शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

प्रकल्प लबालब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2020 05:00 IST

जिल्ह्यात जून व जुलै महिन्यात पावसाने दडी मारून सर्वांच्या तोंडचे पाणी पळवून दिले होते. मात्र ऑगस्ट महिन्यात जिल्ह्याला पाणीदार करून सर्वांनाच खूश करून टाकले. ऑगस्ट महिन्यातील पावसाने सामान्य नागरिकांना दिलासा मिळाला असतानाच प्रामुख्याने शेतकऱ्यांनाही संकटातून बाहेर काढले. पावसामुळे शेतकऱ्यांना शेतीची कामे आटोपता आली व त्यांची चिंता सुटली.

ठळक मुद्देमुसळधार पावसाची करामत : कित्येक रस्त्यांवर पाणी

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : ऑगस्ट महिन्यातील पावसाने जिल्हा पाणीदार झाला असतानाच प्रकल्पांतील पाणीसाठ्यातही वाढ होऊ लागली होती. मात्र गुरूवारी बरसलेल्या पावसानंतर जिल्ह्यातील सर्वच नदी-नाले, तलाव तुडूंब भरले. तर जिल्ह्यातील प्रकल्पांतही पाणीसाठा वाढला असून आजघडीला सर्वच प्रकल्प पाण्याने लबालब भरले आहेत. पावसाने अशीच साथ दिल्यास प्रकल्पांतील पाणीसाठा कायम राहणार व त्यामुळे उन्हाळ््यातील पाण्याची समस्या सुटणार यात शंका नाही.जिल्ह्यात जून व जुलै महिन्यात पावसाने दडी मारून सर्वांच्या तोंडचे पाणी पळवून दिले होते. मात्र ऑगस्ट महिन्यात जिल्ह्याला पाणीदार करून सर्वांनाच खूश करून टाकले. ऑगस्ट महिन्यातील पावसाने सामान्य नागरिकांना दिलासा मिळाला असतानाच प्रामुख्याने शेतकऱ्यांनाही संकटातून बाहेर काढले. पावसामुळे शेतकऱ्यांना शेतीची कामे आटोपता आली व त्यांची चिंता सुटली. आता मागील आठवडाभरापासून बरसत असलेल्या संततधार पावसामुळे कोरडेठाक असलेल्या नदी-नालेस तलाव व प्रकल्पांचीही तहान विजविली. या पावसामुळे जिल्ह्यातील सर्वच नदी-नाले व तलाव भरले आहेत.अशातच मात्र गुरूवारच्या (दि.२०) मुसळधार पावसाने अवघ्या जिल्ह्याला झोडपून पुरच आणला होता. त्यातच जिल्ह्यातील प्रकल्पांतही चांगलाच पाणीसाठा झाला आहे. आजघडीला जिल्हयातील सर्वच प्रकल्प पाण्याने लबालब भरलेले असून पुढे बरसणाºया पावसाने प्रकल्प पूर्णपणे भरून पुढे त्याचा जिल्ह्याला फायदा होणार.गुरूवारच्या या पावसामुळे एकीकडे शेतकरी सुखावलेला असतानाच नदी-नाले व तलावांचे पाणी शेतात शिरल्याने कित्येक शेतकºयांच्या शेतातील धान पीक वाहून गेले आहे. त्यामुळे शेतकºयांचे चांगलेच नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे, पावसाने उघाड दिल्याने परिस्थिती नियंत्रणात आली आहे. मात्र तरिही नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. या पावसामुळे नदी-नले ओसंडून वाहत असतानाच अद्याप कित्येक मार्गांवरील पुलावरून पाणी वाहत असल्याने रस्ते बंद पडून आहेत. त्यात काही प्रकल्पांचे गेट उघडले जात असल्याने नदी-नाल्यांची पाण्याची पातळी वाढत असल्याचे दिसत आहे.प्रकल्पांतील पाणीसाठा ७० टक्के पारगुरूवारच्या पावसामुळे जिल्ह्यातील प्रकल्पांत ७० टक्केच्या वर पाणीसाठा दिसून येत आहे. यामध्ये, इटियाडोह प्र्रकल्पात ७०.२७ टक्के पाणीसाठा आहे. सिरपूर प्रकल्पात ७१.७१ टक्के पाणीसाठा आहे. पुजारीटोला प्रकल्पात ८७.१० टक्के पाणीसाठा असून कालीसरास प्रकल्पात थोडा कमी मात्र ६३.३६ टक्के पाणीसाठा आहे.पुजारीटोलाचे ४ गेट उघडूनगुरूवारच्या पावसामुळे पुजारीटोला प्रकल्पाचे १२ गेट उघडण्यात आले व त्यातून पाणी सोडले गेले. आता प्रकल्पाचे ४ गेट उघडेच असून पाणी सोडले जात आहे. विशेष म्हणजे, पुजारीटोला प्रकल्पातील पाण्यानेच गरज पडल्यास गोंदिया शहराचीही उन्हाळ््यात भागविली जाते. यामुळे पुजारीटोला प्रकल्पात पाणीसाठा असणे अत्यंत गरजेचे असून या पावसामुळे ही समस्या सुटणार असल्याचे दिसते.

टॅग्स :Irrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प