शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

सध्याच ३८८ गावांवर पाणीटंचाईचे सावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2017 21:23 IST

यंदा जिल्ह्यात सरासरीच्या ५२ टक्के पाऊस झाल्याने सिंचन प्रकल्पात मोजकाच पाणीसाठा आहे. त्याचाच परिणाम भूजल पातळीवर झाला असून २ मीटरने भूजल पातळी खालावली आहे.

ठळक मुद्देभूजल पातळी खालावली : प्रकल्पात केवळ २८ टक्के पाणीसाठा

अंकुश गुंडावार।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : यंदा जिल्ह्यात सरासरीच्या ५२ टक्के पाऊस झाल्याने सिंचन प्रकल्पात मोजकाच पाणीसाठा आहे. त्याचाच परिणाम भूजल पातळीवर झाला असून २ मीटरने भूजल पातळी खालावली आहे. जानेवारी ते जून महिन्यादरम्यान जिल्ह्यातील ३८८ गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने वर्तविली आहे.यावर्षी कमी पाऊस झाल्याने उन्हाळ्यात पाणीटंचाईची समस्या निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात होती. तो अंदाज काहीसा ठरत आहे. जिल्ह्यातील तिरोडा, गोरेगाव, देवरी, गोंदिया तालुक्यातील काही गावांमध्ये आत्तापासूनच गावकऱ्यांना पाणी टंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे.उन्हाळा सुरू होण्यास अजुन दोन महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. मात्र त्यापूर्वीच गावकऱ्यांना पाणी टंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागत असल्याने भर उन्हाळ्यात काय होणार अशी चिंता आत्तापासूनच सतावित आहे.भूजल सर्वेक्षण विभागाने दिलेल्या अहवालाच्या आधारावर जि.प. ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने पाणी टंचाईचा आराखडा तयार केला आहे. त्यात जिल्ह्यात जानेवारी ते जून महिन्यादरम्यान ३८८ गावे आणि वाड्यामध्ये पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता वर्तविली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत पाणी टंचाईची समस्या होणाऱ्या गावांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.भूजल सर्वेक्षण विभागाने डिसेंबर महिन्यात केलेल्या निरीक्षण विहिरींच्या सर्वेक्षणात भूजल पातळी २ मीटरने खालावली असल्याचे म्हटले आहे. मागील पाच वर्षांच्या कालावधी प्रथमच डिसेंबर महिन्यात भूजल पातळी २ मीटरने खालावल्याने यंदा जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना पाणीटंचाईच्या तीव्र समस्येला तोंड द्यावे लागणार आहे.उपाय योजनासाठी १ कोटी १० लाखांची तरतूदजिल्ह्यातील ३८८ गावांमध्ये निर्माण होणारी पाणी टंचाईची समस्या लक्षात घेवून यावर उपाय योजना करण्यासाठी जि.प.ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने १ कोटी १० लाख रुपयांच्या कामाचा आराखडा तयार केला आहे. हा आराखडा मंजुरीसाठी जिल्हाधिकाºयांकडे पाठविल्याची माहिती आहे.चार तालुक्यात समस्या अधिकयंदा पाणी टंचाईची सर्वाधिक झळ तिरोडा, गोरेगाव, देवरी आणि गोंदिया तालुक्यातील १५० गावांना बसण्याची शक्यता आहे. तालुक्यातील भूजल पातळी सर्वाधिक खालावली आहे. त्यामुळे मार्च ते जून महिन्यांमध्ये तालुक्यात पाणी टंचाईची समस्या अधिक तीव्र होण्याची शक्यता भूजल सर्वेक्षण विभागाने वर्तविली आहे.काही गावांतआत्तापासूनच टंचाईतिरोडा आणि गोरेगाव तालुक्यातील काही गावांमध्ये आत्तापासूनच पाणी टंचाईची समस्या जाणवत आहे. त्यामुळे सकाळपासूनच महिला पाण्यासाठी दूरवर भटकंती करीत असल्याचे चित्र आहे.गोंदिया शहराची भिस्त पुजारीटोलावरगोंदिया शहराला वैनगंगा नदीवर डांर्गोलीजवळ उभारण्यात आलेल्या पाणी पुरवठा योजनेतून महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागातंर्गत पाणी पुरवठा केला जातो. मात्र डिसेंबर महिन्यातच वैनगंगा नदीचे पात्र कोरडे पडले आहे. त्यामुळे जानेवारी महिन्यापासून शहरात पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. यावर मात करण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि जिल्हा प्रशासनाने पुजारीटोला धरणावरुन शहराला पाणी पुरवठा करण्याचे नियोजन केले आहे.