शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
7
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
8
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
9
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
10
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
11
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
12
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
13
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
14
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
15
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
16
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
17
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
18
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
19
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
20
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले

जिल्ह्यात धानाचे उत्पादन अस्थिर

By admin | Updated: December 2, 2014 23:08 IST

धानासाठी जिल्ह्याची दूरवर ख्याती असली तरिही या धानासाठी घ्यावी लागणारी जोखमी मात्र त्या शेतकऱ्यालाच माहिती आहे. शेती हा प्रकारच निसर्गावर अवलंबून असला तरी यात खरिपाचा

गोंदिया : धानासाठी जिल्ह्याची दूरवर ख्याती असली तरिही या धानासाठी घ्यावी लागणारी जोखमी मात्र त्या शेतकऱ्यालाच माहिती आहे. शेती हा प्रकारच निसर्गावर अवलंबून असला तरी यात खरिपाचा हंगाम म्हटला तर जोखीम दुतर्फा असते. यामुळेच शेतकऱ्यांचा कल अन्य पिकांकडे वाढत चालला आहे. परिणामी धान लागवडीचे क्षेत्र व त्यामुळे उत्पादनही बदलत चालले आहे. हाच निष्कर्ष कृषी विभागाकडे असलेल्या खरिपाच्या आकडेवारीनरून दिसून येत आहे. यामुळेच धानाच्या जिल्ह्यातच धानाचे उत्पादन अस्थिर असल्याचे दिसून येत आहे. नवनवीन तंत्रज्ञान येत असल्याने प्रत्येकच क्षेत्रात आज क्रांती झाली आहे. रोवणी पासून तर पिकांची कापणी व मळणी करिता मानवाने यंत्र तयार केले आहेत. एवढी ही प्रगती झाली असली तरी या सर्वांवर निसर्गच सर्व शक्तीमान आहे आणि हे निसर्ग दरवर्षी दाखवून देते. त्याचे असे की, धान उत्पादनासाठी जिल्हा नावाजलेला आहे. धानाचे कोठार म्हणून जिल्ह्याची ख्याती आहे. मात्र धानासाठी घ्यावी लागणारी मेहनत व त्यामागची जोखीम ही बाब केवळ तो शेतकरी जाणतो. धानासाठी पोषक वातावरण असल्यामुळे शेतकरी रबी व खरिप दोन्ही हंगामाता धानच जास्त प्रमाणात काढतो. यात रबी हंगाम तर सिंचनाच्या माध्यमातून निघतो. मात्र शेतकऱ्यांची खरी परिक्षा असते ती खरिपात. त्याचे असे की, खरिपाचा हंगाम पावसावर घेतला जातो. या हंगामात पाऊस नाही पडला तर शेतकरी फसतो व पाऊस जास्त पडला तरी शेतकरी फसतो. पावसामुळे धानाचे उत्पादन घटते व वाढते. यामुळेच शेतकऱ्यांचा कल आता अन्य पिकांकडे वळत चालला आहे. परिणामी जिल्ह्यात धान लागवडीचे क्षेत्र दरवर्षी कमी-जास्त होत असल्याचे दिसते. तर याचा प्रभाव धान उत्पादनावर पडत असून त्याचा आलेखही बदलताच दिसून येतो. निसर्गाचा यात मोठा प्रभाव जाणवत असून निसर्गाच्या किमयेवरच धान उत्पादनाचा हा खेळ सुरू असल्याचे कृषी विभागाच्या आकडेवारीतून दिसून येतो. प्राप्त आकडेवारीनुसार, सन २०१०-११ मध्ये खरिपात एक लाख ८८हजार ८२६ हेक्टर क्षेत्रात चार लाख ७२ हजार४८३ मेट्रीक टन धानाचे उत्पादन झाले होते. सन २०११-१२ मध्ये हे क्षेत्र घटून एक लाख ८१ हजार ८६७ हेक्टरवर आले व उत्पादन चार लाख ४९ हजार ३१७ मेट्रीक टन झाले. सन २०१२-१३ मध्ये पुन्हा एक लाख ८८ हजार ८७० हेक्टर क्षेत्रात पाच लाख ३० हजार ७५० मेट्रीक टन उत्पादन घेण्यात आले. सन २०१३-१४ मध्ये एक लाख ८७ हजार ८५० हेक्टर क्षेत्रात चार लाख २४ हजार १५९ मेट्रीक टन धानाचे उत्पादन घेण्यात आले. तर यंदा क्षेत्र वाढले असून एक लाख ८८ हजार ९७६ पाच लाख मेट्रीक टन धान उत्पादनाचा कृषी विभागाचा अंदाज आहे. एकंदर दरवर्षी लागवड क्षेत्र व उत्पादन बदलत चालल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे यात मागील वर्षी आलेल्या अतिवृष्टीमुळे धानाचे उत्पादन अन्य वर्षांच्या तुलनेत कमी झाल्याचेही दिसून येते.