शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
6
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
7
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
8
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
9
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
10
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
11
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
12
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
13
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
14
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
15
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
16
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
17
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
18
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
19
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती

सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पावसाची हजेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:30 IST

गोंदिया : जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण असून, शुक्रवारी (दि. ७) सलग दुसऱ्या दिवशी वादळी वाऱ्यासह जिल्ह्यात अवकाळी ...

गोंदिया : जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण असून, शुक्रवारी (दि. ७) सलग दुसऱ्या दिवशी वादळी वाऱ्यासह जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. जवळपास दहा ते पंधरा मिनिटे पाऊस झाल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला होता. अवकाळी पावसाचा फटका रब्बी हंगामातील कापणी केलेल्या धानाला बसल्याने बळीराजा चिंतातुर आहे.

हवामान विभागाने जिल्ह्यात ९ मे पर्यंत अवकाळी पाऊस आणि गारपीट होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. गुरुवारी सुद्धा सायंकाळच्या सुमारास वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली होती, तर शुक्रवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास पावसाने हजेरी लावली. जवळपास १० ते १५ मिनिटे पाऊस झाला. त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाल्याने उकाड्यापासून त्रस्त असलेल्या जिल्हावासीयांना थोडा दिलासा मिळाला. मात्र या अवकाळी पावसाचा फटका जिल्ह्यातील रब्बी हंगामातील कापणी केलेल्या धानाला बसला आहे. जिल्ह्यात यंदा रब्बी हंगामात २५ हजार हेक्टरवर धानाची लागवड करण्यात आली आहे. सध्या या धानाची कापणी सुरू असून, बऱ्याच शेतकऱ्यांच्या शेतात धान कापणी करून पडलेला आहे. या धानाला दोन दिवसांपासून येत असलेल्या अवकाळी पावसाचा फटका बसला. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. कृषी विभागाने शेतकऱ्यांना तूर्तास धानाची कापणी न करण्याचा सल्ला दिला आहे.