शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
3
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
4
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
5
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
6
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
7
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
8
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
9
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
10
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
11
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
12
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
13
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
14
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
15
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
16
IPL 2025: आयपीएलमध्ये सर्वात जलद अर्धशतक ठोकणारे ५ कॅरेबियन खेळाडू, पाहा फोटो
17
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
18
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
19
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
20
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा

जिल्ह्यात धानाचे उत्पादन अस्थिर

By admin | Updated: December 2, 2014 23:08 IST

धानासाठी जिल्ह्याची दूरवर ख्याती असली तरिही या धानासाठी घ्यावी लागणारी जोखमी मात्र त्या शेतकऱ्यालाच माहिती आहे. शेती हा प्रकारच निसर्गावर अवलंबून असला तरी यात खरिपाचा

गोंदिया : धानासाठी जिल्ह्याची दूरवर ख्याती असली तरिही या धानासाठी घ्यावी लागणारी जोखमी मात्र त्या शेतकऱ्यालाच माहिती आहे. शेती हा प्रकारच निसर्गावर अवलंबून असला तरी यात खरिपाचा हंगाम म्हटला तर जोखीम दुतर्फा असते. यामुळेच शेतकऱ्यांचा कल अन्य पिकांकडे वाढत चालला आहे. परिणामी धान लागवडीचे क्षेत्र व त्यामुळे उत्पादनही बदलत चालले आहे. हाच निष्कर्ष कृषी विभागाकडे असलेल्या खरिपाच्या आकडेवारीनरून दिसून येत आहे. यामुळेच धानाच्या जिल्ह्यातच धानाचे उत्पादन अस्थिर असल्याचे दिसून येत आहे. नवनवीन तंत्रज्ञान येत असल्याने प्रत्येकच क्षेत्रात आज क्रांती झाली आहे. रोवणी पासून तर पिकांची कापणी व मळणी करिता मानवाने यंत्र तयार केले आहेत. एवढी ही प्रगती झाली असली तरी या सर्वांवर निसर्गच सर्व शक्तीमान आहे आणि हे निसर्ग दरवर्षी दाखवून देते. त्याचे असे की, धान उत्पादनासाठी जिल्हा नावाजलेला आहे. धानाचे कोठार म्हणून जिल्ह्याची ख्याती आहे. मात्र धानासाठी घ्यावी लागणारी मेहनत व त्यामागची जोखीम ही बाब केवळ तो शेतकरी जाणतो. धानासाठी पोषक वातावरण असल्यामुळे शेतकरी रबी व खरिप दोन्ही हंगामाता धानच जास्त प्रमाणात काढतो. यात रबी हंगाम तर सिंचनाच्या माध्यमातून निघतो. मात्र शेतकऱ्यांची खरी परिक्षा असते ती खरिपात. त्याचे असे की, खरिपाचा हंगाम पावसावर घेतला जातो. या हंगामात पाऊस नाही पडला तर शेतकरी फसतो व पाऊस जास्त पडला तरी शेतकरी फसतो. पावसामुळे धानाचे उत्पादन घटते व वाढते. यामुळेच शेतकऱ्यांचा कल आता अन्य पिकांकडे वळत चालला आहे. परिणामी जिल्ह्यात धान लागवडीचे क्षेत्र दरवर्षी कमी-जास्त होत असल्याचे दिसते. तर याचा प्रभाव धान उत्पादनावर पडत असून त्याचा आलेखही बदलताच दिसून येतो. निसर्गाचा यात मोठा प्रभाव जाणवत असून निसर्गाच्या किमयेवरच धान उत्पादनाचा हा खेळ सुरू असल्याचे कृषी विभागाच्या आकडेवारीतून दिसून येतो. प्राप्त आकडेवारीनुसार, सन २०१०-११ मध्ये खरिपात एक लाख ८८हजार ८२६ हेक्टर क्षेत्रात चार लाख ७२ हजार४८३ मेट्रीक टन धानाचे उत्पादन झाले होते. सन २०११-१२ मध्ये हे क्षेत्र घटून एक लाख ८१ हजार ८६७ हेक्टरवर आले व उत्पादन चार लाख ४९ हजार ३१७ मेट्रीक टन झाले. सन २०१२-१३ मध्ये पुन्हा एक लाख ८८ हजार ८७० हेक्टर क्षेत्रात पाच लाख ३० हजार ७५० मेट्रीक टन उत्पादन घेण्यात आले. सन २०१३-१४ मध्ये एक लाख ८७ हजार ८५० हेक्टर क्षेत्रात चार लाख २४ हजार १५९ मेट्रीक टन धानाचे उत्पादन घेण्यात आले. तर यंदा क्षेत्र वाढले असून एक लाख ८८ हजार ९७६ पाच लाख मेट्रीक टन धान उत्पादनाचा कृषी विभागाचा अंदाज आहे. एकंदर दरवर्षी लागवड क्षेत्र व उत्पादन बदलत चालल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे यात मागील वर्षी आलेल्या अतिवृष्टीमुळे धानाचे उत्पादन अन्य वर्षांच्या तुलनेत कमी झाल्याचेही दिसून येते.