शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: पायलट म्हणाला, 'तू फ्यूल बंद का केलं?'; एअर इंडिया विमान अपघाताबद्दल स्फोटक माहिती आली समोर
2
Radhika Yadav : "इथे खूप बंधनं, मला जीवनाचा आनंद घ्यायचाय..."; राधिकाचं कोचसोबतचं WhatsApp चॅट समोर
3
Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - १२ जुलै २०२५; नशिबाची उत्तम साथ; यश व कीर्ती लाभेल, आनंदवार्ता मिळेल
4
मोठी बातमी! कोट्यवधींचे महाघोटाळे, बोगस भरतीही; शनि शिंगणापूर मंदिर ट्रस्ट बरखास्त
5
शिंदेसेना वादात, विरोधकांना संधी; आमदारांच्या व्हायरल व्हिडिओमुळे एकनाथ शिंदेंची पंचाईत
6
होमिओपॅथीची नोंद एमएमसीमध्ये करायची की नाही?; तज्ज्ञ समिती करणार अभ्यास
7
बीकेसी ते शिळफाट्यादरम्यान बुलेट ट्रेनसाठीचा बोगदा पूर्ण; प्रकल्पाला मिळणार गती
8
अखेर ६ दिवसांनी बोया सापडला पण सर्च ऑपरेशनमध्ये आढळल्या ९२४ बेकायदा मच्छीमार बोटी
9
कुजबुज! उपमुख्यमंत्र्यांच्या कपाटात दडलं काय?; आमदारांचे PA, कार्यकर्त्यांचे लक्ष वेधले
10
कॅनडावरील टॅरिफ वाढवून केला ३५%; अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा
11
मतदार याद्यातील घोळ, घुसखोरी आणि गोंधळ; घोळ निस्तरणे निवडणूक आयोगाला शक्य होत नाही
12
...तर गो बॅक टू द थर्ड वर्ल्ड; न्यू यॉर्कमध्ये हाताने बिर्याणी खाल्ली, काय बिघडले?
13
फास्टॅग नीट न लावल्यास चालक ब्लॅकलिस्टमध्ये; तुम्हीही वाहन चालवताना करता का 'ही' चूक?
14
Video : शिवाजीनगर येथे पीएमटी बसला आग;नागरिकांच्या तत्परतेने टळली जीवितहानी
15
Wimbledon 2025: अल्काराझनं सलग तिसऱ्यांदा गाठली फायनल! नदालनंतर अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा
16
दोन भिन्न वंशावळी न्यायालयात का सादर केल्या गेल्या? सात्यकी सावरकर यांनी याचा खुलासा करावा
17
नवऱ्याने रागाच्या भरात बायकोच्या नाकाचा घेतला चावा, झाले दोन तुकडे... नेमकं घडलं तरी काय?
18
"जनसुरक्षा विधेयका'चं नाव 'भाजप सुरक्षा विधेयक' करायला हवं"; मिसा, टाडाचा उल्लेख करत उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल
19
Video: तुफान राडा ! आधी 'कॅप्टन' गिल पंचांशी भांडला, मग सिराजचाही पारा चढला, काय घडलं?
20
“नव्या कायद्याची गरज का? जनतेच्या मनातील संभ्रम...”; जनसुरक्षा विधेयकाला काँग्रेसचा विरोध

जिल्ह्यात धानाचे उत्पादन अस्थिर

By admin | Updated: December 2, 2014 23:08 IST

धानासाठी जिल्ह्याची दूरवर ख्याती असली तरिही या धानासाठी घ्यावी लागणारी जोखमी मात्र त्या शेतकऱ्यालाच माहिती आहे. शेती हा प्रकारच निसर्गावर अवलंबून असला तरी यात खरिपाचा

गोंदिया : धानासाठी जिल्ह्याची दूरवर ख्याती असली तरिही या धानासाठी घ्यावी लागणारी जोखमी मात्र त्या शेतकऱ्यालाच माहिती आहे. शेती हा प्रकारच निसर्गावर अवलंबून असला तरी यात खरिपाचा हंगाम म्हटला तर जोखीम दुतर्फा असते. यामुळेच शेतकऱ्यांचा कल अन्य पिकांकडे वाढत चालला आहे. परिणामी धान लागवडीचे क्षेत्र व त्यामुळे उत्पादनही बदलत चालले आहे. हाच निष्कर्ष कृषी विभागाकडे असलेल्या खरिपाच्या आकडेवारीनरून दिसून येत आहे. यामुळेच धानाच्या जिल्ह्यातच धानाचे उत्पादन अस्थिर असल्याचे दिसून येत आहे. नवनवीन तंत्रज्ञान येत असल्याने प्रत्येकच क्षेत्रात आज क्रांती झाली आहे. रोवणी पासून तर पिकांची कापणी व मळणी करिता मानवाने यंत्र तयार केले आहेत. एवढी ही प्रगती झाली असली तरी या सर्वांवर निसर्गच सर्व शक्तीमान आहे आणि हे निसर्ग दरवर्षी दाखवून देते. त्याचे असे की, धान उत्पादनासाठी जिल्हा नावाजलेला आहे. धानाचे कोठार म्हणून जिल्ह्याची ख्याती आहे. मात्र धानासाठी घ्यावी लागणारी मेहनत व त्यामागची जोखीम ही बाब केवळ तो शेतकरी जाणतो. धानासाठी पोषक वातावरण असल्यामुळे शेतकरी रबी व खरिप दोन्ही हंगामाता धानच जास्त प्रमाणात काढतो. यात रबी हंगाम तर सिंचनाच्या माध्यमातून निघतो. मात्र शेतकऱ्यांची खरी परिक्षा असते ती खरिपात. त्याचे असे की, खरिपाचा हंगाम पावसावर घेतला जातो. या हंगामात पाऊस नाही पडला तर शेतकरी फसतो व पाऊस जास्त पडला तरी शेतकरी फसतो. पावसामुळे धानाचे उत्पादन घटते व वाढते. यामुळेच शेतकऱ्यांचा कल आता अन्य पिकांकडे वळत चालला आहे. परिणामी जिल्ह्यात धान लागवडीचे क्षेत्र दरवर्षी कमी-जास्त होत असल्याचे दिसते. तर याचा प्रभाव धान उत्पादनावर पडत असून त्याचा आलेखही बदलताच दिसून येतो. निसर्गाचा यात मोठा प्रभाव जाणवत असून निसर्गाच्या किमयेवरच धान उत्पादनाचा हा खेळ सुरू असल्याचे कृषी विभागाच्या आकडेवारीतून दिसून येतो. प्राप्त आकडेवारीनुसार, सन २०१०-११ मध्ये खरिपात एक लाख ८८हजार ८२६ हेक्टर क्षेत्रात चार लाख ७२ हजार४८३ मेट्रीक टन धानाचे उत्पादन झाले होते. सन २०११-१२ मध्ये हे क्षेत्र घटून एक लाख ८१ हजार ८६७ हेक्टरवर आले व उत्पादन चार लाख ४९ हजार ३१७ मेट्रीक टन झाले. सन २०१२-१३ मध्ये पुन्हा एक लाख ८८ हजार ८७० हेक्टर क्षेत्रात पाच लाख ३० हजार ७५० मेट्रीक टन उत्पादन घेण्यात आले. सन २०१३-१४ मध्ये एक लाख ८७ हजार ८५० हेक्टर क्षेत्रात चार लाख २४ हजार १५९ मेट्रीक टन धानाचे उत्पादन घेण्यात आले. तर यंदा क्षेत्र वाढले असून एक लाख ८८ हजार ९७६ पाच लाख मेट्रीक टन धान उत्पादनाचा कृषी विभागाचा अंदाज आहे. एकंदर दरवर्षी लागवड क्षेत्र व उत्पादन बदलत चालल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे यात मागील वर्षी आलेल्या अतिवृष्टीमुळे धानाचे उत्पादन अन्य वर्षांच्या तुलनेत कमी झाल्याचेही दिसून येते.