शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
3
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
4
व्हाट्सॲप युजर्ससाठी महत्त्वाची बातमी: 'Meta AI' मुळे ग्रुप चॅट्सची प्रायव्हसी धोक्यात? पेटीएम संस्थापकांचा दावा
5
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
6
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
7
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
8
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
9
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली
10
शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात; Nifty रेड झोनमध्ये, 'या' शेअर्समध्ये दिसली मोठी तेजी
11
"एकटीच राहते, मुलगा माझ्यासोबत राहत नाही...", ७९ वर्षीय उषा नाडकर्णी जगताहेत एकाकी जीवन, दुःख व्यक्त करत म्हणाल्या...
12
पंतप्रधान, मुख्यमंत्री असो अथवा मंत्री...; ३० दिवसांपेक्षा अधिक काळ तुरुंगात राहिल्यास खुर्ची जाणार! आज संसदेत ३ विधेयकं सादर होणार
13
आजचे राशीभविष्य, २० ऑगस्ट २०२५: नवीन कार्याच्या प्रारंभात अडचणी; व्यवसायात अपेक्षित सहकार्य
14
थकबाकी तिप्पट, व्याज चार पट; सरकारवर वाढतोय कर्जाचा डोंगर; सध्याची रक्कम २०० लाख कोटींवर
15
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
16
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
17
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
18
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ
19
सोन्याचे दागिने ‘एसआयपी’वर घ्यावे का? पैसे भरताना ज्वेलरची बाजारातील पतही तपासा
20
मिठी नदी धोका पातळीपर्यंत; रहिवाशांचा गोंधळ; गर्दी नियंत्रित करताना यंत्रणेच्या नाकीनऊ

वीज कंपनीकडून वीजकापणी जोमात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2018 22:08 IST

राज्य शासनाच्या नवीन आदेशाचा आधार घेवून वीज कंपन्यांनी गोंदिया जिल्ह्यात वीज पुरवठा खंडीत करण्याचा धडाका सुरू केला आहे. त्यामुळे ग्रामीण भागात पाणी टंचाई व अंधाराचे साम्राज्य निर्माण होत आहे.

ठळक मुद्देसुरेश हर्षे यांचा आरोप : राज्य शासनाच्या दुहेरी धोरणाचा परिणाम

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदया : राज्य शासनाच्या नवीन आदेशाचा आधार घेवून वीज कंपन्यांनी गोंदिया जिल्ह्यात वीज पुरवठा खंडीत करण्याचा धडाका सुरू केला आहे. त्यामुळे ग्रामीण भागात पाणी टंचाई व अंधाराचे साम्राज्य निर्माण होत आहे. हा राज्य शासनाच्या दुहेरी धोरणाचा परिणाम असल्याचा आरोप जिल्हा परिषद सदस्य सुरेश हर्षे यांनी केला आहे.राज्य शासनाच्या ग्राम विकास विभागाचे कक्ष अधिकारी मदन सोडे यांनी राज्यातील सर्व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना २८ फेब्रुवारी रोजी पत्र पाठविले. त्यात ग्रामपंचायत अंतर्गत पथदिव्यांची बिले स्वनिधी किंवा १४ व्या वित्त आयोगातून भरणा करावे. भरणा न केल्यास वीज वितरण कंपनी आपल्या ग्रामपंचायतची वीज जोडणी कापू शकते, असे आदेशीत केले. या पत्राचा आधार घेवून वीज कंपनी जिल्ह्यात ग्रामपंचायत पथदिवे व पाणी पुरवठा योजनेची वीज कापणी जोमात करीत असल्याचा आरोप हर्षे यांनी केला आहे.पूर्वी पथदिव्यांचे बिल राज्य शासन जिल्हा परिषदेला देत होते व जिल्हा परिषद भरणा करीत होती. परंतु राज्य शासनाने वीज कंपन्यांशी संगनमत करून कंपनीची वसुली कशी लवकरात लवकर करावी, या हेतूने प्रत्यक्ष नव्हे तर अप्रत्यक्षपणे कंपनीला सहकार्य करीत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील जनतेवर अंधाराचे साम्राज्य पसरत आहे. वीज निर्मिती कमी असल्यामुळे सहकार्यसुद्धा होईल व वसुली सुद्धा वाढेल, हा राज्य शासनाचा हेतू ग्रामपंचायतींना कर्जबाजारी करण्यासारखा आहे.ग्रामपंचायतचा १४ व्या वित्त आयोगाचे बजेट मार्चनंतर तयार होते. पण पत्र शासनाने २८ फेब्रुवारी रोजी काढले. त्यामुळे १४ व्या वित्त आयोगात वीज बिल भरण्याची तरतूद नाही. मग वीज देयक भरणार कसे? असा प्रश्न आहे. वर्ष संपू देणे व बजेटपर्यंत वेळ देणे गरजेचे होते. तसेच हा निधी १४ व्या वित्त आयोगाला वाढीव देणे गरजेचे होते. परंतु बजेट तयार होण्याआधीच पत्राची अंमलबजावणी करून राज्य शासन व वीज कंपनी नागरिक व ग्रामपंचायतसह खेळ करीत आहे. आधीच १४ व्या वित्त आयोगाचा निधी ग्रामपंचायतला अल्प प्रमाणात मिळतो. त्यातही विविध निकष ठरवून देण्यात आले आहेत. त्यात टक्केवारी नुसार खर्च करायचे आहे. मग वर्षाकाठी नळ योजना व पथदिव्यांचे बिल भरणे कठीण ठरणार आहे. यावर जि.प. सर्वसाधारण सभेत गंगाधर परशुरामकर व सुरेश हर्षे यांनी १४ व्या वित्त आयोगाचे नियोजन होतपर्यंत कनेक्शन कापू नये व हा निर्णय ग्रामपंचायतचे अधिकार कमी करण्याचे शासनाचे धोरण असल्याचा आरोप केला आहे.गुन्ह्यात वाढ होण्याची शक्यताआधीच जिल्ह्यात पाणी टंचाई आहे. पाणी पुरवठा योजनेचे कनेक्शन कापले तर पाण्याची टंचाई निर्माण होईल व पथदिव्यांचा वीज पुरवठा बंद झाल्यास चोरी व महिलांवरील अत्याचारात वाढ होईल. शिवाय सरपटणाºया जीवजंतूंचा धोका वाढेल. यासाठी सदर निर्णयात बदल करण्यात यावा. तसेच राज्य शासनाने आधीप्रमाणेच वीज बिलाचा भरणा करावा व वीज कनेक्शन कापू नये, अशी मागणी हर्षे यांनी केली आहे.