शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिलीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
3
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
4
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
5
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
6
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
7
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
8
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
9
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
10
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
11
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
12
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
13
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
14
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
15
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
16
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
17
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
18
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
19
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
20
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
Daily Top 2Weekly Top 5

अपघातांचे जनक ठरताहेत रस्त्यांवरचे खड्डे

By admin | Updated: June 24, 2015 01:57 IST

शहरातील बहुतांश रस्त्यांच्या मधोमध खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांत पावसाचे पाणी भरून ते दिसेनासे होत असल्याने हेच खड्डे आता ....

पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष : सदस्य व पदाधिकाऱ्यांचे मौन, शहरवासीयांचा जीव मात्र धोक्यात गोंदिया : शहरातील बहुतांश रस्त्यांच्या मधोमध खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांत पावसाचे पाणी भरून ते दिसेनासे होत असल्याने हेच खड्डे आता अपघातांचे जनक बनत आहेत. या प्रकाराकडे मात्र पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. तर पदाधिकारीही आपली जबाबदारी झटकून मोकळे झाल्याचे बघावयास मिळत आहे. या प्रकारामुळे शहरवासीयांचा जीव मात्र धोक्यात असून त्यांत रोष खदखदत आहे. या खड्ड्यांची त्वरीत दुरूस्ती करण्याची गरज आहे, अन्यथा शहरवासीयांच्या जीवावर बेतणार यात शंका नाही. शहरातील रस्त्यांबाबत काही न बोललेलेच बरे अशी स्थिती आहे. बहुतांश रस्ते उखडल्याने गोंदिया शहराची गत एखाद्या खेड्यापेक्षाही बत्तर झाली आहे. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे शहरात वाहन चालविणे कठिण झाले आहे. त्याता आता मात्र रस्त्यांवरील उघड्या खड्ड्यांमुळे लोकांच्या जीविताला धोकाही दिसून येत आहे. त्याचे कारण असे की, रस्त्यांच्या खालून गेलेल्या नाल्यांची सफाई करण्यासाठी खड्डे (आऊटलेट) रस्त्यांच्या मधोमध किंवा कडेला सोडण्यात आले आहे. या खड्ड्यांची सफाई करून त्यावर झाकण टाकून हे खड्डे बंद ठेवण्याची गरज आहे. येथे मात्र चित्र उलटेच आहे. बहुतांश खड्ड्यांवर झाकणच नाही, तर काही खड्ड्यांचे झाकण त्यांच्या शेजारी ठेवले असल्याचे चित्र आहे. बाजार भागात असलेल्या गुजराती समाजवाडी समोरून भाजी बाजाराकडे जाणाऱ्या रस्त्याच्या मधोमध असा खड्डा (आऊटलेट) ठेवण्यात आला आहे. मात्र त्याला झाकण लावण्यात आलेले नाही. असाच खड्डा इसरका मार्केट समोर, शारदा वाचनालय समोर असून असेच खड्डे शहरातील कित्येक ठिकाणांवर दिसून येतात. या खड्ड्यांवर झाकण लावण्याची गरज आहे. मात्र तेवढी तसदी घेण्यासाठी पालिका प्रशासनाकडे वेळ नसून त्यांचे याकडे सपशेल दुर्लक्ष आहे. तर श्री टॉकीज शेजारील दिल्ली हॉटेल समोर रस्त्याच्या मधोमध नाली फुटून तेथे खड्डा पडला आहे. यासह अशाच कित्येक खड्ड्यांची दुरूस्ती करण्याची गरज आहे. मात्र त्यांची आहे तीच स्थिती दिसून येत आहे. सध्या पावसाळा सुरू आहे. त्यातही गोंदिया शहरातील पावसाळ्याची विशेषता अशी की, येथे पावसाचे पाणी रस्त्यावरून वाहून न जाता रस्त्यावरच साचून राहते. अशात मात्र हे रस्ते पाण्याखाली जात असून रस्त्याने जाणाऱ्या-येणाऱ्यांना रस्त्यावरील हे खड्डे दिसत नाही. अशात लहान-सहान अपघात तर या खड्ड्यांमुळे घडतच आहेत. मात्र एखादा मोठा अपघात घडून त्यात कुणाच्या जीवावर बेतण्याची वाट शहराचे नगर पालिका प्रशासन बघत आहे काय असा सवाल मात्र शहरवासीयांकडून केला जात आहे. (शहर प्रतिनिधी)