शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

वीज गळतीचे प्रमाण ३४ टक्के

By admin | Updated: October 17, 2015 02:22 IST

गोंदिया शहरात वीज चोरीमुळे मोठ्या प्रमाणात विजेची तूट येत आहे. सद्यस्थितीत ३४ टक्के वीजेची गळती सुरू असून ...

तूट ग्राहकांच्या माथी : शहरात लागणार १९ हजार ‘आयआर’ मीटरगोंदिया : गोंदिया शहरात वीज चोरीमुळे मोठ्या प्रमाणात विजेची तूट येत आहे. सद्यस्थितीत ३४ टक्के वीजेची गळती सुरू असून ही तूट भरून काढण्यासाठी सर्वसामान्य वीज ग्राहकांना भुर्दंड देत त्यांच्या बिलातून ही रक्कम वसूल केली जात आहे. प्रत्यक्षात वापरलेल्या वीजेशिवाय विविध शुल्काच्या नावाखाली ही ३४ टक्के तूट भरून काढणे सुरू असल्यामुळे ‘चोर सोडून सन्याशाला फाशी’ देण्याच्या या प्रकाराबद्दल असंतोष व्यक्त केला जात आहे.वीज ग्राहकांना त्यांनी वापरलेल्या युनीटनुसार टप्प्याटप्प्याने वीज बिल वाढत जाते. त्यामुळे जितके जास्त युनिट वापरले तेवढे विजेचे दर वाढत जातात. त्यानुसार ग्राहकाला वीज दराचा जो टप्पा लागू पडेल त्यानुसार जेवढे युनिट वीज वापरली त्याचे शुल्क (वीज आकार) वसूल करण्याचा वीज कंपनीचा हक्क आहे. मात्र स्थिर आकार, वीज शुल्क, इंधन समायोजन आकार अशा विविध नावाखाली प्रत्येक ग्राहकाकडून अतिरिक्त भुर्दंड सोसावा लागत आहे. जितकी विजेची तूट जास्त तितका हा अतिरिक्त भुर्दंड वाढत जातो.वीज चोरीला आळा घालण्यासाठी शहरात इन्फ्रारेड मीटर लावले जाणार आहेत. या मीटरचे रिडिंग मशीनद्वारे घेतले जाणार आहे. या मीटरमध्ये कोणत्याही ग्राहकाने छेडछाड करण्याचा प्रयत्न केला तर त्या मिटरमध्ये पाचपट अधिक आकडे पडणार आहेत. त्या अधिकच्या रिडींगनुसार अधिक बील येईल. ते बिल घेऊन ग्राहक तक्रार करण्यास गेल्यास त्याने विद्युत चोरी करण्याचा प्रयत्न कसा केला याबाबत त्याला सूचना दिली जाणार आहे. पुन्हा असे कृत्य केल्यास त्याच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो. (तालुका प्रतिनिधी)...म्हणून वाढले वीज चोरीचे प्रमाणवीज चोरीवर आळा घालण्यासाठी वीज वितरण कंपनीने गतिमान विकास योजनेंतर्गत गोंदिया शहरात १९ हजार आय.आर. (इंफ्रा रेड) मीटर लावण्याचे वीज वितरण कंपनीने ठरविले आहे. वास्तविक गोंदिया शहरात २९ हजार आयआर मीटर दोन वर्षापूर्वीच लावायचे होते. परंतु तत्कालीन अधिकाऱ्यांनी याकडे कसलेही लक्ष दिले नाही. त्यानंतर सर्व जिल्ह्यात हे आयआर मीटर लागल्यानंतर गोंदिया शहरातही २९ हजारापैकी १० हजार मीटर लावण्यात आले. परंतु १९ हजार मिटर लागलेच नव्हते. त्यामुळेच शहरात वीज चोरीचे प्रमाण वाढले. हे सर्व मीटर लागल्यानंतर वीज गळतीचे प्रमाण ३५ टक्क्यांवरून १५ टक्क्यांवर येऊ शकते, असे महावितरणच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.वीज चोरट्यांवर कारवाईच नाहीगोंदिया शहरात मीटरमध्ये छेडछाड करून वीज चोरी करणे, आकडे टाकून वीज चोरी करणे याशिवाय उद्योजकांकडून वीज चोरी होण्याचे प्रकार सर्रास घडत आहे. यामुळेच गोंदियात वीज गळतीचे प्रमाण ३४ टक्के आहे. मात्र महावितरणच्या संबंधित पथकाकडून कोणावरही कारवाई होत नाही. याचे रहस्य अद्यापही अनेकांना कळलेले नाही. वीज चोरांच्या या प्रतापाचा भुर्दंड मात्र अतिरिक्त शुल्कांद्वारे सामान्य ग्राहकांच्या खिशातून वसूल केला जात आहे.