शहरं
Join us  
Trending Stories
1
भंडाऱ्याचे काँग्रेस खासदार प्रशांत पडोळेंच्या गाडीचा भीषण अपघात; ट्रकची धडक, चौघांना किरकोळ दुखापत
2
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
3
Milk Rate: ४ रुपयांनी स्वस्त होणारे का अमूलचं दूध? कंपनीच्या एमडींनी सांगितला संपूर्ण प्लान
4
"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'क्रॉस व्होटिंग'वर सर्वात मोठा दावा
5
"आता पहिल्यासारखं आयुष्य नाही..."; एकाच मुलीशी लग्न करणाऱ्या २ भावांवर कोसळला दु:खाचा डोंगर
6
नवीन गाडीची डिलिव्हरी घेताना अपघात झाला तर? महिंद्रा थारच्या घटनेतून जाणून घ्या विमा क्लेमचे नियम
7
Google Pixel 9: चक्क अर्ध्या किंमतीत खरेदी करा गुगल पिक्सेल ९; कॅमेऱ्यानं अनेकांना लावलंय वेड!
8
बहिणीच्या स्वप्नात भाऊ आला... म्हणाला, माझा खून झाला; 'ती' शंका खरी, हत्येची फिल्मी स्टोरी
9
Nepal Crisis : केपी शर्मा ओली यांचा भारताविरुद्धचा द्वेष कायम, राजीनाम्यानंतर विरोधात गरळ, आली पहिली प्रतिक्रिया
10
खुद्द लष्करप्रमुखांनी विनवलं, तब्बल १५ तास महाचर्चा अन् सुशीला कार्कींचा PM पदासाठी होकार! Inside Story
11
उघडताच पूर्ण सबस्क्राईब झाला हा IPO; आताच ११७% पोहोचला जीएमपी; १४० रुपयांचा आहे शेअर
12
दाने-दाने में केसर का दम! केसरची किंमत ५ लाख पण इथे..; शाहरूख, अजय, टायगर 'त्या' जाहिरातीमुळे अडचणीत
13
VIDEO: ट्रक पार्क केला पण हँडब्रेक लावायला विसरला, मागच्या कारच्या अंगावर गेला अन् नंतर...
14
VIRAL : 'नाही, नको,बाबा मानणार नाहीत"; ती रडत ओरडत राहिली अन् त्यानं केलं असं काही… धावत्या ट्रेनमध्ये प्रेमाचा ड्रामा!
15
जीएसटी काटके...! महिंद्रा, सोनालिका, जॉन डीअर ट्रॅक्टरची किंमत कितीने कमी होणार? 
16
ईडीचे १२ ठिकाणी छापे, यशवंत सावंतांच्या घरी सापडलं घबाड; ७२ लाखांची रोकड, ७ लग्झरी कार जप्त
17
कोकणची माती, 'दशावतारा'ची कला अन् गूढ रम्य कथा! सिनेमातील कलाकारांनी सांगितला अनुभव
18
पितृपंधरवड्यात भाजीपाला कडाडला; सर्व भाज्यांचे दर १०० रुपयांच्या पुढे 
19
तेजस्वी यादवांविरोधात लढण्याची केली होती तयारी, आता भररस्त्यात झाली हत्या, कोण होते राजकुमार राय? 

धानाचे उत्पादन यंदा २० टक्क्यांनी घटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2018 00:49 IST

धान निसविण्याच्या कालावधीतच पावसाने पाठ फिरविल्याने आणि ढगाळ वातावरणामुळे पिकांवर कीडरोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला. परिणामी धानाच्या प्रती हेक्टरी उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देपावसाची तूट व कीडरोगांचा परिणाम : हवामानाचा अंदाज चुकला,

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : धान निसविण्याच्या कालावधीतच पावसाने पाठ फिरविल्याने आणि ढगाळ वातावरणामुळे पिकांवर कीडरोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला. परिणामी धानाच्या प्रती हेक्टरी उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. कृषी विभागाच्या अंदाजानुसार एकूण उत्पादनात २० टक्के घट होण्याची शक्यता असून याचा फटका शेतकऱ्यांना बसणार आहे.जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकरी मागील दोन तीन वर्षांपासून दुष्काळी परिस्थितीला तोंड देत आहे. मात्र यंदा हवामान विभागाने सुरूवातीपासूनच चांगल्या पावसाचा अंदाज वर्तविला होता. तो अंदाज सुरूवातीला काही प्रमाणात ठरला. पिकांसाठी अनुकुल वातावरण असल्याने वाढ सुद्धा चांगली झाली.मात्र आता धान निघण्याच्या स्थितीत असताना मागील महिनाभरापासून पावसाने दडी मारल्याने धानपिके संकटात आली आहे. तर ढगाळ वातावरणामुळे पिकांवर मोठ्या प्रमाणात किडरोगांचा प्रादुर्भाव झाला आहे.महागड्या कीटकनाशकांची फवारणी करुन सुद्धा कीडरोगांचा प्रादुर्भाव कमी होत नसल्याने शेतकरी हैराण असल्याचे चित्र आहे. यावर्षी धानाच्या उत्पादनात वाढ होण्याची शक्यता होती. मात्र पावसाने पाठ फिरविल्याने शेतकºयांना हाती आलेली पिके गमाविण्याची पाळी आली आहे.यंदा जिल्ह्यात दोन लाख हेक्टरवर धान पिकांची लागवड करण्यात आली आहे. त्यात जवळपास ५० हजार हेक्टरला सिंचनाची सोय आहे. बहुतेक शेतकरी सिंचन प्रकल्पातील पाण्याच्या मदतीने पिके वाचविण्याचा प्रयत्न करीत आहे.मात्र काही शेतकऱ्यांकडे सिंचनाची सोय नसल्याने त्यांना नैसर्गिक पावसावरच अवलंबून राहावे लागत आहे.धान निसविण्याच्या कालावधीत पाऊस झाल्यास धान चांगला भरतो व उत्पादनात वाढ होते.मात्र नेमक्या याच कालावधी पाऊस बेपत्ता झाल्याने उत्पादनात २० टक्के घट होण्याची शक्यता असून त्याचा फटका शेतकऱ्यांना बसण्याची शक्यता आहे.भारनियमनाची भरआधीच पावसाने पाठ फिरविल्याने धानपिके संकटात आली आहे. त्यामुळे मोटारपंप लावून धरणे, विहिरी, तलावांच्या मदतीने शेतीला सिंचन करीत होते. मात्र मागील आठ दिवसांपासून जिल्ह्यातील ग्रामीण भागात आठ ते दहा तासांचे भारनियमन केले जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पिकांना पाणी देण्यास मोठी अडचण निर्माण झाली आहे. आधीच शेतकऱ्यांवर निसर्ग कोपला असताना त्यात भारनियमनाची भर पडली आहे.किडरोग आणि पावसामुळे धानाच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. पीक कापणी प्रयोगानंतर उत्पादनात नेमकी किती टक्के घट होईल हे निश्चित सांगता येईल.- भाऊसाहेब बºहाटे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गोंदिया.