शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
3
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
4
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
5
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
6
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
7
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
8
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
9
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
10
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
11
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
12
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
13
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
14
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
15
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
16
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
17
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
18
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
19
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
20
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक

प्रकल्प लबालब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2020 05:00 IST

जिल्ह्यात जून व जुलै महिन्यात पावसाने दडी मारून सर्वांच्या तोंडचे पाणी पळवून दिले होते. मात्र ऑगस्ट महिन्यात जिल्ह्याला पाणीदार करून सर्वांनाच खूश करून टाकले. ऑगस्ट महिन्यातील पावसाने सामान्य नागरिकांना दिलासा मिळाला असतानाच प्रामुख्याने शेतकऱ्यांनाही संकटातून बाहेर काढले. पावसामुळे शेतकऱ्यांना शेतीची कामे आटोपता आली व त्यांची चिंता सुटली.

ठळक मुद्देमुसळधार पावसाची करामत : कित्येक रस्त्यांवर पाणी

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : ऑगस्ट महिन्यातील पावसाने जिल्हा पाणीदार झाला असतानाच प्रकल्पांतील पाणीसाठ्यातही वाढ होऊ लागली होती. मात्र गुरूवारी बरसलेल्या पावसानंतर जिल्ह्यातील सर्वच नदी-नाले, तलाव तुडूंब भरले. तर जिल्ह्यातील प्रकल्पांतही पाणीसाठा वाढला असून आजघडीला सर्वच प्रकल्प पाण्याने लबालब भरले आहेत. पावसाने अशीच साथ दिल्यास प्रकल्पांतील पाणीसाठा कायम राहणार व त्यामुळे उन्हाळ््यातील पाण्याची समस्या सुटणार यात शंका नाही.जिल्ह्यात जून व जुलै महिन्यात पावसाने दडी मारून सर्वांच्या तोंडचे पाणी पळवून दिले होते. मात्र ऑगस्ट महिन्यात जिल्ह्याला पाणीदार करून सर्वांनाच खूश करून टाकले. ऑगस्ट महिन्यातील पावसाने सामान्य नागरिकांना दिलासा मिळाला असतानाच प्रामुख्याने शेतकऱ्यांनाही संकटातून बाहेर काढले. पावसामुळे शेतकऱ्यांना शेतीची कामे आटोपता आली व त्यांची चिंता सुटली. आता मागील आठवडाभरापासून बरसत असलेल्या संततधार पावसामुळे कोरडेठाक असलेल्या नदी-नालेस तलाव व प्रकल्पांचीही तहान विजविली. या पावसामुळे जिल्ह्यातील सर्वच नदी-नाले व तलाव भरले आहेत.अशातच मात्र गुरूवारच्या (दि.२०) मुसळधार पावसाने अवघ्या जिल्ह्याला झोडपून पुरच आणला होता. त्यातच जिल्ह्यातील प्रकल्पांतही चांगलाच पाणीसाठा झाला आहे. आजघडीला जिल्हयातील सर्वच प्रकल्प पाण्याने लबालब भरलेले असून पुढे बरसणाºया पावसाने प्रकल्प पूर्णपणे भरून पुढे त्याचा जिल्ह्याला फायदा होणार.गुरूवारच्या या पावसामुळे एकीकडे शेतकरी सुखावलेला असतानाच नदी-नाले व तलावांचे पाणी शेतात शिरल्याने कित्येक शेतकºयांच्या शेतातील धान पीक वाहून गेले आहे. त्यामुळे शेतकºयांचे चांगलेच नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे, पावसाने उघाड दिल्याने परिस्थिती नियंत्रणात आली आहे. मात्र तरिही नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. या पावसामुळे नदी-नले ओसंडून वाहत असतानाच अद्याप कित्येक मार्गांवरील पुलावरून पाणी वाहत असल्याने रस्ते बंद पडून आहेत. त्यात काही प्रकल्पांचे गेट उघडले जात असल्याने नदी-नाल्यांची पाण्याची पातळी वाढत असल्याचे दिसत आहे.प्रकल्पांतील पाणीसाठा ७० टक्के पारगुरूवारच्या पावसामुळे जिल्ह्यातील प्रकल्पांत ७० टक्केच्या वर पाणीसाठा दिसून येत आहे. यामध्ये, इटियाडोह प्र्रकल्पात ७०.२७ टक्के पाणीसाठा आहे. सिरपूर प्रकल्पात ७१.७१ टक्के पाणीसाठा आहे. पुजारीटोला प्रकल्पात ८७.१० टक्के पाणीसाठा असून कालीसरास प्रकल्पात थोडा कमी मात्र ६३.३६ टक्के पाणीसाठा आहे.पुजारीटोलाचे ४ गेट उघडूनगुरूवारच्या पावसामुळे पुजारीटोला प्रकल्पाचे १२ गेट उघडण्यात आले व त्यातून पाणी सोडले गेले. आता प्रकल्पाचे ४ गेट उघडेच असून पाणी सोडले जात आहे. विशेष म्हणजे, पुजारीटोला प्रकल्पातील पाण्यानेच गरज पडल्यास गोंदिया शहराचीही उन्हाळ््यात भागविली जाते. यामुळे पुजारीटोला प्रकल्पात पाणीसाठा असणे अत्यंत गरजेचे असून या पावसामुळे ही समस्या सुटणार असल्याचे दिसते.

टॅग्स :Irrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प