शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

प्राध्यापकांनी आंदोलनास तयार राहावे

By admin | Updated: June 29, 2014 23:58 IST

भारताच्या घटनेने सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयांना अभिलेख न्यायालयाचा दर्जा दिलेला आहे. न्यायालयीन निर्णयाचे पालन करणे राज्यशासनाला बंधनकारक आहे. मात्र शिक्षकांच्या विषयी

अनिल ढगे यांचे आवाहन : राज्य शासनाचे अन्यायकारक धोरणसालेकसा : भारताच्या घटनेने सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयांना अभिलेख न्यायालयाचा दर्जा दिलेला आहे. न्यायालयीन निर्णयाचे पालन करणे राज्यशासनाला बंधनकारक आहे. मात्र शिक्षकांच्या विषयी सातत्याने द्वेषभाव मनात ठेवून उच्च व सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी होत नसल्याची डझनभर प्रकरणे महाराष्ट्रात आहेत. तो घटनात्मक यंत्रणा मोडून पडल्याचा पुरावा आहे. प्राध्यापकांच्या नेट-सेटच्या बाबतीत न्यायालयाने निकाल दिल्यावरही राज्य शासन नेट-सेट धारकांची पदोन्नती करीत नाही. तेव्हा या राज्य शासनाच्या द्वेषभावाविरूद्ध आंदोलन करण्यात येणार आहे. प्राध्यापकांनी आंदोलनास तायार रहावे, असे आवाहन नुटाचे सचिव डॉ. अनिल ढगे यांनी केले. ते डी.बी. सायन्स महाविद्यालय गोंदिया येथे आयोजित बैठकीच्या अध्यक्षपदावरुन बोलत होते. यावेळी नुटाचे उपाध्यक्ष डॉ. विलास ढोगे, सहसचिव नितीन कोंगरे, डॉ. अविनाश साहुरकर, डॉ. हरीष त्रिवेदी यांची प्रामुख्याने उपस्थित होते. डॉ. विलास ढोगे यांनी राज्यशासन वेळोवेळी प्राध्यापकांवर कसा अन्याय करीत आहे, प्राध्यापकांच्या समस्येबद्दल चर्चाही करीत नाही व बैठकाही होत नसल्याचे सांगितले. डॉ. नितीन कोंगरे यांनी राज्य शासनाच्या विरोधात पदोन्नती संदर्भात नेटसेट ग्रस्तांची प्रकरणे नुटा संघटनेच्या वतीने नेण्यात आली. न्यायालयाने प्राध्यापकांच्या बाजूने निर्णय देवून सहा महिन्यात पदोन्नतीची प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश दिले. परंतु अजुनपर्यंत शासनाच्या वतीने कोणतीही कार्यवाही करण्यात आली नसल्याचे सांगितले. प्रास्ताविक डॉ. कार्तिक पानीकर यांनी, संचालन डॉ. नामदेव हटवार यांनी तर आभार डॉ. हरीश त्रिवेदी यांनी मानले. कार्यक्रमासाठी प्रा. संजय निमांडे, प्रा. ममता पालेवार, झेड.डी. पट्टे, ओ.आय. ठाकूर, डॉ. दिलीप जेना आदींनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)