शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
7
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
8
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

कोहलगाव,रामपुरी परिसरात विजेचा लंपडाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:28 IST

अर्जनी-मोरगाव : आदिवासीबहुल, नक्षलप्रभावित व अतिदुर्गम भाग असलेल्या कोहलगाव, रामपुरी व अन्य दहा पंधरा गावांत गेल्या १५ दिवसांपासून विजेचा ...

अर्जनी-मोरगाव : आदिवासीबहुल, नक्षलप्रभावित व अतिदुर्गम भाग असलेल्या कोहलगाव, रामपुरी व अन्य दहा पंधरा गावांत गेल्या १५ दिवसांपासून विजेचा लंपडाव सुरू आहे. घरगुती वापरासह शेती व लघु उद्योगावर याचा मोठा परिणाम होत आहे. वीजपुरवठा नियमित सुरू राहावा, यासाठी माजी मंत्री राजकुमार बडोले यांच्या नेतृत्वात परिसरातील अनेक गावच्या सरपंचासह शिष्टमंडळाने वीज कंपनीचे कार्यकारी अभियंता फुलझेले यांना प्रत्यक्ष भेटून निवेदन देण्यात आले.

ग्रामपंचायत कोहलगावअंतर्गत येणाऱ्या गावांमध्ये तसेच या परिसरातील अन्य ग्रामपंचायतीच्या परिसरातील गावांमध्ये विजेची समस्या गंभीर बनली आहे. वारंवार विद्युत गुल होणे तसेच विद्युतच्या कमी दाबामुळे घरगुती दिवे, पंखे, कुलर व घरगुती पाण्याच्या मोटारी अजिबात चालत नाहीत. विजेच्या अशा लंपडावामुळे विजेवर चालणारे अनेक उपकरण निकामी झाले आहेत. तसेच रामपुरी पाणीपुरवठा योजना ही परिसरातील पंधरा-वीस गावांमध्ये पाणी पुरविणारी योजना आहे. मात्र, वीजपुरवठा बरोबर होत नसल्याने या परिसरात कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली आहे. रामपुरी,धाबेपवनी, झासीनग, कोहलगाव, कान्होली या ग्रामपंचायतीसह अन्य गावांतील वीजपुरवठा आठ दिवसांत योग्यप्रकारे सुरू झाला नाही तर परिसरातील नागरिकांसह मोठे आंदोलन करण्याचा इशारा माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी दिला आहे.

शिष्टमंडळात तालुका भाजपध्यक्ष अशोक लंजे, कान्होलीचे सरपंच संजय खरवडे, दिलीप रहेले, कोहलगावच्या सरपंच माधुरी चांदेवार, गुरुदेव चांदेवार, रामपुरीच्या सरपंच बुडगेवार, नरेश बुडगेवार, पवनी धाबेच्या सरपंच नंदेश्वर, पराग कापगते, कैलास पंधरे यांचा समावेश होता.