शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

प्रतापगडमध्ये बिबट्याचा धुमाकूळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2018 00:26 IST

प्रतापगड येथे बिबट्याचा धुमाकूळ असल्याने गावात दहशत पसरली आहे. वनविभागातर्फे गावात प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी पत्रक व ग्रामसभा घेऊन खबरदारीबाबत मार्गदर्शन करण्यात आले. बिबट्याचा धुमाकूळ थांबविण्यासाठी गावकरी वनविभागाकडे तक्रार करीत आहेत.

ठळक मुद्देगावात दहशत : प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी जनजागृती

लोकमत न्यूज नेटवर्कअर्जुनी-मोरगाव : प्रतापगड येथे बिबट्याचा धुमाकूळ असल्याने गावात दहशत पसरली आहे. वनविभागातर्फे गावात प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी पत्रक व ग्रामसभा घेऊन खबरदारीबाबत मार्गदर्शन करण्यात आले. बिबट्याचा धुमाकूळ थांबविण्यासाठी गावकरी वनविभागाकडे तक्रार करीत आहेत.प्रतापगड या गावाला लागून पहाड व जंगल आहे. जंगलाला लागूनच गावच्या मध्यभागी जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा व अंगणवाडी आहे. सुमारे दोन महिन्यांपासून या परिसरात बिबट्याचा धुमाकूळ सुरु आहे. १ आॅगस्ट रोजी सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास शालेय परिसरात बिबट आढळून आला होता. यामुळे विद्यार्थ्यांच्या जिवीताला धोका संभवतो. शालेय प्रशासनाने याची उपवनसंरक्षकांकडे तक्रार करुन बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे.गोठणगावच्या वनपरिक्षेत्राधिकाऱ्यांनी लगेच या पत्राची दखल घेऊन उपवनसंरक्षकांना मार्गदर्शन मागविले आहे. हा बिबट साधारणपणे अंधार पडल्यानंतर गावात येतो. कोंबड्या, कुत्रे, कबूतर यावर ताव मारुन आपली भूक भागवितो. त्याने गावातीलच एका मुलीवर झेप घेतली. मात्र त्यातून ती बचावली अशाही चर्चा आहेत. बिबटच्या या वावरामुळे गावकºयांनी जंगलाच्या दिशेने जाणे टाळले आहे. बिबटच्या अधिवास तपासणीसाठी वनविभागातर्फे गावात मुख्य ठिकाणी ट्रॅप कॅमेरे बसविले आहेत. पिंजरे सुद्धा आणून ठेवले आहेत. गाव व जंगल परिसरात कार्यरत बिट वनरक्षकाची आळीपाळीने गस्त केली जात आहे. गस्त करीत असतांना उपाययोजना म्हणून फटाके फोडून आवाज केला जात आहे. आदि उपाययोजना वनविभाग काटेकोरपणे करीत आहे. एकापेक्षा अधिक बिबट असण्याची शक्यता गावकºयांनी व्यक्त केली आहे. उपवनसंरक्षक यावर काय निर्णय घेतात याकडे गावकºयांचे लक्ष लागले आहे.गोठणगावात कोंबड्या केल्या फस्तबिबट्याने सोमवारी (दि.६) सदाराम औराशे यांच्या बकºया खाऊन फक्त केल्या. तर मुकुंदा जमदाळ, गोविंदा कलाम, रमेश हटवार आणि राजेंद्र वालदे यांच्या घरातील कोंबड्याही बिबट्याने खाऊन फस्त केल्या आहेत. बिबट्याचा वावर वाढल्यामुळे नागरिक दशहतीत असून रात्रीला घराबाहेर निघणे कठिण झाले आहे. तरी वनविभागाने बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. एवढेच नाही तर एकट्या लाल तोंड्या बंदराचा उपद्रव गावात वाढला आहे. बंदर घरावरचे कवेलू काढून घरातील भात-भाजी, तांदुळ-गहू भाजीपाला खात अहे. ग्यानीराम काळसर्पे व प्रकाश राऊत यांच्या घरावरील कवेलू काढून भात-भाजी खाऊन फस्त केले. बंदरामुळे उपाशी राहण्याची पाळी नागरिकांवर आली आहे.

टॅग्स :leopardबिबट्याforest departmentवनविभाग