शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील प्रकल्प आजही तहानलेलेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2019 23:23 IST

राज्यास सर्वत्र पावसाचा प्रकोप सुरू असताना जिल्ह्यात मात्र आजही दमदार पावसाच्या प्रतिक्षेत जिल्हावासी आहेत. सुरूवातीपासूनच पावसाने खेळी केल्याने शेतीची कामे रखडली असतानाच आजही जिल्ह्यातील प्रमुख प्रकल्प तहानलेलेच दिसून येत आहेत. या प्रकल्पांत आजही मोजकाच पाणीसाठा असून दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे.

ठळक मुद्देमोजकाच पाणीसाठा : दमदार पावसाची प्रतीक्षा कायम

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : राज्यास सर्वत्र पावसाचा प्रकोप सुरू असताना जिल्ह्यात मात्र आजही दमदार पावसाच्या प्रतिक्षेत जिल्हावासी आहेत. सुरूवातीपासूनच पावसाने खेळी केल्याने शेतीची कामे रखडली असतानाच आजही जिल्ह्यातील प्रमुख प्रकल्प तहानलेलेच दिसून येत आहेत. या प्रकल्पांत आजही मोजकाच पाणीसाठा असून दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे.जून महिन्यात पावसाने दगा दिला. त्यानंतर जुलै महिन्यात काही काळ पाऊस बरसला मात्र त्यानंतर पावसाने दडी मारली. आता जेमतेम मागील आठ दिवसांपासून पाऊस परतून आला असून संततधार रिमझीम पाऊसच बरसला. या पावसामुळे शेतीची कामे पुन्हा जोमात सुरू झाली असून अडकून पडलेल्या रोवण्यांना वेग आला आहे. या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असतानाच शेतकऱ्याच्या चेहºयावर हसू आले आहे. मात्र रिमझीम बरसलेल्या या पावसामुळे प्रकल्पांना पाहिजे तसा फायदा झालेला दिसून येत नाही.जिल्ह्याला वर्षभर पाण्याची सोय करून देणारे चार प्रकल्प आहेत. या प्रकल्पांत आजही मोजकाच पाण़ीसाठा असून भर पावसाळ््यात हे प्रकल्प तहानलेलेच दिसून येत आहेत. जिल्ह्यातील इटियाडोह प्रकल्पात आजही फक्त ४६.५१ टक्के पाणीसाठा आहे. सिरपूर प्रकल्पात ३१.६६ टक्के, पुजारीटोला प्रकल्पात ५६.६० टक्के तर कालीसरार प्रकल्पात २७.९९ टक्के पाणीसाठा आहे. यावरून भर पावसाळ््यात या प्रकल्पांची अशी स्थिती असल्याने आणखी दमदार पावसाची गरज दिसून येत आहे.येणारा काळ कठीणजिल्ह्यात पावसाने सुरूवातीपासूनच खेळी केल्याने शेतीची कामे अडकून पडली. परिणामी आजही कि त्येक शेतकऱ्यांची रोवणी झालेली नसल्याचे दिसत आहे. याशिवाय कमी पावसामुळे जिल्ह्यातील प्रमुख चार प्रकल्पांत पाहिजे त्या प्रमाणात पाणीसाठा नाही. या प्रकल्पात पुरेपूर पाणीसाठा राहणे जिल्ह्यासाठी अत्यंत गरजेचे आहे. कारण या प्रकल्पांतूनच जिल्ह्याला उन्हाळ््यात पाणी पुरविले जाते. त्यामुळे हे प्रकल्प न भरल्यास येणारा काळ मात्र कठीण जाणार यात शंका नाही.