शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासाठी १९ इनोव्हा मागवल्या, डिझेल भरायला गेल्या आणि पाणी भरून आल्या...
2
" हा तर गमावलेली राजकीय स्पेस मिळवण्याचा प्रयत्न, यांना मराठी भाषेशी…’’, ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चाची भाजपाकडून खिल्ली
3
जगन्नाथ रथयात्रेत मोठी घटना टळली! १८ हत्तींचे नेतृत्व करणाराच हत्ती बिथरला, अन्...
4
चीनमध्ये गाढवे का गायब होत आहेत? ५८,००० कोटी रुपयांचा व्यवसाय संकटात? काय आहे प्रकरण?
5
Maharashtra Politics : "मला खूप आनंद झाला, सुरुवात चांगली झाली"; ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चावर मनसे नेत्याने स्पष्टच सांगितलं
6
Rohit Pawar: ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर...; रोहित पवारांचं सूचक ट्वीट!
7
₹२ च्या मजुरीपासून ते ₹२००० कोटींच्या मालक; पद्मश्री मिळवणाऱ्या अकोल्याच्या कल्पना सरोज यांचा कसा होता प्रवास
8
"मराठी माणसाच्या हितासाठी..." मनसे प्रमुख राज ठाकरेंचा संजय राऊतांना फोन, काय झाला संवाद?
9
मोठी बातमी! हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्र येणार, मुंबईत एकच मोर्चा काढणार, संजय राऊत यांची घोषणा
10
Sonam Raghuvanshi : आरोपींनी पोलिसांसमोर गुन्हा कबुल केला, पण न्यायाधीशांसमोर वेगळंच सांगितलं; राजा रघुवंशी प्रकरणात नवा ट्विस्ट
11
नोएल टाटांनी करुन दाखवलं! अशी कामगिरी करणारा टाटा ग्रुप पहिलाच भारतीय ब्रँड; दुसरा-तिसरा कोण?
12
Mumbai: पालकांनो लक्ष द्या! १ जुलैपासून तुमच्या मुलांना घ्यायला व सोडवायला शाळेची बस न येण्याची शक्यता
13
...म्हणून मुलांना जन्म देण्यास टाळाटाळ करताहेत भारतीय जोडपी, समोर आलं धक्कादायक कारण
14
मराठी समाज विभागलाय, मुंबईत उत्तर भारतीय महापौर बनवण्याची हीच वेळ; सुनील शुक्लानं मांडलं गणित
15
Harjit Kaur: दुचाकीवरून आले अन् धाडधाड गोळ्या झाडल्या, कुख्यात गुन्हेगाराच्या आईची भररस्त्यात हत्या
16
ट्रेनच्या तिकिटांपासून ते ATM मधून पैसे काढण्यापर्यंत; १ जुलैपासून बदलणार तुमच्या पैशांशी निगडित 'हे' ६ नियम
17
पुण्यातील महिलेला ५ कोटींची पोटगी मिळालेली; NRI च्या भानगडीत पडली आणि...
18
Maratha Reservation Supreme Court: मराठा आरक्षणावर आता जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात सुनावणी
19
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, Sensex १५० अंकांनी वधारला; Tata Motors, Reliance, HCL Tech मध्ये तेजी
20
Prada : कोल्हापुरी चप्पलसाठी संभाजीराजे मैदानात; फेसबुक पोस्ट करुन केली मोठी मागणी

खासगी शाळा पालिकेच्या शाळांवर वरचढ

By admin | Updated: June 20, 2017 00:51 IST

दहावीचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला असून यात कित्येक खासगी शाळांनी १०० टक्के निकाल दिला आहे.

एकाही शाळेचा १०० टक्के निकाल नाही : शिक्षणावरील कोट्यवधींचा खर्च पाण्यातलोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : दहावीचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला असून यात कित्येक खासगी शाळांनी १०० टक्के निकाल दिला आहे. तर दुसरीकडे मात्र पालिकेच्या शाळा १०० टक्के निकालापासून नेहमीप्रमाणे वंचित आहेत. नगर परिषद व शासनाकडून नगर परिषदेच्या शाळांवर कोट्यवधींचा खर्च केला जात आहे. मात्र निकालाची ही टक्केवारी बघता कोट्यवधींचा हा खर्च पाण्यात जात असल्याचे म्हणणे वावगे ठरणार नाही. दहावीच्या परीक्षेत एकेवेळी बोर्डाचे टॉपर देणारी नगर परिषदेची म्युनिसिपल हायस्कूल म्हणून ओळखली जात होती. कालांतराने मात्र नगर परिषदेच्या या शाळांचा दर्जा खालावत चालला आहे. १०० टक्के तर सोडाच मात्र ९० टक्केच्यावर निकाल देण्यात या शाळा असमर्थ ठरत असल्याची वास्तविकता बघावयास मिळत आहे. हेच कारण आहे की, पालकांचा कल आता खासगी शाळांकडे वाढला असून नगर परिषदेच्या शाळांत आपल्या अपत्यांना टाकण्यास त्यांची अनिच्छा दिसते. खासगी शाळांतील नाममात्र पगारावर काम करणारे शिक्षक त्यांच्या शाळेचा निकाल १०० टक्के देत आहेत. तर उलट गलेलठ्ठ पगार घेऊनही पालिकेच्या शाळांतील शिक्षक मात्र अपयशी ठरत आहेत. अशात खासगी शाळांतील मोजक्या पगारावर काम करणारे शिक्षक जास्त गुणवंत आहेत, असे आता जनताच बोलत आहे. शासन व पालिकेकडून शाळांवर नाहीतरी कोट्यवधींच्या घरात खर्च केला जात आहे. याशिवाय विद्यार्थ्यांना अन्य सुविधा दिल्या जात आहेत. एवढ्यावरही नगर परिषदेच्या शाळांचा दर्जा काही वाढत नसल्याचे दिसते. जिल्हा परिषदेच्या शाळांची गत नगर परिषदेच्या शाळांसारखीच होती. जिद्द व चिकाटीमुळे आता जिल्हा परिषदेच्या शाळा खाजगी शाळांना टक्कर देत आहेत. मात्र नगर परिषदेच्या शाळांची स्थिती आहे तीच आहे. पटसंख्या बोटावर मोजण्या एवढीच असून तेवढ्या विद्यार्थ्यांकडूनही पाहिजे तसा निकाल काढण्यात शिक्षक अपयशी ठरत असल्याचे दिसून येत आहे. अशात भविष्यात नगर परिषदेच्या या शाळांचा वाली कोण असा प्रश्न येथे उपस्थित होतो. बोटावर मोजण्याएवढे विद्यार्थी नगर परिषद शाळांतील निकालाची ही स्थिती बघता शाळांत शिक्षणाची काय गत आहे हे दिसून येते. तर पटसंख्येची स्थितीही यापासून वेगळी नाही. पालिकेच्या कॉन्व्हेट व प्राथमिक शाळांत तर एक-दोन विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शिवाय माध्यमिक शाळांतील आकडेवारीही परीक्षा देणाऱ्या विद्यार्थी संख्येवरून दिसून येते. यातून पालिकेच्या शाळांची स्थिती किती गंभीर दिसून येते. पालिकेच्या या स्थितीला नगर परिषद प्रशासन व पदाधिकारीही तेवढेच जबाबदार आहेत. या शाळांची स्थिती सुधारण्यासाठी शाळांवर लगाम कसणे गरजेचे आहे. अन्यथा भविष्यात शाळांत शिक्षक तर राहतील मात्र विद्यार्थी राहणार नाहीत. मुलींनीच मारली बाजी नगर परिषदेच्या पाच माध्यमिक शाळा शहरात आहेत. यात येथील एस.एस. गर्ल्स शाळेने सर्वाधिक ९२.६६ टक्के निकाल देऊन बाजी मारली आहे. येथील १०९ मुलींनी परीक्षा दिली होती व त्यात १०१ मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. शिवाय म्युनिसीपल हायस्कूलमधून ११८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती व त्यातील ८६ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन ७२.८८ टक्के निकाल आहे. रामनगर म्युनिसीपल शाळेतून २९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती व १० विद्यार्थी उत्तीर्ण होऊन ३४.४८ टक्के निकाल दिला आहे. म्युनिसीपल हायर शाळेतून १२४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती व १११ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून ८९.५१ टक्के निकाल दिला. तर माताटोली शाळेतील ३२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असून १३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले व ४०.६७ टक्के निकाल दिला आहे.