शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
2
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
3
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
4
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
5
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
6
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
7
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
8
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
9
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
10
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
11
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
12
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
13
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
14
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
15
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
16
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
17
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
18
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
19
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

कोठडीतील मृताची ३२ तासांनंतर झाली उत्तरीय तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:28 IST

आमगाव : चोरीच्या प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केलेल्या राजकुमार अभयकुमार धोती (दि.३०,रा. कुंभारटोली) याचा पोलीस कोठडीतच शनिवारी ...

आमगाव : चोरीच्या प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केलेल्या राजकुमार अभयकुमार धोती (दि.३०,रा. कुंभारटोली) याचा पोलीस कोठडीतच शनिवारी (दि.२२) पहाटे ५.१५ वाजता मृत्यू झाला. मात्र त्यानंतर धोती याच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी तब्बल ३२ तासांनंतर म्हणजेच रविवारी (दि.२३) दुपारी १ गोंदिया येथे केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयात करण्यात आली.

आमगाव येथील जिल्हा परिषद शाळेतून दोन वेळा संगणक संच व एलसीडीची चोरी करणाऱ्या चार आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुरुवारी (दि.२०) अटक केली होती. पथकाने त्यांची सखोल चौकशी केल्यानंतर शुक्रवारी (दि.२१) पहाटे १ वाजता मृत राजकुमार धोती (३०), सुरेश धनराज राऊत (३१) व राजकुमार गोपीचंद मरकाम (२२) या तिघांना पथकाने आमगाव पोलिसांच्या स्वाधीन केले होते. त्यांना आमगाव पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आल्याने या दिशेने तपास होणे आवश्यक असल्याची जोरदार चर्चा जिल्ह्यात सुरू आहे.

फक्त चोरीच्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींना दुसऱ्या दिवशीही आमगाव पोलिसांकडे सोपविता येऊ शकत होते. परंतु स्थानिक गुन्हे शाखेने रात्रीच त्या तिन्ही आरोपींना आमगाव पोलिसांच्या स्वाधीन का केले. स्थानिक गुन्हे शाखेने केलेल्या चौकशीत चोरीच्या गुन्ह्यात अटक असलेल्यांना मारहाण केली का? मारहाण केली तर या चोरीतील तिघांपैकी दोघेजण अजूनही पोलिसांच्या तावडीत आहेत त्यांचा जबाब नोंदविण्यासाठी त्यांच्यावर दबाव नसावा का असे प्रश्न उपस्थित होत आहेत. अशात २२ मे रोजी पहाटे ५.१५ वाजता मरण पावलेल्या राजकुमार धोती याच्या मृतदेहावर आमगाव येथे उत्तरीय तपासणी होऊ शकली नाही. नागरिकांचा आक्रोश पाहता मृतदेह गोंदियाला पाठविण्यात आले. परंतु गोंदियातही रविवारी (दि.२३) दुपारी १ वाजता उत्तरीय तपासणीला सुरुवात झाली. आमगाव येथील न्यायाधीश, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांच्या समोर कॅमेरा सुरू करून गोंदियातील तीन डॉक्टरांच्या चमूने उत्तरीय तपासणी केली आहे. ३२ तासांनंतर उत्तरीय तपासणी करून मृतदेह अंत्यसंस्कारासाठी पोलिसांच्या चोख बंदोबस्तात आमगावला रवाना करण्यात आले. अंत्यसंस्कार होईपर्यंत पोलिसांचा चोख बंदोबस्त आमगावात हाेता.

बॉक्स

आमगावचे नवे ठाणेदार विलास नाळे

आमगावच्या पोलीस कोठडीत मृत्यू झाल्याच्या प्रकरणात दोन पोलीस अधिकारी व दोन कर्मचारी अशा चौघांना दोषी ठरवून पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांनी तडकाफडकी निलंबित केले. आमगावचे ठाणेदार सुभाष चव्हाण यांचे निलंबन झाल्यामुळे त्यांच्या जागी नवीन ठाणेदार म्हणून विलास नाळे यांच्याकडे पदभार देण्यात आला आहे.