शहरं
Join us  
Trending Stories
1
"नो डाउट, भारतच जिंकला.. तेही अगदी ठासून!" अमेरिकन युद्धतज्ज्ञाचं 'सर्टिफिकेट', ४ मुद्दे महत्त्वाचे
2
भारताविरोधातील कट उधळला! शोपियात ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
3
आई-वडील, बहीण आणि मावशीची केली हत्या, मग जाळले मृतदेह, आता कोर्टाने सुनावली अशी शिक्षा
4
सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
5
बॅगा भरा अन् माघारी फिरा! मुंबई इंडियन्ससह या IPL फ्रँचायझी संघांचं टेन्शन वाढलं; कारण...
6
"भारत १७ दिवसांत पुन्हा हल्ला करू शकतो, कारण..."; पाकिस्तानच्या बड्या नेत्याला धाकधूक
7
Meditation Tips: ध्यान करायचे आहे पण ध्यान लागत नाही? श्री श्री रविशंकरांनी सांगितले तीन नियम!
8
Online Admission Process : विद्यार्थ्यांनो आताच नोट करून ठेवा, 'या' तारखेपासून सुरू होणार अकरावीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 
9
"२२ दिवसांनी जेव्हा त्यांना व्हिडीओ कॉलवर पाहिलं तेव्हा मी त्यांना ओळखूच शकले नाही कारण..."
10
राहुल गांधींना दिलासा; नागरिकत्वाला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली
11
बांधावरून सहजच फेरफटका मारत होता शेतकरी; अचानक चमकले, ३६००० कोटींचे सोने सापडले...
12
BSE चं मार्केट कॅप १ लाख कोटींच्या पार, शेअरच्या किंमतीत विक्रमी तेजी
13
चीननंतर आता भारताची तुर्कीवर मोठी कारवाई; टीआरटी वर्ल्डच्या सोशल मिडिया हँडलबाबत मोठा निर्णय
14
'या' बँका देत आहेत सर्वात स्वस्त गृहकर्ज; सरकारी बँकांसह खासगी बँकेचाही समावेश
15
आधी चीनला आमंत्रण, आता ईशान्य भारतावर डोळा; नेपाळला हाताशी धरून कसली तयारी करतायत मोहम्मद युनूस?
16
"२ आठवडे झोप उडाली होती..."; BSF जवानाची सुटका झाल्यावर कुटुंबीय भावुक, वाटली मिठाई
17
मोठी बातमी! बीएसएफ जवानाची पाकिस्तानी रेंजर्सच्या तावडीतून सुटका; पहलगाम हल्ल्यानंतर अनवधानाने गेला होता सीमेपार
18
आईच्या मृत्यूनंतर गतिमंद मुलीला जिवंतपणी मरणयातना; पित्यानेच बांधले जनावरांच्या गोठ्यात
19
प्रेयसीवर कोयत्याने वार करुन संपवले, स्वतःही घेतला गळफास; रायगडच्या परळीतील घटना
20
भारतीय नागरिकांचं ठरलंय! तुर्कस्तान, अझरबैजानचा 'मालदीव' करणार; पाकच्या 'मित्रां'चा 'करेक्ट कार्यक्रम' होणार

पारंपरिक देशी धानाला प्राधान्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2017 23:18 IST

महाराष्टÑ जनुक कोष कार्याक्रमांतर्गत ग्रामीण युवा प्रगतिक मंडळ भंडारा यांच्या सौजन्याने प्रायोगिक तत्त्वावर कन्हारपायली येथील शेतकरी मनोहर शहारे यांनी पारंपरिक देशी धानाचे वाण हिराणकीची.....

ठळक मुद्देकन्हारपायलीच्या शेतात बहरले हिराणकी वाण

लोकमत न्यूज नेटवर्कशेंडा (कोयलारी) : महाराष्टÑ जनुक कोष कार्याक्रमांतर्गत ग्रामीण युवा प्रगतिक मंडळ भंडारा यांच्या सौजन्याने प्रायोगिक तत्त्वावर कन्हारपायली येथील शेतकरी मनोहर शहारे यांनी पारंपरिक देशी धानाचे वाण हिराणकीची लागवड करुन भरघोस उत्पन्न मिळविले. इतर शेतकºयांनी सुद्धा दैनंदिन उपयोगासाठी या धानाची लागवड अवश्य करावी, असे मत त्यांनी व्यक्त केले.एकेकाळी नावाजलेले हिराणकी धानाचे वाण सद्यस्थितीत लुप्त झाल्यासारखे आहे. मात्र सडक-अर्जुनी तालुका कृषी प्रेरक गिरधारी बन्सोड यांच्या मार्गदर्शनात कन्हारपायली येथील शेतकरी मनोहर शहारे यांनी आपल्या शेतात अडीच किलो हिराणकी धानाची लागवड प्रायोगिक तत्वावर केली होती. कोणत्याही प्रकारच्या रासायनिक खताचा व कीटकनाशकांचा वापर न करता सेंद्रिय पद्धतीने सोनबोरू, तरोटा व रोग खताचा उपयोग करुन धानाची लागवड केली होती.हिराणकी हा देशी धान असून १३५ ते १४५ दिवसात त्याचे पीक हाती मिळते. त्याचप्रमाणे उत्पादित धानाच्या एका लोंबीत २८० ते २९० पर्यंत दाणे असतात. हे वाण सुगंधित असून बारीक आहे. सेंद्रिय पद्धतीचा वापर केल्यामुळे या धानावर कोणत्याच प्रकारच्या रोगाचा प्रादुर्भाव झाला नाही. त्यामुळे जवळपासच्या शेतकºयांनी आगाऊ मागणी केल्याचे शहारे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.पारंपरिक देशी वाण रसायनमुक्त, कमी खर्चाचे व निसर्गचक्राला पोषक आहे. जसे पृथ्वीतलावरील जीवजंतूना समानतेने जगण्याचा अधिकार आहे व विषमुक्त अन्न सर्वांना ग्रहण करण्यात अधिकार आहे, त्याप्रकाराने विषमुक्त अन्न मिळू शकते. ‘शुद्ध बिजापोटी फळे रसाळ गोमटी’ या म्हणीप्रमाणे उत्तम बियाणांचा उपयोग केल्यास त्यापासून मिळणारी फळेसुद्धा शरीरास पोषक व विषमुक्त असू शकते. त्यामुळे येणारी पिढी रोगमुक्त तयार होईल. त्यासाठी पारंपरिक देशी धानाच्या पिकांचे स्वस्थळी संरक्षण व संगोपन करणे काळाची गरज आहे.नामशेष होणाºया पारंपरिक पिकांच्या जातीची जोपासना करुन देशाच्या विकासात प्रत्येकाने हातभार लावावे, असे मत शेतकरी शहारे यांनी व्यक्त केले आहे.