शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत रात्र वैऱ्याची! आधीच यमुनेच्या पुराचे पाणी, त्यात भूकंप, अफगाणिस्तानात केंद्र
2
इथे खरा पेच...! दुकानदार २२ सप्टेंबरपासून आधीचा माल कसा विकणार? GST कमी करून की...
3
स्वातंत्र्यानंतरचा सर्वात मोठा निर्णय, काँग्रेसच्या काळात...; जीएसटी बदलावर पंतप्रधानांची पहिली प्रतिक्रिया
4
अजित पवारांना नडलेल्या IPS अधिकारी अंजना कृष्णा कोण आहेत?
5
GST: जीएसटी कपातीच्या बैठकीत मोठे राजकारण रंगले; विरोधी राज्यांचे अर्थमंत्री अडून बसले, गोष्ट मतदानापर्यंत गेलेली...
6
नेपाळमध्ये फेसबुक, एक्ससह २६ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी, युट्यूब अन् व्हॉट्सअ‍ॅपवरही बंदी
7
मोठा गाजावाजा करत मुंबईकडे कूच करणार त्याआधीच वैभव खेडेकरांचा भाजपा पक्षप्रवेश स्थगित; कारण काय?
8
नाशिक मंडळ : अल्प उत्पन्न गटासाठी म्हाडाची ४७८ घरे
9
पुरामुळे भारत-पाकिस्तान सीमेचे मोठे नुकसान; ११० किमीच्या कुंपणाची पडझड, बीएसएफच्या ९० चौक्या पाण्यात
10
PM मोदींच्या मणिपूर दौऱ्यापूर्वी मोठे यश; राज्य आणि केंद्राने कुकी समूहाशी केला शांतता करार
11
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये उद्ध्वस्त झालेल्या नूर खान एअरबेसच्या दुरुस्तीचे काम सुरू; भारताने ब्राह्मोस टाकून उद्ध्वस्त केले होते
12
फार्महाऊसवर सीक्रेट बैठक, असीम मुनीरचा तगडा प्लॅन; पुढील १० वर्ष पाकिस्तानवर करणार 'राज्य'
13
बस फक्त पेट्रोल, डिझेल तेवढे जीएसटीमध्ये आणायचे राहिले...; तिजोरीत फक्त २० रुपयेच आले असते...
14
Happy Teachers Day 2025: शिक्षक दिनानिमित्त मराठी Messages, Quotes, Whatsapp Status आणि Greetings शेअर करुन द्या लाडक्या शिक्षकांना शुभेच्छा!
15
"विकास हा संतुलितपणे हवा"; व्हायरल व्हिडीओनंतर सर्वोच्च न्यायालयाने टोचले कान, केंद्राला नोटीस
16
मुंबई उपनगरात ईद-ए-मिलाद निमित्त सुट्टीच्या तारखेत बदल, ५ सप्टेंबरची सुट्टी कधी? जाणून घ्या
17
Delhi Flood: खवळलेल्या यमुनेचं भयावह रुप, पुराचं पाणी मंत्रालयाच्या उंबरठ्यावर, फोटो पहा
18
“हैदराबाद गॅझेटला सरकार अनुकूल, तेलंगणाप्रमाणे ४२ टक्के आरक्षण देणार का?”: हर्षवर्धन सपकाळ
19
GST च्या उत्साहानंतर बाजारात नफावसुली! सेन्सेक्स-निफ्टी उच्च पातळीवरून खाली, सर्वाधिक घसरण कुठे?
20
देवाची प्रत्यक्ष भेट! उपेंद्र लिमये यांना भेटले सुपरस्टार रजनीकांत, थलायवाला पाहून अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना

अपघातांचे जनक ठरताहेत रस्त्यांवरचे खड्डे

By admin | Updated: June 24, 2015 01:57 IST

शहरातील बहुतांश रस्त्यांच्या मधोमध खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांत पावसाचे पाणी भरून ते दिसेनासे होत असल्याने हेच खड्डे आता ....

पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष : सदस्य व पदाधिकाऱ्यांचे मौन, शहरवासीयांचा जीव मात्र धोक्यात गोंदिया : शहरातील बहुतांश रस्त्यांच्या मधोमध खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांत पावसाचे पाणी भरून ते दिसेनासे होत असल्याने हेच खड्डे आता अपघातांचे जनक बनत आहेत. या प्रकाराकडे मात्र पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. तर पदाधिकारीही आपली जबाबदारी झटकून मोकळे झाल्याचे बघावयास मिळत आहे. या प्रकारामुळे शहरवासीयांचा जीव मात्र धोक्यात असून त्यांत रोष खदखदत आहे. या खड्ड्यांची त्वरीत दुरूस्ती करण्याची गरज आहे, अन्यथा शहरवासीयांच्या जीवावर बेतणार यात शंका नाही. शहरातील रस्त्यांबाबत काही न बोललेलेच बरे अशी स्थिती आहे. बहुतांश रस्ते उखडल्याने गोंदिया शहराची गत एखाद्या खेड्यापेक्षाही बत्तर झाली आहे. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे शहरात वाहन चालविणे कठिण झाले आहे. त्याता आता मात्र रस्त्यांवरील उघड्या खड्ड्यांमुळे लोकांच्या जीविताला धोकाही दिसून येत आहे. त्याचे कारण असे की, रस्त्यांच्या खालून गेलेल्या नाल्यांची सफाई करण्यासाठी खड्डे (आऊटलेट) रस्त्यांच्या मधोमध किंवा कडेला सोडण्यात आले आहे. या खड्ड्यांची सफाई करून त्यावर झाकण टाकून हे खड्डे बंद ठेवण्याची गरज आहे. येथे मात्र चित्र उलटेच आहे. बहुतांश खड्ड्यांवर झाकणच नाही, तर काही खड्ड्यांचे झाकण त्यांच्या शेजारी ठेवले असल्याचे चित्र आहे. बाजार भागात असलेल्या गुजराती समाजवाडी समोरून भाजी बाजाराकडे जाणाऱ्या रस्त्याच्या मधोमध असा खड्डा (आऊटलेट) ठेवण्यात आला आहे. मात्र त्याला झाकण लावण्यात आलेले नाही. असाच खड्डा इसरका मार्केट समोर, शारदा वाचनालय समोर असून असेच खड्डे शहरातील कित्येक ठिकाणांवर दिसून येतात. या खड्ड्यांवर झाकण लावण्याची गरज आहे. मात्र तेवढी तसदी घेण्यासाठी पालिका प्रशासनाकडे वेळ नसून त्यांचे याकडे सपशेल दुर्लक्ष आहे. तर श्री टॉकीज शेजारील दिल्ली हॉटेल समोर रस्त्याच्या मधोमध नाली फुटून तेथे खड्डा पडला आहे. यासह अशाच कित्येक खड्ड्यांची दुरूस्ती करण्याची गरज आहे. मात्र त्यांची आहे तीच स्थिती दिसून येत आहे. सध्या पावसाळा सुरू आहे. त्यातही गोंदिया शहरातील पावसाळ्याची विशेषता अशी की, येथे पावसाचे पाणी रस्त्यावरून वाहून न जाता रस्त्यावरच साचून राहते. अशात मात्र हे रस्ते पाण्याखाली जात असून रस्त्याने जाणाऱ्या-येणाऱ्यांना रस्त्यावरील हे खड्डे दिसत नाही. अशात लहान-सहान अपघात तर या खड्ड्यांमुळे घडतच आहेत. मात्र एखादा मोठा अपघात घडून त्यात कुणाच्या जीवावर बेतण्याची वाट शहराचे नगर पालिका प्रशासन बघत आहे काय असा सवाल मात्र शहरवासीयांकडून केला जात आहे. (शहर प्रतिनिधी)