शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
2
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
3
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
4
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
5
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
6
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
7
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
8
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
9
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
10
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
11
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
12
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
13
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
14
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
15
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
16
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
17
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
18
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
19
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
20
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
Daily Top 2Weekly Top 5

धापेवाड्यातून पिण्याच्या पाण्याला प्राधान्य

By admin | Updated: May 4, 2016 02:54 IST

धापेवाडा उपसा सिंचन योजनेतून ज्या गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होतो त्या गावातील नागरीकांना या योजनेतून

पालकमंत्री बडोले : अधिकाऱ्यांच्या बैठकीत निर्देशगोंदिया : धापेवाडा उपसा सिंचन योजनेतून ज्या गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होतो त्या गावातील नागरीकांना या योजनेतून पिण्याच्या पाण्याचा नियमित पुरवठा करावा. या योजनेतून उद्योगाला पाणी देण्यापेक्षा पिण्याच्या पाण्याला संबंधित विभागाने प्राधान्य द्यावे, असे मत पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी व्यक्त केले.जिल्हाधिकारी कार्यालयात या संबंधाने आयोजित बैठकीत पालकमंत्री बडोले बोलत होते. यावेळी आ.विजय रहांगडाले, जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी, अपर जिल्हाधिकारी मंगेश मोहिते, धापेवाडा उपसा सिंचन योजनेचे कार्यकारी अभियंता यासतवार, तिरोडाचे उपविभागीय अधिकारी प्रवीण मिहरे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.पालकमंत्री यावेळी म्हणाले, जिल्हाधिकारी व धापेवाडा उपसा सिंचन योजनेच्या अधिकाऱ्यांनी या विषयावर एकत्र बसून पाणी सोडण्याबाबतचे नियोजन करावे. या योजनेवर ज्या गावांचा पाणीपुरवठा आहे त्या गावांना पाणीपुरवठा नियमित झाला पाहिजे. उन्हाळ्याच्या दिवसात धापेवाडा प्रकल्पात पिण्याचे पाणी असताना संबंधित गावातील महिलांना पाण्यासाठी इतरत्र भटकंती करण्याची वेळ येणार नाही, याकडे संबंधित विभागाने लक्ष दयावे अशा सूचना पालकमंत्र्यांनी केल्या.धापेवाडा उपसा सिंचन योजनेतून अदानी प्रकल्पासाठी पाणी चोरी होत असल्याच्या तक्रारी आल्याचे आमदार विजय रहांगडाले यावेळी म्हणाले. धापेवाडात शिल्लक असलेला पाणीसाठा लक्षात घेऊन पिण्याच्या पाण्यासाठीच हे पाणी उपलब्ध करुन द्यावे, असेही त्यांनी सांगितले. कार्यकारी अभियंता यासटवार यांनी धापेवाडा प्रकल्पात केवळ २ टक्के पिण्याचे पाणी आहे. त्यामुळे यापुढे उन्हाळ्याच्या दिवसात अदानी प्रकल्पाला पाणी पुरवठा करण्यात येणार नसून २७ एप्रिल रोजीच अदानी प्रकल्पाचा पाणीपुरवठा बंद केल्याचे त्यांनी सांगितले. (जिल्हा प्रतिनिधी)- तर उद्भवणार राज्यात वीज संकट४अदानी वीज प्रकल्पाला पाणी पुरवठा करण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे. पण धापेवाडात जलसंकट निर्माण झाल्यामुळे बावनथडी प्रकल्पातील पाणी धापेवाडा प्रकल्पासाठी सोडण्यासाठी वीजमंत्र्यांसह राज्य सरकारमधील वरिष्ठ लोक प्रयत्नशील असल्याचे कळते. मात्र हे पाणी धापेवाड्यात पोहोचण्यासाठी काही दिवस लागतात. त्यामुळे तातडीने सरकारने पावले उचलली नाही तर अदानी प्रकल्पाला पाणी उपलब्ध होईपर्यंत दोन युनिट बंद ठेवावे लागतील. त्यामुळे राज्यात १२०० मेगावॅट वीजेचा तुटवडा निर्माण होऊन सर्वत्र भारनियमन सुरू होणार आहे. आधीच उन्हाळ्यामुळे वीजेची मागणी वाढली असताना हे संभाव्य वीजसंकट नागरिकांसाठी त्रासदायक ठरणार आहे.धापेवाडाच्या अधिकाऱ्यांचे दुटप्पी धोरण?४दरम्यान धापेवाडा प्रकल्पाच्या कार्यकारी अभियंत्यांनी एकीकडे पाणी घेणे थांबविण्यासंदर्भातील अदानी व्यवस्थापनाला पत्र दिल्याचे सांगितले तर दुसरीकडे पाणी देणे सुरूच ठेवले, अशा आशयाची तक्रार जिल्हा परिषद सदस्य मनोज डोंगरे यांनी करून यासाठी प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता यासटवार हेच जबाबदार असल्याचा ठपका त्यांनी ठेवला. यासंदर्भात कार्य.अभियंता यासटवार यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी या विषयावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.