शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
2
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
3
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
4
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
5
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
6
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
7
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
8
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
9
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
10
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
11
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
12
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
13
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
14
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
15
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
16
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
17
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
18
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
19
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
20
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
Daily Top 2Weekly Top 5

सध्याच ३८८ गावांवर पाणीटंचाईचे सावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2017 21:23 IST

यंदा जिल्ह्यात सरासरीच्या ५२ टक्के पाऊस झाल्याने सिंचन प्रकल्पात मोजकाच पाणीसाठा आहे. त्याचाच परिणाम भूजल पातळीवर झाला असून २ मीटरने भूजल पातळी खालावली आहे.

ठळक मुद्देभूजल पातळी खालावली : प्रकल्पात केवळ २८ टक्के पाणीसाठा

अंकुश गुंडावार।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : यंदा जिल्ह्यात सरासरीच्या ५२ टक्के पाऊस झाल्याने सिंचन प्रकल्पात मोजकाच पाणीसाठा आहे. त्याचाच परिणाम भूजल पातळीवर झाला असून २ मीटरने भूजल पातळी खालावली आहे. जानेवारी ते जून महिन्यादरम्यान जिल्ह्यातील ३८८ गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने वर्तविली आहे.यावर्षी कमी पाऊस झाल्याने उन्हाळ्यात पाणीटंचाईची समस्या निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात होती. तो अंदाज काहीसा ठरत आहे. जिल्ह्यातील तिरोडा, गोरेगाव, देवरी, गोंदिया तालुक्यातील काही गावांमध्ये आत्तापासूनच गावकऱ्यांना पाणी टंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे.उन्हाळा सुरू होण्यास अजुन दोन महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. मात्र त्यापूर्वीच गावकऱ्यांना पाणी टंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागत असल्याने भर उन्हाळ्यात काय होणार अशी चिंता आत्तापासूनच सतावित आहे.भूजल सर्वेक्षण विभागाने दिलेल्या अहवालाच्या आधारावर जि.प. ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने पाणी टंचाईचा आराखडा तयार केला आहे. त्यात जिल्ह्यात जानेवारी ते जून महिन्यादरम्यान ३८८ गावे आणि वाड्यामध्ये पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता वर्तविली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत पाणी टंचाईची समस्या होणाऱ्या गावांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.भूजल सर्वेक्षण विभागाने डिसेंबर महिन्यात केलेल्या निरीक्षण विहिरींच्या सर्वेक्षणात भूजल पातळी २ मीटरने खालावली असल्याचे म्हटले आहे. मागील पाच वर्षांच्या कालावधी प्रथमच डिसेंबर महिन्यात भूजल पातळी २ मीटरने खालावल्याने यंदा जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना पाणीटंचाईच्या तीव्र समस्येला तोंड द्यावे लागणार आहे.उपाय योजनासाठी १ कोटी १० लाखांची तरतूदजिल्ह्यातील ३८८ गावांमध्ये निर्माण होणारी पाणी टंचाईची समस्या लक्षात घेवून यावर उपाय योजना करण्यासाठी जि.प.ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने १ कोटी १० लाख रुपयांच्या कामाचा आराखडा तयार केला आहे. हा आराखडा मंजुरीसाठी जिल्हाधिकाºयांकडे पाठविल्याची माहिती आहे.चार तालुक्यात समस्या अधिकयंदा पाणी टंचाईची सर्वाधिक झळ तिरोडा, गोरेगाव, देवरी आणि गोंदिया तालुक्यातील १५० गावांना बसण्याची शक्यता आहे. तालुक्यातील भूजल पातळी सर्वाधिक खालावली आहे. त्यामुळे मार्च ते जून महिन्यांमध्ये तालुक्यात पाणी टंचाईची समस्या अधिक तीव्र होण्याची शक्यता भूजल सर्वेक्षण विभागाने वर्तविली आहे.काही गावांतआत्तापासूनच टंचाईतिरोडा आणि गोरेगाव तालुक्यातील काही गावांमध्ये आत्तापासूनच पाणी टंचाईची समस्या जाणवत आहे. त्यामुळे सकाळपासूनच महिला पाण्यासाठी दूरवर भटकंती करीत असल्याचे चित्र आहे.गोंदिया शहराची भिस्त पुजारीटोलावरगोंदिया शहराला वैनगंगा नदीवर डांर्गोलीजवळ उभारण्यात आलेल्या पाणी पुरवठा योजनेतून महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागातंर्गत पाणी पुरवठा केला जातो. मात्र डिसेंबर महिन्यातच वैनगंगा नदीचे पात्र कोरडे पडले आहे. त्यामुळे जानेवारी महिन्यापासून शहरात पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. यावर मात करण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि जिल्हा प्रशासनाने पुजारीटोला धरणावरुन शहराला पाणी पुरवठा करण्याचे नियोजन केले आहे.