शहरं
Join us  
Trending Stories
1
अंकारा हादरलं! लिबियाच्या मिलिट्री चीफना घेऊन जाणारं विमान कोसळलं, एअरपोर्ट तडकाफडकी बंद
2
Silver Returns: २५ वर्षांत २६ पट; २००० साली चांदीत ₹१०,००० गुंतवले असते तर आज किती मालामाल असता?
3
मूळच्या गुजराती कुटुंबाने खरेदी केली 'पाकिस्तान एअरलाईन्स'; कोण आहेत कराचीतील उद्योगपती आरिफ हबीब?
4
कोडीन कफ सिरप तस्करीचा मास्टरमाइंड शुभम जायसवालवर ५० हजारांचं इनाम; आता संपत्तीवर चालणार बुलडोझर!
5
PPF Calculator: दर महिन्याला ₹२,०००, ₹३,००० आणि ₹५,००० गुंतवले तर मॅच्युरिटीवर किती रक्कम मिळेल; पैसेही राहतील सुरक्षित
6
पाहुणी म्हणून आली, लाखोंचे दागिने घेऊन पसार झाली; बंगळुरुमध्ये महिलेला अटक
7
बांगलादेश भारताकडून ५०,००० टन तांदूळ खरेदी करणार; दोन्ही देशांचे संबंध सुधारण्यासाठी युनूस सरकारचे प्रयत्न
8
३० वर्षांचा संसार, क्षणाचा राग अन् होत्याचं नव्हतं झालं; संशयी पतीने पत्नीला क्रूरपणे संपवलं
9
मोठा गेम प्लॅन! भाजपने शिंदेसेनेचे ठाण्यामध्येच दाबले नाक; मुंबईत अधिक जागा मागू नये म्हणून...
10
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २४ डिसेंबर २०२५: धनलाभ होईल, नवे काम हाती घ्याल!
11
कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित
12
संपादकीय: त्रिशंकूंची त्रेधातिरपीट! एचवन-बी व्हिसाधारक आज अक्षरशः लटकले आहेत...
13
महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार
14
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली
15
पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई
16
सरकारला मजुरांच्या घामाची किंमत आहे का? मनरेगा बदलण्यावर विस्तृत लेख...
17
प्रदूषणकारी मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटचे काम थांबवा; ‘एमएमआरडीए’च्या कंत्राटदाराला नोटीस 
18
निश्चित नसलेल्या जागी कुत्र्यांना अन्न देण्यापासून रोखणे गुन्हा ठरत नाही; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्वाळा  
19
म्हाडा अधिकारी राजकीय दबावाला बळी का पडतात? पुनर्विकास थांबविल्याने उच्च न्यायालयाचा सवाल
20
गृहप्रकल्पात गोदरेजची ११० कोटींची फसवणूक; अहमदाबादच्या सिद्धी ग्रुपविरुद्ध गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात सर्वत्र अवकाळी पावसाची हजेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2020 06:00 IST

लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण असून गुरूवारी (दि.६) सकाळपासूनच पावसाला सुरूवात झाली. गोंदियासह, ...

ठळक मुद्देउघड्यावरील धानाला फटका : रबीतील गहू, हरभरा पिकांचे नुकसान, शेतकऱ्यांवर परतीच्या पावसाने पुन्हा संकट

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण असून गुरूवारी (दि.६) सकाळपासूनच पावसाला सुरूवात झाली. गोंदियासह, आमगाव, गोरेगाव, सडक अर्जुनी, अर्जुनी मोरगाव, सालेकसा तालुक्यात जवळपास तासभर पाऊस झाल्याने नागरिकांची तारांबळ उडाली होती. परतीच्या पावसाचा सर्वाधिक फटका शासकीय धान खरेदी केंद्रावर उघड्यावर असलेल्या धानाला आणि रब्बी हंगामातील गहू आणि हरभरा या पिकांना बसला.त्यामुळे शेतकऱ्यांवर पुन्हा संकट ओढवले आहे.हवामान विभागाने जिल्ह्यात पुढील दोन दिवस परतीचा पाऊस होण्याचा अंदाज वर्तविला होता. त्यातच जिल्ह्यात बुधवारपासून ढगाळ वातावरण आहे. गुरूवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते.सकाळी १० वाजताच्या सुमारास परतीच्या पावसाने सर्वत्र हजेरी लावली. जिल्ह्यात गुरूवारी सायंकाळी ५ वाजेपर्यंत १४.८० मि.मी.पावसाची नोंद झाली.जिल्ह्यात सध्या जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळातंर्गत शासकीय धान खरेदी केंद्रावर धान खरेदी सुरू आहे.त्यामुळे खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात धान विक्रीसाठी आणला आहे. या धानाला गुरूवारी झालेल्या परतीचा पावसाचा फटका बसला.पावसामुळे धान भिजल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तर रब्बी हंगामातील १० हजार हेक्टरमधील गहू आणि हरभरा या पिकांना देखील मोठ्या प्रमाणात फटका बसला. त्यामुळे खरीपापाठोपाठ रब्बी हंगामाला सुध्दा मुकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. ढगाळ वातावरण आणि पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला होता.त्यामुळे अनेकांनी शेकोट्या पेटवून ऊब घेत असल्याचे चित्र सुध्दा पाहयला मिळाले. हवामान विभागाने पुढील दोन दिवस पुन्हा परतीचा पाऊस होण्याचा अंदाज वर्तविला आहे.कचारगड यात्रेला पावसाचा फटकादर्रेकसा : समस्त आदिवासी बांधवाचे श्रद्धास्थान असलेल्या सालेकसा तालुक्यातील कचारगड यात्रेला शुक्रवारपासून (दि.७) सुरूवात होत आहे.या यात्रेकरिता बुधवारपासूनच भाविक यात्रा स्थळी येण्यास सुरूवात झाली. आंध्रप्रदेश, छत्तीसगड, ओडिसा, झारखंड या राज्यातील भाविक बुधवारीच यात्रास्थळी दाखल झाले होते. तर यात्रास्थळी भाविकांसाठी मंडप उभारण्यात आले आहे.याला गुरूवारी झालेल्या पावसाचा फटका बसला.त्यामुळे यात्रेकरुंची गैरसोय झाली.सर्वत्र पाऊस जनजीवन विस्कळीतसोनपुरी : गुरूवारी सकाळच्या सुमारास झालेल्या पावसामुळे सोनपुरी परिसरातील जनजिवन विस्कळीत झाले होते.गुरूवारी सोनपुरी येथे बाजार भरत असल्याने याला सुध्दा पावसाचा फटका बसला. तर गहू आणि हरभरा पिकाचे सुध्दा मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकºयांवर आर्थिक संकट ओढावले आहे.पावसामुळे शेतकरी संकटातसुकडी-डाकराम : गुरूवारी सकाळी परिसरात झालेल्या दमदार पावसामुळे परिसरातील शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे. रब्बी हंगामातील लाखोळी, जवस, हरभरा, पीक फुलावर आले असून त्याला परतीच्या पावसाचा फटका बसला. तर भाजीपाला पिकांचे सुध्दा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पाऊस व थंडीमुळे रब्बीतील पिकांवर किडरोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे बळीराजा चिंतातूर असल्याचे चित्र आहे.साखरीटोला परिसरात तासभर पाऊससाखरीटोला : सालेकसा तालुक्यातील साखरीटोला (सातगाव) येथे गुरूवारी सकाळपासूनच पावसाला सुरुवात झाल्याने वातावरणात गारवा वाढला. तासभर झालेल्या पावसामुळे रस्त्यावर ठिकठिकाणी पाणी साचले होते. परतीच्या पावसामुळे रब्बीतील पिकांचे सुध्दा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.आदिवासी विकास महामंडळाच्या धान खरेदी केंद्रावर उघड्यावर असलेले धान भिजल्याने शेतकºयांचे नुकसान झाले.यावर्षी थंडीच्या दिवसात वेळोवेळी पाऊस पडत असल्याने १९९४ ला अशीच परिस्थिती होती असे काही जाणकार शेतकरी सांगतात.गोरेगाव तालुक्यात पावसाची रिपरिपगोरेगाव : तालुक्यात गुरूवारी सकाळी आठ वाजतापासून परतीच्या पावसाने दमदार हजेरी लावली. जवळपास दीड तास पाऊस झाल्याने रस्त्यावर आणि शेतातील बांध्यामध्ये पाणी साचल्याचे चित्र आहे. या पावसचा सर्वाधिक फटका रब्बी हंगामातील गहू आणि हरभरा या पिकांना बसला.ढगाळ वातावरण आणि पावसामुळे या पिकांवर किडरोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे.दिवसभर पावसाची रिपरिप असल्याने जनजिवन काही प्रमाणात प्रभावित झाले होते.

टॅग्स :Rainपाऊस