शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
3
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
4
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
5
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
6
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
7
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
8
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
9
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
10
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
11
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
12
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
13
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
14
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
15
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
16
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
17
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
18
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
19
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
20
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत

आता ९० टक्के उच्च वंशावळीच्या मादी वासरांची निर्मिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:23 IST

नरेश रहिले गोंदिया : शेतीत तंत्रज्ञानाचा वापर होऊ लागल्याने बैल किंवा रेड्यांच्या माध्यमातून शेती करणे आता शेतकरी पसंत करीत ...

नरेश रहिले

गोंदिया : शेतीत तंत्रज्ञानाचा वापर होऊ लागल्याने बैल किंवा रेड्यांच्या माध्यमातून शेती करणे आता शेतकरी पसंत करीत नाही. त्यामुळे शेतीच्या कामात उपयोगात न येणाऱ्या बैलांना पोसणे शेतकऱ्यांना कठिण झाले आहे. यानंतर बैलांची संख्या कमी करण्यासाठी व दूध देणाऱ्या गायींचीच संख्या वाढविण्यासाठी आता ९० टक्के उच्च वंशावळीच्या मादी वासरांची निर्मिती केली जाणार आहे. या उपक्रमाला गोंदियात सुरूवात झाल्याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. कांतीलाल पटले यांनी दिली.

शेतकऱ्यांकडील गाई-म्हशींची कृत्रिम रेतन कार्यक्रमासाठी लिंग विनिश्चित वीर्यमात्रा उच्च अनुवांशिकतेच्या कालवडी यांची निर्मिती करण्यात येणार आहे. यामध्ये गोंदिया जिल्ह्यात आता ९० टक्के उच्च वंशावळीच्या मादी वासरांची निर्मिती होणार आहे. ही वीर्यमात्रा फक्त ८० रुपयांना उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाने ग्रामीण भागातील कष्टकरी, शेतकरी यांची आर्थिक उन्नती होण्यास मदत होणार आहे. शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावणार आहे. पशुसंवर्धन विभागाने हा निर्णय घेतला आहे. फिरते पशुचिकित्सालयद्वारे व पशुसंवर्धन विभागाच्या प्रत्येक अधिकारी, कर्मचारी यांच्यामार्फत या उपक्रमांची माहिती शेवटच्या घटकापर्यंत पोहचविली जात आहे.

..........

संगोपनाचा खर्च होणार कमी

सन २०१७ च्या २० व्या पशुगणनेनुसार राज्यामध्ये निसर्ग नियमानुसार सरासरी ५० टक्के नर व ५० टक्के मादींचे प्रमाण होते. राज्यात संपूर्ण गोवंश हत्या बंदी कायदा लागू करण्यात आला आहे. तसेच शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञान व यांत्रिकीकरणामध्ये वाढ झाल्याने शेती कामाकरिता उपयोगी असलेल्या बैलांची आवश्यकता कमी झाली आहे. त्यामुळे कृत्रिम रेतनाद्वारे जन्मास येणाऱ्या अतिरिक्त नर वासरांचे संगोपन करण्यासाठी पशुपालकांना अनावश्यक खर्च सोसणे भाग पडत होते. ते आता अत्यल्प होणार आहेत.

...........

दुग्ध उत्पादन वाढविण्यावर भर

नर वासरांची पैदास न्यूनतम पातळी ठेवण्याचे हेतूने पारंपरिक वीर्यमात्रा लिंग विनिश्चित वीर्यमात्रा या नवीन अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादित केलेल्या वीर्य मात्रांचे क्षेत्रीय स्तरावर गाई म्हशींमध्ये कृत्रिम रेतन करून ९० टक्के मादी वासरांची निर्मिती करणे शक्य होईल. क्षेत्रीय स्तरावर गाई-म्हशींचा कृत्रिम रेतनासाठी वापर करणे शक्य होत नव्हते, पशुसंवर्धन विभागाच्या महाराष्ट्र पशुसंवर्धन विकास विभागाने ९० टक्के उच्च वंशावळीच्या मादी वासरांची निर्मिती करून भविष्यात दुग्ध उत्पादन वाढविणार आहेत.