शहरं
Join us  
Trending Stories
1
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
2
Pune Crime: चुलतीला ‘आय लव्ह यू’ म्हटल्याचा राग… हॉकी स्टिकने मारहाण करत युवकाची हत्या
3
अनिल अंबानींना १,८२८ कोटी रुपयांचा दंड? सेबी करणार मोठी कारवाई; कारण काय?
4
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
5
२.५ लाखांपर्यंत पोहोचणार सोन्याचे दर? खरेदीदारांसाठी वाईट बातमी; ६ वर्षांत २००% झालीये वाढ
6
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
7
अमेरिकेतून मायदेशी परतत आहेत भारतीय; का वाटतेय हद्दपार करण्याची भीती?
8
आधी लाबूबू डॉल जाळली, आता तीच पुन्हा समोर आली; भारती सिंह म्हणाली, "ही माझा पिच्छाच..."
9
उद्धवसेना, शरद पवार गटाला खिंडार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
10
पालिकांमध्ये 'एक वॉर्ड-एक नगरसेवक' पद्धत लागू करा; मनसेची राज्य निवडणूक आयुक्तांकडे मागणी
11
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
12
सुवर्णयुगाचा अंत! 'देवदास' फेम बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, सिनेसृष्टीवर शोककळा
13
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
14
आलिशान कारमधून ३१ कोटींची ड्रग्ज तस्करी; ठाणे पालिकेचा लोगो लावून कारमधून सुरू होता कारभार
15
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार
16
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
17
आधार कार्ड, मतदार ओळखपत्र नागरिकत्वाचा पुरावा नाहीत! मतदार यादीतून वगळण्याचा अधिकार निवडणूक आयोगालाच
18
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
19
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
20
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना

तंमुसच्या सहकार्याने प्रेमीयुगुलाचा विवाह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2017 02:15 IST

गावातील प्रतिष्ठित नागरिकांच्या समजुतीला मान देऊन दोन्ही कुटुंबाने ताणतणाव बाजूला सारून

काचेवानी : गावातील प्रतिष्ठित नागरिकांच्या समजुतीला मान देऊन दोन्ही कुटुंबाने ताणतणाव बाजूला सारून प्रेमीयुगुलास तंटामुक्त समितीच्या सहकार्याने विवाह बंधनात अडकविले. गावातील विठ्ठल रूख्माई व हनुमान मंदिरात संपूर्ण गावकऱ्यांच्या उपस्थितीत सदर लग्न सोहळा पार पडला. काचेवानी (बरबसपुरा) येथील युवराज पटले यांचा मुलगा अजय (२३) व सेजगाव येथील भिकराम पारधी यांची मुलगी सीमा (२१) यांचे मागील साडेतीन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. या प्रकरणाची माहिती दोघांनी आपापल्या कुटुंबास दिली. यानंतर गावातील प्रतिष्ठितांना एक दुसऱ्याच्या घरी नेवून समजूत घालण्याचा प्रयत्न करण्यात आला. बाहेरगावावरून अजय आल्यानंतर मानवाधिकार संघटनेचे अध्यक्ष तथा उपसरपंच पप्पू सय्यद, पोलीस पाटील प्रतिनिधी नरेंद्र रंगारी, शिक्षक नेतराम माने, ग्रा.पं. सदस्य संदीप अंबुले, मुलाचे वडील युवराज पटले, मोठे वडील जगलाल पटले व परिवारासह वधूच्या घरी जावून तेथील मान्यवरांना मुलीच्या वडिलांद्वारे पाचारण करण्यात आले. सेजगाव तंमुसचे अध्यक्ष कन्हैयालाल उचलकर, सचिव अशोक बळगे, पं.स. उपसभापती डॉ. किशोर पारधी, माजी सभापती प्रभूदास सोनेवाने, रामचंद्र पारधी यांच्यासह २० ते २५ नागरिक मुलीच्या वडिलांच्या घरी गेले. घरी सभा घेण्यात आली. दोन्ही पक्षाचे कुटुंब व प्रेमीयुगल अजय व सीमा यांच्याबाबत चर्चा करण्यात आली. काही अडचणी निर्माण होत असताना दोन्ही गावच्या लोकांनी समजूत घातली. दोन्ही पक्षाने स्वीकृती दिली. यानंतर ग्रामस्थांनी व तंमुसने कार्यवाही पार पाडली. त्यानंतर सेजगावटोला येथे हनुमान व विठ्ठल रूख्माई मंदिरात विधिवत लग्न सोहळा पार पडला.