शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

बैल जोड्यांच्या किमतीत दुपटीने वाढ

By admin | Updated: June 12, 2017 01:29 IST

खरीप हंगामाला आता लवकरच सुरुवात होणार असून मशागतीच्या कामाला वेग आलेला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कचिरचाळबांध : खरीप हंगामाला आता लवकरच सुरुवात होणार असून मशागतीच्या कामाला वेग आलेला आहे. शेतात नांगरणी, शेणखत टाकण्यासाठी बैलांचा उपयोग केला जातो. बैलांच्या किमती वाढल्यामुळे शेतकऱ्यांसमोर नवा प्रश्न निर्माण झाला आहे. दिवसेंदिवस शेतीउपयोगी बैलांच्या संख्येत घट होत असल्याने बैल बाजारामध्ये बैलांच्या किमती दुपटीने वाढल्या आहेत. वाढलेल्या किमतीमुळे सामान्य शेतकरी पैशाअभावी बैलजोडी खरेदी करण्यास असमर्थ ठरत आहे. यामुळे शेतीच्या कामावर परिणाम होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. पूर्वी शेतकऱ्यांच्या घरी जनावरे असायची. मात्र आता शेतकऱ्यांकडे जनावरे दिसणे दुरापास्त झाले आहे. दूध देणाऱ्या संकरित गाईचे प्रमाण शेतकऱ्यांकडे वाढले आहे. अधिक नफा मिळविण्याच्या दृष्टिकोनातून दुधाळू जनावरांची संख्या वाढली आहे. त्यामुळे जे घरी बैल तयार व्हायचे, ते आता नाहीसे झाल्याने शेतकऱ्यांना बाजारातून बैल घ्यावे लागत आहे. सध्या जिल्ह्यातील आमगाव, गोरेगाव, काटीनगर व मध्य प्रदेशातील हिर्री आदी बाजारात कमीत कमी दहा हजार रुपयांपासून ५० हजार रुपयांपर्यंत बैल विक्री होत आहे. या दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांकडे पैसा नसल्याने वाढलेल्या किमतीत बैल खरेदी करणे शक्य नसल्याने त्याचा परिणाम शेतकामावर पडत आहे. शेतीचे व्यापारीकरण झाल्यामुळे व सिंचनाच्या सोईमुळे शेतकरी वर्षातून तीनवेळा पीक घेऊ लागला आहे. चराईसाठी जागा नसल्यामुळे जनावर मालकांना गैरसोयीचा सामना करावा लागतो. या सर्व गोष्टींचा परिणाम होत असल्याने शेतकऱ्यांकडील जनावरांच्या संख्येत घट झाली आहे. शेतकऱ्यांना शेतकामासाठी खात्रीलायक बैल मिळत नसल्यामुळे बैल बाजारात बैलांच्या किमतीत दुपटीने वाढ झाले आहे. वाढीव किमतीमुळे नवीन बैलजोडी कशी घ्यावी, अशा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे.