शहरं
Join us  
Trending Stories
1
आता डिप्लोमसीला काहीच अर्थ राहिला नाही; इस्रायलने हल्ला केला तेव्हाच..., इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा युरोपवर आरोप
2
"लवकरात लवकर शांतता निर्माण करण्याची गरज"; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर PM मोदींची इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा
3
आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...
4
इराणवरील अमेरिकेच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
5
अणुबॉम्ब केवळ बहाणा, इराणवर हल्ला करण्यामागचा डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा हेतू वेगळाच, समोर येतेय अशी माहिती
6
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: पितृदोषातून दिलासा, शिवपूजेसह ‘या’ गोष्टी करून पाहा, चांगले घडेल!
7
७ महिन्यांत १ लाखाचे झाले ३.५ लाख! 'या' डिफेन्स स्टॉकने गुंतवणूकदारांना केलं कोट्यधीश, आता तुमची पाळी?
8
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: इच्छा पूर्ण होतील, महादेव शुभ करतील; अद्भूत योगात ‘असे’ करा व्रत!
9
खामेनी यांनी राजीनामा द्यावा अन्यथा..; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणच्या माजी प्रमुखाचा इशारा
10
रात्री तो येतो आणि सकाळी जातो...! घरमालकाने महिलेच्या पतीला फोन करून कळविले, पती येताच...
11
ITR भरताना 'या' २ चुकांमुळे अडकतात पैसे! नाही मिळणार रिफंड, प्राप्तीकर विभागाने अंतिम मुदत वाढवली
12
पहलगाममध्ये दहशतवाद्यांना केली मदत, दिला आश्रय, दोघे अटकेत, तपासातून धक्कादायक माहिती समोर
13
इराणला आधीच लागली होती हल्ल्याची कुणकुण? अणुकेंद्रांच्या सॅटेलाईट फोटोमधून अशी माहिती आली समोर
14
इराण-इस्रायल युद्धातही भारताची 'स्मार्ट' चाल! रशियाच्या सहकार्याने कच्च्या तेलाचं गणित बदललं
15
अमेरिकेचा इराणवर हल्ला; चीन, जपान, ओमान..; कोण काय म्हणाले? जाणून घ्या...
16
४ हजार सायकल स्वारांची दिंडी; राज्याच्या 80 शहरातून निघालेली दिंडी पंढरपुरात विसावली
17
बॉम्ब फोडूनही अमेरिका काही करू शकली नाही! ३७ तास हवेतच होते ६ बी२ बॉम्बर..., इराण म्हणतेय...
18
आतापर्यंत इस्रायली हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा जाणून थक्क व्हाल! खामेनेई सैनिकांकडूनही जोरदार प्रत्युत्तर
19
ट्रम्प यांच्या 'या' निर्णयाने जागतिक अर्थव्यवस्थेला धक्का? तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?
20
जगाचे 'लॉजिस्टिक्स' बदलणाऱ्या अवलियाचे निधन! मालवाहतुकीसाठी पहिल्यांदाच केला असा प्रयोग

धापेवाड्यातून पिण्याच्या पाण्याला प्राधान्य

By admin | Updated: May 4, 2016 02:54 IST

धापेवाडा उपसा सिंचन योजनेतून ज्या गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होतो त्या गावातील नागरीकांना या योजनेतून

पालकमंत्री बडोले : अधिकाऱ्यांच्या बैठकीत निर्देशगोंदिया : धापेवाडा उपसा सिंचन योजनेतून ज्या गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होतो त्या गावातील नागरीकांना या योजनेतून पिण्याच्या पाण्याचा नियमित पुरवठा करावा. या योजनेतून उद्योगाला पाणी देण्यापेक्षा पिण्याच्या पाण्याला संबंधित विभागाने प्राधान्य द्यावे, असे मत पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी व्यक्त केले.जिल्हाधिकारी कार्यालयात या संबंधाने आयोजित बैठकीत पालकमंत्री बडोले बोलत होते. यावेळी आ.विजय रहांगडाले, जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी, अपर जिल्हाधिकारी मंगेश मोहिते, धापेवाडा उपसा सिंचन योजनेचे कार्यकारी अभियंता यासतवार, तिरोडाचे उपविभागीय अधिकारी प्रवीण मिहरे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.पालकमंत्री यावेळी म्हणाले, जिल्हाधिकारी व धापेवाडा उपसा सिंचन योजनेच्या अधिकाऱ्यांनी या विषयावर एकत्र बसून पाणी सोडण्याबाबतचे नियोजन करावे. या योजनेवर ज्या गावांचा पाणीपुरवठा आहे त्या गावांना पाणीपुरवठा नियमित झाला पाहिजे. उन्हाळ्याच्या दिवसात धापेवाडा प्रकल्पात पिण्याचे पाणी असताना संबंधित गावातील महिलांना पाण्यासाठी इतरत्र भटकंती करण्याची वेळ येणार नाही, याकडे संबंधित विभागाने लक्ष दयावे अशा सूचना पालकमंत्र्यांनी केल्या.धापेवाडा उपसा सिंचन योजनेतून अदानी प्रकल्पासाठी पाणी चोरी होत असल्याच्या तक्रारी आल्याचे आमदार विजय रहांगडाले यावेळी म्हणाले. धापेवाडात शिल्लक असलेला पाणीसाठा लक्षात घेऊन पिण्याच्या पाण्यासाठीच हे पाणी उपलब्ध करुन द्यावे, असेही त्यांनी सांगितले. कार्यकारी अभियंता यासटवार यांनी धापेवाडा प्रकल्पात केवळ २ टक्के पिण्याचे पाणी आहे. त्यामुळे यापुढे उन्हाळ्याच्या दिवसात अदानी प्रकल्पाला पाणी पुरवठा करण्यात येणार नसून २७ एप्रिल रोजीच अदानी प्रकल्पाचा पाणीपुरवठा बंद केल्याचे त्यांनी सांगितले. (जिल्हा प्रतिनिधी)- तर उद्भवणार राज्यात वीज संकट४अदानी वीज प्रकल्पाला पाणी पुरवठा करण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे. पण धापेवाडात जलसंकट निर्माण झाल्यामुळे बावनथडी प्रकल्पातील पाणी धापेवाडा प्रकल्पासाठी सोडण्यासाठी वीजमंत्र्यांसह राज्य सरकारमधील वरिष्ठ लोक प्रयत्नशील असल्याचे कळते. मात्र हे पाणी धापेवाड्यात पोहोचण्यासाठी काही दिवस लागतात. त्यामुळे तातडीने सरकारने पावले उचलली नाही तर अदानी प्रकल्पाला पाणी उपलब्ध होईपर्यंत दोन युनिट बंद ठेवावे लागतील. त्यामुळे राज्यात १२०० मेगावॅट वीजेचा तुटवडा निर्माण होऊन सर्वत्र भारनियमन सुरू होणार आहे. आधीच उन्हाळ्यामुळे वीजेची मागणी वाढली असताना हे संभाव्य वीजसंकट नागरिकांसाठी त्रासदायक ठरणार आहे.धापेवाडाच्या अधिकाऱ्यांचे दुटप्पी धोरण?४दरम्यान धापेवाडा प्रकल्पाच्या कार्यकारी अभियंत्यांनी एकीकडे पाणी घेणे थांबविण्यासंदर्भातील अदानी व्यवस्थापनाला पत्र दिल्याचे सांगितले तर दुसरीकडे पाणी देणे सुरूच ठेवले, अशा आशयाची तक्रार जिल्हा परिषद सदस्य मनोज डोंगरे यांनी करून यासाठी प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता यासटवार हेच जबाबदार असल्याचा ठपका त्यांनी ठेवला. यासंदर्भात कार्य.अभियंता यासटवार यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी या विषयावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.