शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

राजीव गांधी जीवनदायी योजनेला खासगी रुग्णालयांचा ठेंगा

By admin | Updated: August 30, 2014 01:51 IST

शासनाच्या महत्वाकांक्षी राजीव गांधी जीवनदायी योजनेचा लाभ खासगी रुग्णालयांमध्ये जाणाऱ्या रुग्णांना होतच नाही.

गोंदिया : शासनाच्या महत्वाकांक्षी राजीव गांधी जीवनदायी योजनेचा लाभ खासगी रुग्णालयांमध्ये जाणाऱ्या रुग्णांना होतच नाही. गोंदियात एका रुग्णालयाने चक्क या योजनेचे बिल थकीत असल्यामुळे या योजनेतून उपचार केले जाणार नाही, असा बोर्ड लावला आहे. त्यामुळे तेथे जाणाऱ्या रूग्न आल्यापावली परत जात असल्याच्या घटना होत आहेत. राजीव गांधी जीवनदायी योजनेंतर्गत एकूण ९७२ रोगांवर उपचार केले जाते. पाच हजार रूपये ते दीड लाख रूपयांपर्यंतचा मोफत उपचार या योजनेतून केला जातो. गोरगरीब जनतेजवळ मोठ्या आजारांवर उपचार करण्यासाठी पैसा नसतो. त्यामुळे शासनाने राजीव गांधी जीवनदायी योजनेचा शुभारंभ करून गरीबांना आजारांवर मोफत उपचार करून देण्याची संधी दिली. मात्र शासनाकडून निधी मिळत नसल्याचे सांगून खासगी रूग्णांलयांनी चक्क राजीव गांधी जीवनदायी योजनेंतर्गत उपचार केला जाणार नाही, असे बोर्डच आपल्या रूग्णालयात लावले आहे. त्यामुळे गरीब रूग्णांनी काय करावे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. गोंदिया जिल्ह्यातील रूग्णांवर राजीव गांधी जीवनदायी योजनेंतर्गत मोफत उपचार करण्यासाठी शासनाने गोंदिया शहरातील पाच रूग्णांलयांचा अंतर्भाव केलेला आहे. यात दोन शासकीय तर तीन खासगी रूग्णालयांचा समावेश आहे. केटीएस जिल्हा सामान्य रूग्णालय व बाई गंगाबाई महिला रूग्णालय या दोन शासकीय तर सेंट्रल हॉस्पिटल व इतर दोन खासगी रूग्णालयात या योजनेंतर्गत उपचार केला जातो. शासकीय रूग्णालयात मोठ्या आजारांवर उपचार करण्याची व्यवस्था व तांत्रिक कौशल्य तोकडे आहेत. त्यामुळे काही रूग्ण खासगी रूग्णालयात असलेल्या राजीव गांधी जीवनदायी योजनेच्या कॅबिनमधील आरोग्य मित्रांकडे आपले रेशन कार्ड नेवून नोंदणी करून घेतात. मात्र खासगी रूग्णालयांनी शासनाकडून निधी मिळत नसल्याचे सांगून त्यांना आता ठेंगा दाखविला आहे. गोंदिया शहरातील डॉ. एल.एल. बजाज यांच्या सेंट्रल हॉस्पिटलमध्ये ‘राजीव गांधी योजना के अंतर्गत बिल न मिलने के कारण यह सुविधा बंद कर दी गई हैं’ असा बोर्ड आरोग्य मित्राच्या केबिनवरील भिंतीवर लावण्यात आला आहे. त्यामुळे रूग्णांना सदर योजनेंतर्गत आता या रूग्णालयात उपचार केला जात नाही, असे वाटून ते आल्यापावली परत जात आहेत. याबाबत सेंट्रल हॉस्पिटलचे मुख्य प्रशासकीय अधिकारी वेणीशंकर चन्ने यांच्याशी बातचित केली असता त्यांनी सांगितले की, गेल्या चार-पाच दिवसांपूर्वी शासनाने काही रूग्णांच्या बिलाचा भरणा केलेला आहे. मात्र अद्यापही दोन ते तीन रूग्णांच्या उपचाराचे बिल मिळालेले नाही. त्यामुळेच राजीव गांधी जीवनदायी योजनेंतर्गत सेंट्रल हॉस्पिटलमध्ये सेवा बंद करण्यात आल्याचा बोर्ड लावण्यात आला आहे. तरीपण या योजनेंतर्गत औषधोपचारासाठी कुणी रूग्ण आला तर त्याला परत न पाठविता उपचार केला जातो असे ते म्हणाले. परंतू प्रत्यक्षात या योजनेतून उपचार होत नसल्याच्या तक्रारी काही रुग्णांच्या नातेवाईकांनी केल्या. रूग्णाच्या औषधोपचारानंतर २४ तासाच्या आता त्याचे बिल व इतर कागदपत्रे तयार करून मंजुरीसाठी पाठविली जातात. शासनाने एक ते दीड महिन्याच्या आत ते बिल जमा करावे, असे निर्धारित आहे. मात्र त्यासाठी शासन विलंब करीत असल्यानेच ही समस्या उद्भवत आहे. या प्रकाराबाबत राजीव गांधी जीवनदायी योजनेचे जिल्हा व्यवस्थापक पोपट यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी मी सध्या सुटीवर असून बाहेरगावी आहे. त्यामुळे सध्या याबाबत काही सांगू शकत नाही, असे उत्तर दिले. (प्रतिनिधी)