शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
2
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
3
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
4
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
5
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
6
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
7
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
8
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
9
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
10
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
11
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
12
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
13
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
14
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
15
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
16
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
17
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
18
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
19
मथुरा श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरण: हिंदू पक्षाला झटका, शाही ईदगाहला वादग्रस्त ढाचा घोषित करण्याची मागणी HC नं फेटाळली
20
ENG vs IND : जलद शतकी खेळीसह Jamie Smith चा पराक्रम! १४८ वर्षांत असं पहिल्यांदा घडलं

झाशीनगर उपसा सिंचनाच्या प्रलंबित कामाला येणार गती

By admin | Updated: May 10, 2014 00:19 IST

बहुप्रतीक्षित झाशीनगर उपसा सिंचन प्रकल्पाचे प्रलंबित असलेले काम पूर्णत्वास नेण्याच्या दृष्टीने आ.राजकुमार बडोले यांनी उपसा सिंचन विभाग,

 नवेगावबांध : बहुप्रतीक्षित झाशीनगर उपसा सिंचन प्रकल्पाचे प्रलंबित असलेले काम पूर्णत्वास नेण्याच्या दृष्टीने आ.राजकुमार बडोले यांनी उपसा सिंचन विभाग, यांत्रिकी विभाग, जलविद्युत विभागाच्या कार्यकारी अभियंत्याची सभा घेतली. सदर सभेत डिसेंबर १४ पर्यंत प्रकल्पाचे काम पूर्ण करणार असल्याची ग्वाही संबंधित अभियंत्यानी दिली. झाशीनगर उपसा सिंचन या महत्वाकांक्षी प्रकल्पाला युती शासनाच्या काळात मंजुरी प्रदान करण्यात आलेली होती. यामध्ये इटियाडोह धरणाचे पाणी हे उपसा सिंचन पध्दतीने नवेगावबांध जलाशयात आणून नवेगावबांध परिसरातील सुमारे १५०० हेक्टर जमीनीचे सिंचन होणार आहे. परंतु शासन व प्रशासनाच्या धरसोड वृत्तीमुळे सर प्रकल्पाचे काम मात्र अजूनही पूर्ण झाले नाही. त्यामुळे मुख्यत्वाने याचा फटका मात्र परिसरातील शेतकर्‍यांना बसत आहे. झाशीनगर उपसा सिंचन प्रकल्प पूर्ण होणे सर्वाच्याच हिताचे असल्याकारणाने दि. ८ मे रोजी आ. बडोले यांनी नवेगावबांध येथे एक संयुक्त आढावा बैठक घेतली. बैठकीला उपसा सिंचन व विदर्भ मध्यम प्रकल्प विभाग गोंदियाचे कार्यकारी अभियंता अरविंद गेडाम, यांत्रिकी विभाग भंडाराचे कार्यकारी अभियंता शिंदे, जलविद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता भोरे, वनपरिक्षेत्राधिकारी मेहेर, उपसा सिंचन उपविभाग अर्जुनी/मोरगावचे उपविभागीय अभियंता चौधरी माजी आ.दयाराम कापगते, जि.प. सदस्य मधुकर मरस्कोल्हे, रघुनाथ लांजेवार, पं.स. सदस्य महादेव बोरकर व सबंधीत विभागाचे बहुसंख्य अधिकारी उपस्थित होते. सदर प्रकल्पाच्या मुख्य कालव्याचे थोडेसे काम बाकी आहे, तसेच भूमी अधिग्रहणाचे काहींचे पैसे देने बाकी आहे. यासाठी आदिवासी विकास उपयोजनेतून निधीसाठी प्रयत्न केले जाणार आहेत. विद्युत पुरवड्याच्या मुख्य कामासाठी ३.२० कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात येणार आहे. नवेगावबांधपासून तर प्रकल्पापर्यंत विद्युत पुरवठा केला जाणार आहे. यासाठी ४.१.२०१२ ला सबंधीत ठेकेदाराला कार्यारंभ आदेश देण्यात आलेला आहे. एक्सप्रेस फिडरकरीता रेल्वे क्रॉसींग संबधाने प्रस्ताव जलविद्युत विभागाने रेल्वे विभागाकडे मान्यतेसाठी पाठविण्यात यावा असेही ठरविण्यात आले. प्रकल्पाकरिता नियंत्रण कक्ष, पंप, पाईप जोडणे, डिलीव्हरी चेंबर, व्हाल्व, जेन्ट्री आदी कामाकरीता ३.९४ करोड रुपये खर्च करण्यात येणार आहेत. सदर प्रकल्पाला लागणारी यंत्र सामग्री काही प्रमाणात पाच वर्षापूर्वीच आणण्यात आलेली आहे. सदर प्रकल्पाचे काम फ्लोअर लेव्हलपर्यंत पूर्ण झालेले असून उर्वरीत काम युध्दपातळीवर पूर्ण करण्यात येणार आहे. डिसेंबर १४ पर्यंत सदर प्रकल्पा पूर्णत्वास नेण्याचे उद्दिष्ट असल्याची ग्वाही सबंधीत अभियंत्यानी सदर बैठकीमध्ये दिली. त्यामुळे भविष्यात नवेगावबांध परिसरातील सुमारे १५०० हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे. यामुळे मुख्यत्वाने पिण्याच्या पाण्याची समस्या सुटेल व दुबार फसलीने बळीराजा देखील सुखावणार आहे. बैठकीनंतर आ. बडोले व सबंधित अधिकार्‍यांनी कार्यस्थळी जाणून कामाचा आढावा देखील घेतला. (वार्ताहर)