शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
3
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
4
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
5
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
6
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
7
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
8
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
9
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
10
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
11
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
12
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
13
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
14
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
15
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
16
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
17
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
18
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
19
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
20
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS

सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पावसाची हजेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:30 IST

गोंदिया : जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण असून, शुक्रवारी (दि. ७) सलग दुसऱ्या दिवशी वादळी वाऱ्यासह जिल्ह्यात अवकाळी ...

गोंदिया : जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण असून, शुक्रवारी (दि. ७) सलग दुसऱ्या दिवशी वादळी वाऱ्यासह जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. जवळपास दहा ते पंधरा मिनिटे पाऊस झाल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला होता. अवकाळी पावसाचा फटका रब्बी हंगामातील कापणी केलेल्या धानाला बसल्याने बळीराजा चिंतातुर आहे.

हवामान विभागाने जिल्ह्यात ९ मे पर्यंत अवकाळी पाऊस आणि गारपीट होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. गुरुवारी सुद्धा सायंकाळच्या सुमारास वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली होती, तर शुक्रवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास पावसाने हजेरी लावली. जवळपास १० ते १५ मिनिटे पाऊस झाला. त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाल्याने उकाड्यापासून त्रस्त असलेल्या जिल्हावासीयांना थोडा दिलासा मिळाला. मात्र या अवकाळी पावसाचा फटका जिल्ह्यातील रब्बी हंगामातील कापणी केलेल्या धानाला बसला आहे. जिल्ह्यात यंदा रब्बी हंगामात २५ हजार हेक्टरवर धानाची लागवड करण्यात आली आहे. सध्या या धानाची कापणी सुरू असून, बऱ्याच शेतकऱ्यांच्या शेतात धान कापणी करून पडलेला आहे. या धानाला दोन दिवसांपासून येत असलेल्या अवकाळी पावसाचा फटका बसला. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. कृषी विभागाने शेतकऱ्यांना तूर्तास धानाची कापणी न करण्याचा सल्ला दिला आहे.