शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांसाठी विद्यार्थी आंदोलनाच्या पावित्र्यात

By admin | Updated: July 24, 2014 23:54 IST

स्थानिक जिल्हा परिषद कनिष्ठ महाविद्यालयात कला व विज्ञान शाखेत कनिष्ठ व्याख्यातांचा अनुशेष असल्याने विद्यार्थ्यानी आंदोलनाचा आक्रमक पवित्रा घेतला आहे. जिल्हा परिषद शिक्षण

अर्जुनी/मोरगाव : स्थानिक जिल्हा परिषद कनिष्ठ महाविद्यालयात कला व विज्ञान शाखेत कनिष्ठ व्याख्यातांचा अनुशेष असल्याने विद्यार्थ्यानी आंदोलनाचा आक्रमक पवित्रा घेतला आहे. जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या प्रशासनाने या मागणीची गांभीर्याने दखल घेण्याची मागणी विद्यार्थी व पालकांनी केली आहे. प्राप्त माहितीनुसार, गोरगरीब विद्यार्थ्याना मोफत शिक्षणाची सुविधा प्राप्त व्हावी यासाठी शासन स्तरावरून भरघोस प्रयत्न केले जातात. मात्र प्रशासनाच्या अडेलतट्टू धोरणामुळे या योजनेलाच तडे जात आहेत. यावर्षीचे शैक्षणिक सत्र सुरू होऊन महिना लोटला. स्थानिक जिल्हा परिषद कनिष्ठ महाविद्यालय मोठ्या संख्येने विद्यार्थ्यानी प्रवेश घेतला. मात्र येथील कला व विज्ञान शाखेत कनिष्ठ व्याख्यातांचा मोठा अनुशेष आहे. येथील कनिष्ठ महाविद्यालयात सुमारे ३३० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. कला शाखेत ११ वी व बारावीची प्रत्येकी एक तर विज्ञान शाखेत ११ वी व १२ वीची प्रत्येकी एक तुकडी आहे. या कनिष्ठ महाविद्यालयात कला शाखेसाठी केवळ इंग्रजी व मराठी या दोन विषयांचेच व्याख्याने कार्यरत आहेत. येथे इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र व राज्यशास्त्र या विषयांसाठी व्याख्याते नाहीत. विज्ञान शाखेसाठी इंग्रजी, मराठी, गणित व भौतिकशास्त्र या विषयांचे व्याख्याते कार्यरत आहेत. येथे रसायनशास्त्र व जीवशास्त्र या विषयांसाठी व्याख्याते नाहीत. जिल्हा परिषद शाळांमध्ये ही बाब नवीन नाही. गतवर्षीसुध्दा या कनिष्ठ महाविद्यालयात अशीच स्थिती होती. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडे व्याख्यातांची मागणी करून संपूर्ण वर्ष व्याख्यातांविना पूर्ण होते. मात्र अशा गंभीर विषयांची गांभीर्याने दखलच घेतली जात नाही. जि.प.चे अधिकारी व पदाधिकारी केवळ कोरडी आश्वासने देतात. यावर्षी पूर्ण व्याख्यातांची मागणी केल्यानंतरही केवळ भौतिकशास्त्र या विषयाच्या व्याख्याताची नियुक्ती या शाळेत करण्यात आली. व्याख्यातांविना या शाळेची अवस्था दयनिय आहे. या कनिष्ठ महाविद्यालयात दरवर्षी विद्यार्थी संख्येत झपाट्याने वाढत आहे. मात्र शिक्षण विभागाचे प्रशासन तेवढेच सुस्त आहे. विद्यार्थी व पालकांना योग्य शिक्षण मिळत नसेल तर जिल्हा परिषद शाळात शिकण्याचा अर्थ काय? असा प्रश्न विचारला जात आहे. कनिष्ठ व्याख्यातांच्या अनुशेषामुळे विद्यार्थ्यांचे अतोनात नुकसान होत आहे. विद्यार्थ्याचे हित लक्षात घेता नुकसान टाळण्याचे दृष्टीने जिल्हा परिषद प्रशासनाने तातडीने कनिष्ठ व्याख्यातांची नियुक्ती करावी, अन्यथा आठवडाभरात तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा विद्यार्थ्यानी दिला आहे. (तालुका प्रतिनिधी)