शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

केशोरी परिसरात पावसाची हजेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:19 IST

केशोरी : गेल्या १५ दिवसांपासून पावसाने दडी मारली होती व त्यामुळे या परिसरातील धान रोवणी खोळंबली होती. मात्र ...

केशोरी : गेल्या १५ दिवसांपासून पावसाने दडी मारली होती व त्यामुळे या परिसरातील धान रोवणी खोळंबली होती. मात्र मंगळवारी दुपारपासून पावसाने हजेरी लावली असून, शेतकऱ्यांनी धान रोवणीला परत सुरुवात केली आहे. पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

मृग नक्षत्र वगळता आद्रा नक्षत्र पूर्णपणे कोरडाच गेले. त्यामुळे शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण दिसून येत होते. या परिसरात कोरडवाहू शेती मोठ्या प्रमाणात असली तरीही शेतकऱ्यांनी शेतात बोअर करून सिंचनाची व्यवस्था करून धानलागवड केली आहे. ज्यांच्याकडे पाण्याची व्यवस्था आहे त्यांची धानरोवणी सुरू होती. गेल्या १५ दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांची धानरोवणी खोळंबली होती. धानपिकासाठी पाणी हा अत्यंत महत्त्वाचा घटक असतो. मात्र वरुणराजा रुसून बसल्याने शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे लागून होत्या व ते पाऊस पडण्याची वाट बघत होते. मंगळवार दुपारनंतर या परिसरात पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा मिळाला. त्यामुळे शेतकरी वर्गात आनंद दिसून येत असून ज्यांची रोवणी खोळंबली होती त्यांनी रोवणी सुरू केली आहे.