शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

ग्राम विकासाचे आराखडे तयार करा

By admin | Updated: February 15, 2017 02:01 IST

ग्रामीण विकासासाठी केंद्र व राज्य सरकारच्या अनेक योजना आहेत. जिल्ह्याचा मानवी विकास निर्देशांक वाढविण्यासाठी शिक्षण,

राजकुमार बडोले : कटंगी येथील जिल्हास्तरीय सरपंच मेळावा गोंदिया : ग्रामीण विकासासाठी केंद्र व राज्य सरकारच्या अनेक योजना आहेत. जिल्ह्याचा मानवी विकास निर्देशांक वाढविण्यासाठी शिक्षण, आरोग्य व रोजगाराकडे विशेष लक्ष देण्याची आवश्यकता आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून ग्राम विकासाची जास्तीतजास्त कामे करण्यासाठी ग्रामपंचायतीनी ग्राम विकासाचे आराखडे तयार करावेत, असे आवाहन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले. सोमवारी (दि.१३) जवळील ग्रामकटंगीकला येथे जिल्हा परिषदेच्यावतीने आयोजित जिल्हास्तरीय सरपंच मेळाव्याच्या उदघाटनाप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्ष उषा मेंढे होत्या. प्रमुख अतिथी म्हणून आमदार संजय पुराम, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार, उपाध्यक्ष रचना गहाणे, जि.प.आरोग्य व शिक्षण समिती सभापती पी.जी.कटरे, कृषी व पशुसंवर्धन समिती सभापती छाया दसरे, समाज कल्याण समिती सभापती देवराज वडगाये, सालेकसा पंचायत समिती सभापती हिरालाल फाफनवाडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश बागडे, जि.प.सदस्य गंगाधर परशुरामकर, लता दोनोडे, दुर्गा तिराले, कटंगीकलाच्या सरपंच कांता नागरीकर उपस्थित होत्या. पुढे बोलताना बडोले यांनी, जिल्हा लवकरच हागणदारीमुक्त घोषित होणार आहे. यासाठी सरपंच व सचिव तसेच ग्रामस्थांनी जो पुढाकार घेतला यासाठी ते अभिनंदनास पात्र आहेत. गावे स्वच्छ झाली तर देश स्वच्छ होईल. शौचास उघड्यावर बसण्याची मनोवृत्ती बदलणे गरजेचे आहे. प्रत्येक ग्रामपंचायतींनी चौकाचौकात कचराकुंड्या बसवाव्या. जिल्हा डास व शौचमुक्त झाला तर संपूर्ण जिल्हा रोगराईमुक्त होण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले. कौशल्य विकासाच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करु न देण्याचा प्रयत्न असल्याचे सांगून त्यांनी, इंटरनेटमुळे जग जवळ आले आहे. इंटरनेटवर अनेक ठिकाणी रोजगार व नोकरीच्या संधी असल्याचे दिसून येते. जिल्ह्यातील सर्वच शाळा डिजीटल झाल्यास विविध प्रकारचे शिक्षण मिळण्यास मदत होणार असून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासाला गती मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. मेंढे यांनी, सरपंच आणि सचिवांचे नाते दिवा आणि वातीसारखे आहे. कोणतेही उलटसुलट काम होणार नाही याची काळजी घ्यावी. गावाच्या विकासासाठी मिळणारा निधी योग्य वेळेत व योग्यप्रकारे पारदर्शकतेने खर्च करावा. सरपंच हा गावाचा मुख्यमंत्री असतो. गावातील अनेक समस्यांचा सामना त्यांना करावा लागतो. एका सचिवाकडे तीन ते चार ग्रामपंचायतींची जबाबदारी असल्यामुळे ही जबाबदारी योग्य समन्वयातून पार पाडावी. चौदाव्या वित्त आयोगातून मिळणाऱ्या निधीचा ग्रामपंचायतीने योग्यप्रकारे खर्च करावा. गावातील आंगणवाडी व शाळा दुरुस्ती तसेच पाण्याची व्यवस्था याकडे लक्ष द्यावे असे त्या म्हणाल्या. आमदार पुराम यांनी सरपंच व सचिव हे गावाच्या विकासाची मुख्य चाके असून सरपंचांना विकासाच्या बाबतीत प्रशिक्षण मिळाले पाहिजे अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. गहाणे यांनी, चौदाव्या वित्त आयोगाचा निधी कसा खर्च करावा याचे नियोजन प्रत्येक ग्रामपंचायतीने काळजीपूर्वक करावे. राज्यघटनेतून जे अधिकार मिळाले आहेत त्याचा योग्यप्रकारे गावाच्या विकासासाठी वापर करावा. ग्रामपंचायतचे प्रमुख म्हणून सरपंचानी काम करीत असतांना गावातील लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावे असे त्या म्हणाल्या. प्रास्ताविकातून डॉ.पुलकुंडवार यांनी, लवकरच जिल्हा हागणदारीमुक्त घोषित करण्यात येणार आहे. २०११ च्या बेसलाईन सर्वेचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात आले असून ३५ हजारांपेक्षा जास्त शौचालय जिल्ह्यात बांधण्यात आली आहे. वाढीव कुटुंबांना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण शौचालय बांधून देण्यात येणार आहे. नादुरु स्त शौचालयांच्या दुरु स्तीसाठी पाठपुरावा करण्यात येत आहे. उघड्यावर शौचास जाण्याची वृत्ती बंद केली पाहिजे. आता उघड्यावर बसणाऱ्या व्यक्तीवर कारवाई करण्यात येईल. जिल्हा हागणदारीमुक्त झाल्यानंतर निरंतर स्वच्छतेचे निकष पाळावे लागणार आहे. ग्रामगितेच्या माध्यमातून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सांगितलेले विचार प्रत्यक्षात अंमलात आणावे असे मत मांडले. शिक्षण, आरोग्य, पोषण व निवारा यासुध्दा जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागणार आहे. शिक्षक लोकप्रतिनिधी आणि पालकांनी बालकांच्या शिक्षणाप्रती जागृत राहणे आपले कर्तव्य असल्याचेही त्यांनी सांगितले. संपूर्ण स्वच्छता व गावाचा विकास यावर उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश देशमुख, चौदावा वित्त आयोग-निधी खर्च यावर गटविकास अधिकारी नारायण जमईवार यांनी मार्गदर्शन केले. यावेळी जिल्ह्यातील सरपंच, सचिव, ग्रामविकास अधिकारी, जिल्हा परिषद सदस्य, गटविकास अधिकारी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. संचालन विस्तार अधिकारी वैशाली खोब्रागडे व जी.टी.सिंगनजुडे यांनी केले. आभार उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश बागडे यांनी मानले. (शहर प्रतिनिधी) ग्रामसेवकांनी केला काळ््या फिती लावून निषेध या सरपंच मेळाव्यात ग्रामसेवकांनी उपमुख्य कार्यपालन अधिकारी राजेश बागडे, देवरी येथील पंचायत समिती विस्तार अधिकारी एम.एस.खुणे व सालेकसा येथील विस्तार अधिकारी यु.टी.राठोड यांच्या अरेरावीपणाचा निषेध नोंदविण्यासाठी काळ््या फिती लावून उपस्थिती दर्शविली. विस्तार अधिकारी राठोड हे गेल्या १० वर्षांपेक्षा अधिक काळापासून सालेकसा येथे एकाच ठिकाणी कार्यरत कसे? याबद्दलही आश्चर्य व्यक्त केले जात आहे.