शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
2
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
3
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
4
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
5
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
6
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
7
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
8
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
9
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
10
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
11
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
12
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
13
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
14
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
15
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
16
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
17
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
18
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
19
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
20
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?

प्राथमिक शाळा सकाळ पाळीत

By admin | Updated: July 3, 2014 23:38 IST

उष्णतेची लाट बघता जिल्ह्यातील प्राथमिक शाळा (वर्ग १ ते ७) सकाळ पाळीत करण्याचा निर्णय शिक्षण समितीने घेतला आहे. त्यानुसार गुरूवारपासून (दि.३) जिल्ह्यातील प्राथमिक शाळा सकाळी पाळीत

१५ तारखेपर्यंतचा निर्णय : विद्यार्थ्यांना उष्णतेपासून मिळणार दिलासागोंदिया : उष्णतेची लाट बघता जिल्ह्यातील प्राथमिक शाळा (वर्ग १ ते ७) सकाळ पाळीत करण्याचा निर्णय शिक्षण समितीने घेतला आहे. त्यानुसार गुरूवारपासून (दि.३) जिल्ह्यातील प्राथमिक शाळा सकाळी पाळीत सुरू झाल्या आहेत. येत्या १५ तारखेपर्यंत शाळा सकाळ पाळीत सुरू ठेवण्याचा निर्णय समितीने घेतला आहे. पावसाने दडी मारली असून त्यामुळे तापमान काही कमी झाले नाही. जिल्ह्याचे तापमान अद्याप ४० डिग्रीच्या घरातच आहे. पाऊस बरसत नसल्याने विदर्भात उष्णतेची लाट पसरली आहे. तर उन्हाळा परतून आल्याचे चित्र निर्माण झाले आहे. उन्हाची दाहकता बघता भल्याभल्यांना पाणी सुटत असताना चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी वातावरण अधिकच खराब आहे. यातून विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडत असल्याचेही प्रकार पुढे आले. याकडे बघत महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाने प्राथमिक शाळा सकाळ पाळीत करण्याची मागणी केली. तर या विषयाला घेऊन जिल्हा परिषद अध्यक्ष विजय शिवणकर, उपाध्यक्ष मदन पटले व शिक्षणाधिकारी पाटील यांच्यासोबत चर्चा करण्यात आली. चर्चेत शिक्षक संघाच्या मागणीचे गांभीर्य व विद्यार्थ्यांच्या आरोग्याकडे लक्ष देत प्राथमिक शाळा सकाळ पाळीत करण्याचा निर्णय घेण्यात आला. येत्या १५ तारखेपर्यंत शाळा सकाळ पाळीत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार गुरूवारपासून (दि.३) जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा सकाळ पाळीत सुरू करण्यात आल्या. तर १५ तारखे पर्यंत पाऊस पडल्यास शाळा आपल्या वेळेवरच भरणार. मात्र तोपर्यंत पाऊस न पडल्यास हा कालावधी वाढविण्यात येणार आहे. या निर्णयामुळे जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या एक हजार ४९ शाळांतील हजारो विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार असल्याचे शिक्षणाधिकारी पाटील यांनी सांगीतले. (शहर प्रतिनिधी)