शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वे ठप्प; मेट्रो सेवा सुरळीत, प्रवाशांना अल्प दिलासा
2
'नेहरूंनी पाकिस्तानला मदत केली होती', 'सिंधू जल' करारावरुन पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
3
पाकिस्तानची खोटी बडबड! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये गुडघे टेकले, आता परदेशात जाऊन मारतायत थापा
4
उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी विरोधकांकडून उमेदवार जाहीर; सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती रिंगणात
5
ऑटो कंपन्यांवरील अरिष्ट टळले...! चीनने दरवाजे उघडले; रेअर अर्थ मेटलसह दोन वस्तूंवरील निर्बंध हटविले
6
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधू बाजी मारणार की महायुती मात देणार? निकालाची उत्सुकता शिगेला
7
GST बदलाच्या घोषणेनंतर 'या' ५ शेअर्समध्ये होणार मोठी वाढ? ब्रोकरेजकडून खरेदीचा सल्ला!
8
दिलीप प्रभावळकरांचा रोमांचक 'दशावतार'; कोकणातल्या मातीत घडणाऱ्या सिनेमाचा अंगावर काटा आणणारा ट्रेलर
9
"साहेब माझी आई हरवली"; तक्रार नोंदवण्यासाठी मुलगा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला, तपास सुरू होताच सगळ्यांना धक्का बसला!
10
१९४६ च्या कलकत्ता दंगलीत हजारो हिंदूंचे प्राण वाचवणारे गोपाल पाठा कोण होते? कोण मानतं हिरो, तर कुणी म्हणतं व्हिलन  
11
पापा की परी... सावधान! स्कुटरच्या हँडलमधून साप निघाला साप, तरुणीने उडीच मारली...
12
इंडियन ऑइलने अमेरिकेला दाखवला 'ठेंगा', रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी सुरुच राहणार...
13
VIDEO : किन्नरच्या सौंदर्यावर नेटकरी 'फिदा'! व्हिडिओ पाहून युजर्स म्हणतायत...; तुम्हीही थक्क व्हाल!
14
मिठी नदी धोक्याच्या पातळीवर; नदीलगतच्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं, बीकेसीत पाणी साचण्याची शक्यता
15
Mangalagauri 2025: मंगळगौरीचे पावित्र्य आणि माधुर्य दर्शवणारे दीनानाथ दलाल यांचे चित्र; पहा बारकावे!
16
ऋतुराजनं बॉलिंगमध्ये आजमावला हात; सिक्सर मारल्यावर विकेट्स घेत हिशोब केला चुकता (VIDEO)
17
ती गुढ आग... ज्यात भारताचं सेमीकंडक्टर बनवण्याचं स्वप्न झालं होतं जळून खाक, ७ फेब्रुवारी १९८९ रोजी नेमकं काय झालं होतं?
18
सावधान! अनोळखी व्यक्तीला कॅशच्या बदल्यात पैसे ट्रान्सफर करताय? 'या' एका चुकीमुळे जावं लागेल थेट तुरुंगात
19
Himachal Pradesh: हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटी; अनेक घरे, गाड्या गेल्या वाहून, ४०० रस्ते बंद!
20
Miss Universe India: २२ वर्षांच्या मनिका विश्वकर्माने जिंकला 'मिस युनिव्हर्स इंडिया २०२५' चा खिताब, कोण आहे ही सुंदरी?

ग्रामपंचायत कार्यालयाचे वीज मीटर जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2017 22:04 IST

बिलाची रक्कम न भरल्यामुळे अखेर सडक-अर्जुनी तालुक्यातील कोदामेडी ग्रामपंचायत कार्यालयाचे मीटर वीज कंपनीने जप्त केले.असाच प्रकार घडत राहीला तर त्यामुळे ग्रामपंचायत डिजिटल करण्याचा शासनाचा उद्देश कसा पूर्ण होईल?

ठळक मुद्देवीज कंपनीची कारवाई : पाच महिन्यांपासून होते बिल थकित

लोकमत न्यूज नेटवर्कसौंदड : बिलाची रक्कम न भरल्यामुळे अखेर सडक-अर्जुनी तालुक्यातील कोदामेडी ग्रामपंचायत कार्यालयाचे मीटर वीज कंपनीने जप्त केले.असाच प्रकार घडत राहीला तर त्यामुळे ग्रामपंचायत डिजिटल करण्याचा शासनाचा उद्देश कसा पूर्ण होईल? असा सवाल निर्माण झाला आहे.मागील पाच महिन्यांपासून कोदामेडी ग्रामपंचायतीवर २ हजार २८० रूपयांचे बिल होते. फक्त एवढीच रक्कम भरणे गरजेचे होते. वीड वितरण कंपनीच्या संबंधित शाखा कार्यालयाकडून वारंवार सूचना दिल्यानंतर देखील सूचनांचे पालन ग्रामपंचायतीच्यावतीने करण्यात आले नाही. तसेच बिल भरण्यास अनियमितता दर्शविल्यामुळे अखेर वीज वितरण कंपनीला नाईलाजास्तव कारवाई करून वीज मीटर जप्त करावे लागले.प्रधानमंत्री मोदी हे देशातील सर्वच ग्रामपंचायतींना डिजिटल करण्याचे स्वप्न बघत आहेत. शासनाच्या निर्देशानुसार आता ग्रामपंचायतींमध्येच सर्वच दाखले आॅनलाईन पध्दतीने देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. शिवाय जेथे ही सुविधा नाही त्या ग्रामपंचायतच्या संगणकावर सर्वच दाखले ग्रामस्थांना प्राप्त होतील, अशी सोयसुद्धा केली जात आहे. आता जी कर्जमाफी शासनाच्यावतीने करण्यात आली, त्यासाठी अर्जदेखील ग्रामपंचायतीमध्येच आॅनलाईन पध्दतीने भरावयाचे आहे.परंतु जर एखादी ग्रामपंचायत वीज बिल भरत नसेल व त्या ग्रामपंचायतचे मीटर जप्त होत असेल तर ती आॅनलाईन सुविधा लोकांच्या काय कामाची? व लोकांच्या आॅनलाईन कामाचे काय? असे प्रश्न उपस्थित होत आहेत.शासनाच्यावतीने ग्रामपंचायतींना लाखोंचा निधी देण्यात येतो. पण ग्रामपंचायत पाच महिन्यांमध्ये फक्त २ हजार २८० रूपयांचे वीज देयक भरु शकत नसेल तर देशाच्या डिजिटल भारताच्या स्वप्नाचे काय होईल. शिवाय गावाची प्रमुख असलेली ग्रामपंचायतच असे करीत असेल तर सामान्य नागरिकांचे काय? असे प्रश्न उपस्थित होत आहेत.कोदामेडी ग्रामपंचायतच्यावतीने विकासाचे मोठमोठे दावे केले जातात. पण साधे बिल न भरल्यामुळे वीज कंपनीच्या कर्मचाºयांनी सरळ-सरळ मीटरच काढून नेल्याने ग्रामपंचायतचे विकासाचे सगळे दावे पोकळ असल्याचे दिसून येते.कोदामेडी ग्रामपंचायतवर गेल्या पाच महिन्यांपासून बिल थकीत होते. ग्रामपंचायतला वारंवार सूचना देऊनही बिल भरण्यात आले नाही. ग्रामपंचायतच असे करीत असेल तर गावातील सामान्य नागरिकांवर काय प्रभाव पडेल. त्यामुळे नाईलाजास्तव मीटर काढण्यात आले.-राजू मानकर,सहायक वीज अभियंता, सडक-अर्जुनी