शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
९ वर्षांची मुलगी बेपत्ता झाल्याची बातमी अन्... विजयच्या रॅलीत ३६ जणांचा मृत्यू, पाण्याच्या बाटल्या फेकत होता अभिनेता
3
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
4
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
5
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
6
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
7
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
8
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
9
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
10
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
11
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
12
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
13
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
14
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
15
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
16
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
17
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
18
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
19
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
20
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद

जलयुक्त शिवारातून शेतीला प्राधान्य

By admin | Updated: June 14, 2017 00:35 IST

सन २०१९ पर्यंत राज्यातील गावे दुष्काळमुक्त करण्याचा संकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

राजकुमार बडोले : पाटेकुर्रात जलयुक्त कामाचे भूमिपूजन लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : सन २०१९ पर्यंत राज्यातील गावे दुष्काळमुक्त करण्याचा संकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. भात खाचरे दुरूस्ती, नाला खोलीकरण, बोडी नुतनीकरण, साठवण बंधाऱ्यांची कामे जलयुक्त शिवार अभियानातून करण्यात येत आहेत. त्यामुळे शेतकरी समृध्द कसा होईल, यासाठी या अभियानातून शेतीला प्राधान्य देण्यात आल्याचे प्रतिपादन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले. सडक-अर्जुनी तालुक्यातील पाटेकुर्रा येथे १२ जून रोजी जलयुक्त शिवार अभियानांतर्गत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून करण्यात येणाऱ्या गाव तलावांची दुरूस्ती आणि बोडी दुरूस्तीच्या कामाचे भूमिपूजन पालकमंत्री बडोले यांच्या हस्ते करण्यात आले. यानिमित्ताने ग्रामपंचायत कार्यालय येथे झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी पं.स. सभापती कविता रंगारी होत्या. प्रमुख अतिथी म्हणून पं.स. सदस्य राजेश कठाणे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक डॉ. भुमेश्वर पटले, वसंत गहाणे, लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता पथाडे, प्रभारी उपविभागीय कृषी अधिकारी कोटांगले, तालुका कृषी अधिकारी धनराज तुमडाम, सरपंच केशवराव भलावी, संजय गांधी निराधार योजनेचे सदस्य चेतन वडगाये, उपसरपंच निर्मला घरत, पोलीस पाटील ललीता कवरे, ग्रामपंचायत सदस्य वनिता कटरे, भूमिता पारधी, रेवता वाघाडे, देविलाल कटरे, गुनीलाल रहांगडाले, अमित चकाटे व विजय सोनवणे यांची उपस्थिती होती. पालकमंत्री बडोले म्हणाले, सन २०१७-१८ या वर्षात जलयुक्त शिवार अभियानांतर्गत पाटेकुर्रा या गावाची निवड करण्यात आली आहे. या अभियानातून पाटेकुर्रात ६९ लाख रूपयांची २६ कामे घेण्यात आली आहे. रोजगार हमी योजनेतून जिल्ह्यात विहिरी तयार करण्याचा कार्यक्रम सुरु आहे. मागील वर्षीपासून धडक सिंचन विहिरी तयार करण्याच्या विशेष कार्यक्रमाला मंजुरी देण्यात आली असून यामधून जिल्ह्यात १ हजार १०० विहिरी शेतकऱ्यांच्या शेतात तयार करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. सडक-अर्जुनी पंचायत समितीला ३०० विहिरींचे उद्दिष्ट देण्यात आले होते, असे त्यांनी यावेळी सांगितले. शासनाच्या विविध योजनांचा लाभ ग्रामस्थांना देण्यासाठी गावच्या ग्रामसभेने, ग्रामपंचायतने संबंधित योजनांचे परिपूर्ण भरलेले अर्ज ग्रामसेवकाच्या माध्यमातून पंचायत समितीपर्यंत पोहोचविणे व ते मंजूर करून घेणे हे सरपंच, उपसरपंच व ग्रामसेवकाचे काम असल्याचे सांगून बडोले पुढे म्हणाले, आपण ज्या पदावर कार्यरत आहोत त्याचा चांगला वापर करता आला पाहिजे. पाटेकुर्रा येथे सभा मंडपाची मागणी जुनीच असून यासाठी ग्रामपंचायतला आजपर्यंत जागा उपलब्ध करु न दिलेली नाही. त्यामुळे सभा मंडपाचे काम होवू शकले नाही. राज्य शासनाने ३० हजार कोटी रूपयांची शेतकऱ्यांची कर्जमाफी केली आहे. जलयुक्त शिवार अभियानातून अनेक कामे करण्यात येणार असल्यामुळे विकासाला गती मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. पाटेकुर्रा गावातील जे शेतकरी सिंचन विहिरीसाठी अर्ज करतील त्यांना विहिरीचा लाभ देण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. प्रास्ताविक सरपंच केशवराव भलावी यांनी मांडले. यावेळी ग्रामस्थांची उपस्थिती होती. भूगर्भातील पाण्याची पातळी वाढणार पं.स. सभापती रंगारी म्हणाल्या, पालकमंत्री बडोले यांच्या पुढाकारामुळे जलयुक्तची कामे पाटेकुर्रा येथे होत आहे. या कामामुळे शेतकऱ्यांना संरक्षित सिंचनाची व्यवस्था निर्माण होणार आहे. भूगर्भातील पाण्याची पातळी वाढण्यास मदत होणार आहे. या कामातून गावातील लोकांना रोजगार मिळणार असून त्या माध्यमातून विकासाला गती मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. गाव तलाव व बोडीचे नूतनीकरण यावेळी तालुका कृषी अधिकारी तुमडाम व कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक डॉ. पटले यांनीही मार्गदर्शन केले. तत्पूर्वी पालकमंत्र्यांच्या हस्ते गाव तलावाच्या कामाचे व शेतकरी जगन्नाथ रहांगडाले यांच्या शेतात बोडी नूतनीकरणाच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले.