजनवर असल्याने पावसाने यंदा साथ देण्याची गरज आहे.

ठळक मुद्देपाणीसाठा घटत चालला : मध्यम व लघु प्रकल्पही कोरडे

कपिल केकत।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यातील चार प्रमुख प्रकल्पांसह अन्य मध्यम व लघु प्रकल्पांत पाण्याची पातळी खालावत चालल्याचे चित्र दिसून येत आहे. या प्रकल्पांत मोजकाच पाणी साठा शिल्लक असल्याची आकडेवारी असल्याने मान्सून येईपर्यंत यातील पाणी आणखी घटणार असल्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रकल्पच आता ऑक्सिजनवर असल्याने पावसाने यंदा साथ देण्याची गरज आहे.पावसाने दगा दिल्याने शेतीपासून सिंचनापर्यंत सर्वच गणित चुकल्याचे उत्तर आता पुढे येत आहे. पावसाच्या या खेळीमुळे जिल्ह्यातील प्रकल्पांची तहानही भागलेली नाही. हेच कारण आहे की, पावसाळ््याला आणखी महिनाभर असताना जिल्ह्यातील प्रकल्पांत पाण्याची टंचाई दिसून येत आहे. जिल्ह्याला पाण्याचा पुरवठा करणाऱ्या चार प्रमुख प्रकल्पांची स्थिती बघता पाण्याचे नियोजन करणे खरच गरजेचे आहे असे दिसून येते.जिल्ह्यातील चार प्रमुख प्रकल्पांतील सर्वात मोठे प्रकल्प म्हणजे इटियाडोह असून ३१७.८७ दलघमी क्षमतेच्या या प्रकल्पात आजघडीला ७८.४३ दलघमी एवढा पाणी साठा असून त्याची २४.६७ एवढी टक्केवारी आहे. सिरपूर प्रकल्पाची १५९.७८ दलघमी एवढी क्षमता असून आजघडीला या प्रकल्पात ३५.८८ दलघमी एवढा पाणीसाठा असून त्याची २२.४५ एवढी टक्केवारी आहे. पूजारीटोला प्रकल्पाची ४३.५३ दलघमी पाणी साठवण क्षमता असून आजघडीला या प्रकल्पात १३.०६ दलघमी पाणीसाठा असून त्याची ३० एवढी टक्केवारी आहे.या प्रमुख प्रकल्पांची ही स्थिती असताना जिल्ह्यातील अन्य नऊ मध्यम व २२ लघु प्रकल्पांचीही स्थिती यापासून काही वेगळी नाही. मध्यम प्रकल्पांतील बोदलकसा, चोरखमारा, चुलबंद, खैरबंधा, मानागड, रेंगेपार, संग्रामपूर प्रकल्पांची स्थितीही बरी नाही. या प्रकल्पांतही मोजकाच पाणीसाठा असल्याने उन्हाळ््यात तेही साथ सोडणार असल्याचे दिसते. फक्त कटंगी प्रकल्पात आजघडीला ३५.४३ टक्के व कलपाथरी प्रकल्पात ३९.३९ टक्के पाणीसाठा दिसून येत आहे. शिवाय लघु प्रकल्पांचीही स्थिती कही बरी नसल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्याला वर्षभर पाण्याचा पुरवठा करणारे हे प्रकल्प असून आणखी दोन महिन्यांत हे प्रकल्प मात्र आटणार असल्याचेही दिसते.मामा तलावही आटलेएकेकाळी शेतीला हातभार लावणारे मामा तलाव आतामात्र शेतीसाठी काहीच करू शकत नसल्याचे दिसत आहे. कारण ३८ तलावांची नोंद असलेल्या पाटबंधारे विभागाकडील आकडेवारीनुसार या तलावांची स्थितीही काही ठीक नाही. मामा तलावातून अवघ्या गावांचा वापर होत होता. शिवाय शेतीची सुद्धा सोय होऊन जात होती. आजघडीला मात्र मामा तलावांनाच जीवनदानाची गरज आहे. तलावांतील गाळ काढून त्यांना जीवनदान मिळाल्यास हेच तलाव पुन्हा गावांसाठी जीवनदायी ठरणार.