शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
2
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
3
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
4
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
5
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
6
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
7
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
8
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
9
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
10
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
11
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
12
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
13
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
14
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
15
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
16
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
17
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
18
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
19
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
20
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?

शहरात वाढतेय प्रदूषणाची समस्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2019 21:57 IST

पावसाळा गोंदिया जिल्हावासीयांसाठी तापदायकच ठरतो़ पावसाळ्यातही कुठे पाणी तुंबते, तर खड्ड्यांनी शहराची चाळण होते़ मात्र या पावसाळ्यात नगर परिषदेकडून पावसाळा पूर्वीची कामे करणे जोमाने सुरू आहेत़ त्यामुळे यंदाचा पावसाळा गोंदिया शहरवासीयांसाठी दिलासा देणारा ठरेल, अशी ग्वाही नगरपरिषद देत आहे.

ठळक मुद्देसावधान : कारखान्यामुळे प्रदूषणात वाढ, समस्येकडे दुर्लक्ष, यंत्रणेचा अभाव

जागतिक पर्यावरण दिनलोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : पावसाळा गोंदिया जिल्हावासीयांसाठी तापदायकच ठरतो़ पावसाळ्यातही कुठे पाणी तुंबते, तर खड्ड्यांनी शहराची चाळण होते़ मात्र या पावसाळ्यात नगर परिषदेकडून पावसाळा पूर्वीची कामे करणे जोमाने सुरू आहेत़ त्यामुळे यंदाचा पावसाळा गोंदिया शहरवासीयांसाठी दिलासा देणारा ठरेल, अशी ग्वाही नगरपरिषद देत आहे. परंतु येत्या काही दिवसांतच पावसाळा सुरू होत असल्याने चित्र स्पष्ट होईल़पावसाळ्याला घेऊन गोंदिया नगर परिषदेतर्फे नियोजन करण्यात आले. ग्रामीण भागातही ग्रामपंचायतींच्या माध्यमातून मान्सून पूर्व तयारी केली जाते. परंतु दरवर्षी कितीही तयार केली जात असली तरी पहिल्या पावसातच नगर परिषदेची पोलखोल होते. गोंदियातील रस्त्यांवर असलेले व्यापाऱ्यांचे अतिक्रमण हा मुद्दा देखील गोंदिया शहराच्या विकास कामांना अडथळा घालणारा असतो. गोंदियाच्या बाजार परिसरातील नाल्यांमध्ये व्यापारी वर्गाकडून प्लास्टीक टाकण्यात येत असल्यामुळे नाल्यांमध्ये गाळ साचून राहतो. दुकानासमोरील नाल्यांवर सिमेंट कॉँक्रीटचे झाकण व्यापाऱ्यांनी बसविल्यामुळे त्या ठिकाणच्या नालीतील घाण नगर परिषदेला काढता येत नाही. नगर परिषदेने नाल्या स्वच्छ करण्याचा माणस जरी लावल्याचे दाखविले तर त्या काळापूरता आपला व्यवसाय बुडेल हे गृहीत धरून व्यापारी वर्ग आपल्या संबधीत लोकप्रतिनिधींना बोलतात. ते लोकप्रतिनिधी व्यापाºयांच्या सोयीसाठी नाल्यास्वच्छतेकडे दुर्लक्ष करा असा अलिखीत फतवा काढतात. नगर परिषदेच्या हद्दीत लाखोची वाहने आहेत. परंतु या वाहनांतून निघणाºया धुरावर आळा घालण्यासाठी नगर परिषदेने वृक्षारोपणाची योजना राबविली नाही. रस्त्याच्या बाजूला झाडे लावली नाही. गोंदिया शहर हिरवेगार दिसण्याऐवजी सिमेंट कांक्रीटचे जंगल दिसत आहे. वाहनांमधून बाहेर पडणाºया धूरामुळे मोठ्या प्रमाणात वायू प्रदूषणात वाढ होत आहे. गोंदियातील घाणीच्या साम्राज्यामुळे अनेक ठिकाणचे जलस्त्रोत दूषित आहेत.प्रशासन काय उपाय करतेय?पावसाळा म्हटला की गोंदिया शहरवासीयांना नाकीनऊ आणणारा काळच ठरतो. तुंबलेल्या नाल्या, रस्त्यांवर साचलेले पाणी व जागोजागी चिखल अशात शहरवासीयांना हा काळ घालवावा लागतो. त्यामुळे पावसाळा एकप्रकारे शहरवासीयांना नकोसाच होतो. यंदा मात्र शहरवासीयांना पावसाळा जास्त त्रासदायक ठरू नये यादृष्टीने नगर परिषद यावर तोडगा म्हणून काही उपाय करीत आहे. यंदाच्या पावसाळ््यात पावसाचे पाणी नाल्यांत तुंबू नये यासाठी मान्सून पूर्व सफाई अभियानातून मोठे नाले व अंतर्गत लहान नाल्यांची सफाई केली जात आहे. जेसीबी व पोकलॅन मशीनसह मजुरांची एक टीमच नाली सफाईच्या कामासाठी लावण्यात आली आहे. रस्त्यांवर पाणी साचू नये यासाठीही उपाययोजना केल्या जात आहेत. विशेष म्हणजे, यंदा नगर परिषदेने शहरातील विविध प्रभागांत सुमारे २२ कोटींच्या रस्त्यांचे बांधकाम केले आहे. त्यामुळे शहरातील पूर्वी सारखी असलेली स्थिती यंदा निर्माण होणार नाही हे स्पष्ट दिसून येत आहे. तरिही काही भागात पावसाच्या पाण्यामुळे काही त्रास उद्भवल्यास नगर परिषद प्रशासन त्यावर तोडगा काढण्यासाठी तत्पर आहे. स्वच्छता विभागाला याबाबत तसे निर्देश देण्यात आले असून नगराध्यक्ष, पदाधिकारी व मुख्याधिकारी नजर ठेवून राहतील.४७०० वृक्ष लागवडीचे टार्गेटपावसाळ्यातील आपात्कालीन व्यवस्थापन विभागातर्फे मान्सूनपूर्व काळात घेण्यात आलेल्या विविध उपाययोजनांचे नियोजन करण्यात आले आहे.नगर परिषदेने पावसाळा बघता मान्सून पूर्व सफाई अभियान राबविण्यास सुरूवात केली आहे. यांतर्गत शहरातील मोठे नाले जेसीबी व पोकलॅन मशीन लावून सफाई केली जात आहे.याशिवाय मॉन्सून पूर्व सफाई अभियानांतर्गत कंत्राटी तत्वावर माणसे घेवून शहरातील अंतर्गत नाल्यांची सफाई करविली जात आहे. जेणेकरून पावसाचे पाणी शहरात साचून राहू नये.वाढते तापमान बघता यावर तोडगा म्हणून राज्य शासनाकडून राबविण्यात येत असलेल्या वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत नगर परिषद हातभार लावत असून शहारात वृक्ष लागवड केली जाणार आहे.यंदा नगर परिषदेला चार हजार ७०० रोपट्यांची लागवड करण्याचे उद्दीष्ट देण्यात आले आहे. त्यानुसार, नगर परिषद नियोजन करीत आहे.