शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
3
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
4
एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
5
सोन्याचे दर घसरले, पण चांदीचा विक्रम; किंमत १ लाख १२ हजारांवर; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट रेट
6
"आता वेळ आलीय..."; लोकप्रिय अभिनेत्रीसोबत मोठा स्कॅम, स्टायलिस्ट सांगून फसवलं
7
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
8
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
9
जिवंत रुग्णाला मृत घोषित केले; डॉक्टरांकडे महापालिकेने मागितला खुलासा
10
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक
11
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
12
सोने सोडा चांदीमध्येही बंपर कमाईची संधी! पुढील ६ महिन्यांत किंमत दुप्पट होणार? कोणी केला दावा?
13
केदारनाथ यात्रेला निघालेले भाविक दरीत कोसळले; दोघांचा मृत्यू, तीन जखमी
14
...तर पाकिस्तानातील अण्वस्त्र ठिकाणे उद्ध्वस्त झाली असती; इस्त्रायलची ऑफर भारताने का नाकारली?
15
पुणे, चंद्रपूर, नंदूरबार, धाराशिव; शरद पवार गट, उद्धवसेनेला खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात
16
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
17
Mukesh Ambani : मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
18
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
19
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
20
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर

बैल जोड्यांच्या किमतीत दुपटीने वाढ

By admin | Updated: June 12, 2017 01:29 IST

खरीप हंगामाला आता लवकरच सुरुवात होणार असून मशागतीच्या कामाला वेग आलेला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कचिरचाळबांध : खरीप हंगामाला आता लवकरच सुरुवात होणार असून मशागतीच्या कामाला वेग आलेला आहे. शेतात नांगरणी, शेणखत टाकण्यासाठी बैलांचा उपयोग केला जातो. बैलांच्या किमती वाढल्यामुळे शेतकऱ्यांसमोर नवा प्रश्न निर्माण झाला आहे. दिवसेंदिवस शेतीउपयोगी बैलांच्या संख्येत घट होत असल्याने बैल बाजारामध्ये बैलांच्या किमती दुपटीने वाढल्या आहेत. वाढलेल्या किमतीमुळे सामान्य शेतकरी पैशाअभावी बैलजोडी खरेदी करण्यास असमर्थ ठरत आहे. यामुळे शेतीच्या कामावर परिणाम होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. पूर्वी शेतकऱ्यांच्या घरी जनावरे असायची. मात्र आता शेतकऱ्यांकडे जनावरे दिसणे दुरापास्त झाले आहे. दूध देणाऱ्या संकरित गाईचे प्रमाण शेतकऱ्यांकडे वाढले आहे. अधिक नफा मिळविण्याच्या दृष्टिकोनातून दुधाळू जनावरांची संख्या वाढली आहे. त्यामुळे जे घरी बैल तयार व्हायचे, ते आता नाहीसे झाल्याने शेतकऱ्यांना बाजारातून बैल घ्यावे लागत आहे. सध्या जिल्ह्यातील आमगाव, गोरेगाव, काटीनगर व मध्य प्रदेशातील हिर्री आदी बाजारात कमीत कमी दहा हजार रुपयांपासून ५० हजार रुपयांपर्यंत बैल विक्री होत आहे. या दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांकडे पैसा नसल्याने वाढलेल्या किमतीत बैल खरेदी करणे शक्य नसल्याने त्याचा परिणाम शेतकामावर पडत आहे. शेतीचे व्यापारीकरण झाल्यामुळे व सिंचनाच्या सोईमुळे शेतकरी वर्षातून तीनवेळा पीक घेऊ लागला आहे. चराईसाठी जागा नसल्यामुळे जनावर मालकांना गैरसोयीचा सामना करावा लागतो. या सर्व गोष्टींचा परिणाम होत असल्याने शेतकऱ्यांकडील जनावरांच्या संख्येत घट झाली आहे. शेतकऱ्यांना शेतकामासाठी खात्रीलायक बैल मिळत नसल्यामुळे बैल बाजारात बैलांच्या किमतीत दुपटीने वाढ झाले आहे. वाढीव किमतीमुळे नवीन बैलजोडी कशी घ्यावी, अशा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे.