शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
2
Pune Accident : पुण्यात डीजेच्या गाडीने सहा जणांना चिरडले, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू; सह जण जखमी
3
'ठाकरे गटाच्या पाच आणि शरद पवार यांच्या पक्षाच्या काही खासदारांनी क्रॉस व्होटिंग केले'; नव्या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
4
लोन घेणाऱ्यांसाठी दिलासा! 'या' सरकारी बँकेनं कर्जाचे दर केले स्वस्त, EMI चा भार होणार कमी
5
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
7
आरजेडीच्या नेत्याची हॉटेलमध्ये घुसून हत्या, विधानसभा निवडणूक लढवण्याची करत होता तयारी
8
केवळ ₹५ लाखांपासून ते ₹२.६४ कोटींचा प्रवास! आपल्या मुलांना द्या हे फायनान्शिअल फ्रीडमचं गिफ्ट; कम्पाऊंडींगची जादू पाहा
9
समीकरणे बदलली अन् अशी वाढत गेली ठाकरे बंधूंची जवळीक; युती होण्याच्या चर्चेने कार्यकर्त्यांत उत्सुकता
10
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
11
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार
12
अकरावी प्रवेशासाठी विशेष अंतिम फेरी आजपासून, १३ तारखेपर्यंत विद्यार्थ्यांना करता येणार अर्ज
13
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
14
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
15
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
16
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
17
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
18
‘डीवाय पाटील’ बीकेसीत उभारणार शैक्षणिक संकुल; दहा भूखंड भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय
19
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 
20
भाडेकरार, भाडेवाढीशिवाय घरे रिकामी करणार नाही; नायगाव बीडीडी प्रकल्पग्रस्तांचा म्हाडाला कडक इशारा

राजीव गांधी जीवनदायी योजनेला खासगी रुग्णालयांचा ठेंगा

By admin | Updated: August 30, 2014 01:51 IST

शासनाच्या महत्वाकांक्षी राजीव गांधी जीवनदायी योजनेचा लाभ खासगी रुग्णालयांमध्ये जाणाऱ्या रुग्णांना होतच नाही.

गोंदिया : शासनाच्या महत्वाकांक्षी राजीव गांधी जीवनदायी योजनेचा लाभ खासगी रुग्णालयांमध्ये जाणाऱ्या रुग्णांना होतच नाही. गोंदियात एका रुग्णालयाने चक्क या योजनेचे बिल थकीत असल्यामुळे या योजनेतून उपचार केले जाणार नाही, असा बोर्ड लावला आहे. त्यामुळे तेथे जाणाऱ्या रूग्न आल्यापावली परत जात असल्याच्या घटना होत आहेत. राजीव गांधी जीवनदायी योजनेंतर्गत एकूण ९७२ रोगांवर उपचार केले जाते. पाच हजार रूपये ते दीड लाख रूपयांपर्यंतचा मोफत उपचार या योजनेतून केला जातो. गोरगरीब जनतेजवळ मोठ्या आजारांवर उपचार करण्यासाठी पैसा नसतो. त्यामुळे शासनाने राजीव गांधी जीवनदायी योजनेचा शुभारंभ करून गरीबांना आजारांवर मोफत उपचार करून देण्याची संधी दिली. मात्र शासनाकडून निधी मिळत नसल्याचे सांगून खासगी रूग्णांलयांनी चक्क राजीव गांधी जीवनदायी योजनेंतर्गत उपचार केला जाणार नाही, असे बोर्डच आपल्या रूग्णालयात लावले आहे. त्यामुळे गरीब रूग्णांनी काय करावे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. गोंदिया जिल्ह्यातील रूग्णांवर राजीव गांधी जीवनदायी योजनेंतर्गत मोफत उपचार करण्यासाठी शासनाने गोंदिया शहरातील पाच रूग्णांलयांचा अंतर्भाव केलेला आहे. यात दोन शासकीय तर तीन खासगी रूग्णालयांचा समावेश आहे. केटीएस जिल्हा सामान्य रूग्णालय व बाई गंगाबाई महिला रूग्णालय या दोन शासकीय तर सेंट्रल हॉस्पिटल व इतर दोन खासगी रूग्णालयात या योजनेंतर्गत उपचार केला जातो. शासकीय रूग्णालयात मोठ्या आजारांवर उपचार करण्याची व्यवस्था व तांत्रिक कौशल्य तोकडे आहेत. त्यामुळे काही रूग्ण खासगी रूग्णालयात असलेल्या राजीव गांधी जीवनदायी योजनेच्या कॅबिनमधील आरोग्य मित्रांकडे आपले रेशन कार्ड नेवून नोंदणी करून घेतात. मात्र खासगी रूग्णालयांनी शासनाकडून निधी मिळत नसल्याचे सांगून त्यांना आता ठेंगा दाखविला आहे. गोंदिया शहरातील डॉ. एल.एल. बजाज यांच्या सेंट्रल हॉस्पिटलमध्ये ‘राजीव गांधी योजना के अंतर्गत बिल न मिलने के कारण यह सुविधा बंद कर दी गई हैं’ असा बोर्ड आरोग्य मित्राच्या केबिनवरील भिंतीवर लावण्यात आला आहे. त्यामुळे रूग्णांना सदर योजनेंतर्गत आता या रूग्णालयात उपचार केला जात नाही, असे वाटून ते आल्यापावली परत जात आहेत. याबाबत सेंट्रल हॉस्पिटलचे मुख्य प्रशासकीय अधिकारी वेणीशंकर चन्ने यांच्याशी बातचित केली असता त्यांनी सांगितले की, गेल्या चार-पाच दिवसांपूर्वी शासनाने काही रूग्णांच्या बिलाचा भरणा केलेला आहे. मात्र अद्यापही दोन ते तीन रूग्णांच्या उपचाराचे बिल मिळालेले नाही. त्यामुळेच राजीव गांधी जीवनदायी योजनेंतर्गत सेंट्रल हॉस्पिटलमध्ये सेवा बंद करण्यात आल्याचा बोर्ड लावण्यात आला आहे. तरीपण या योजनेंतर्गत औषधोपचारासाठी कुणी रूग्ण आला तर त्याला परत न पाठविता उपचार केला जातो असे ते म्हणाले. परंतू प्रत्यक्षात या योजनेतून उपचार होत नसल्याच्या तक्रारी काही रुग्णांच्या नातेवाईकांनी केल्या. रूग्णाच्या औषधोपचारानंतर २४ तासाच्या आता त्याचे बिल व इतर कागदपत्रे तयार करून मंजुरीसाठी पाठविली जातात. शासनाने एक ते दीड महिन्याच्या आत ते बिल जमा करावे, असे निर्धारित आहे. मात्र त्यासाठी शासन विलंब करीत असल्यानेच ही समस्या उद्भवत आहे. या प्रकाराबाबत राजीव गांधी जीवनदायी योजनेचे जिल्हा व्यवस्थापक पोपट यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी मी सध्या सुटीवर असून बाहेरगावी आहे. त्यामुळे सध्या याबाबत काही सांगू शकत नाही, असे उत्तर दिले. (प्रतिनिधी)