शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: आव्हाड-दानवे बोलत होते, रिपोर्टर रेकॉर्डिंग करत होता... आव्हाडांना राग आला... हात उचलला! बघा, काय घडलं!
2
१,२,३...२४ तासांत तीन मिसाईल टेस्ट! भारताची ऑपरेशन सिंदूरनंतर मोठी कामगिरी, लडाखमध्ये एक...
3
Rohit Pawar: "आवाज खाली करा, बोलता येत नसेल तर..."; रोहित पवारांनी पोलीस अधिकाऱ्याला झापलं!
4
तिसऱ्या लग्नाचा हव्यास, पत्नीनं बॉयफ्रेंडला बोलवून घेतलं अन् कांड झालं! लग्नमंडपाऐवजी गेली तुरुंगात; असं काय केलं?
5
'लॅन्ड फॉर जॉब' घोटाळ्यात लालू यादव यांना मोठा धक्का! पण 'या' प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा
6
सात तरुण, २३ मोबाईल, दुबईहून सुरू होता भयंकर खेळ, पाहून पोलिसही अवाक्
7
'...तेव्हा राज ठाकरे-उद्धव ठाकरेंना लोक आपटून आपटून मारतील'; भाजप खासदार निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
8
लेकीच्या जन्मानंतर दुसऱ्याच दिवशी गमावला दीड वर्षांचा मुलगा; कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर
9
प्रेग्नंट पत्नीसोबत असा रोमँटिक झाला राजकुमार राव; स्विमिंग पूलमध्येच केलं लिपलॉक; बघा PHOTO
10
"विधानभवनात आमदारांचे खून पडले तरी...", राज ठाकरे भडकले, महाराष्ट्रातील जनतेला संतप्त सवाल
11
विजेचा झटका दिला, गर्भपात करायला लावला; एका 'थार'साठी नवऱ्याने मनीषासोबत काय काय केलं? झाला मोठा खुलासा
12
पोस्ट ऑफिसच्या स्कीम्समध्ये महिलांना पुरुषांपेक्षा अधिक व्याज मिळतं का? चेक करा डिटेल्स
13
६ महिन्यात सोन्यात तब्बल २६% वाढ! आता अजून वाढणार? 'या' ५ मार्गांनी करू शकता गुंतवणूक
14
हृदयद्रावक! हिमाचल प्रदेशात निसर्ग कोपला, डोंगरावरून खाली आले दगड; आई-मुलाचा मृत्यू
15
आधी ९० तास काम करण्याचा दिलेला सल्ला; आता त्यांचाच पगार २५ कोटींनी वाढला, किती मिळणार पॅकेज
16
Cast Certificate: 'त्या' लोकांचे जातीचे प्रमाणपत्र रद्द होणार; विधान परिषदेत फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले...
17
पती निक जोनाससोबत प्रियांका चोप्राचं लिप-लॉक, समुद्रकिनाऱ्यावरच रोमँटिक झालं कपल; बघा लेटेस्ट VIDEO
18
नो फोटो प्लीज! सिद्धार्थ मल्होत्राची पापाराझींना विनंती; म्हणाला, "फक्त आशीर्वाद द्या..."
19
Mumbai: मालवणी परिसरातून अपहरण झालेल्या तीन मुलींची सुखरूप सुटका
20
'ही' आयटी कंपनी देणार २५०% लाभांश, तुमच्याकडे शेअर आहेत का? रेकॉर्ड डेट लगेच बघा!

शिवाजी महाराजांचा वारसा जपा

By admin | Updated: February 21, 2017 00:58 IST

बलशाली मोगलांविरु द्ध लढा देणे त्याकाळी सोपे नव्हते. परंतु, एकट्याच्या बळावर विजय प्राप्त करता येणार नाही, ...

अभिमन्यू काळे : गोंदियात छत्रपती शिवाजी महाराज जयंती कार्यक्रम थाटातगोंदिया : बलशाली मोगलांविरु द्ध लढा देणे त्याकाळी सोपे नव्हते. परंतु, एकट्याच्या बळावर विजय प्राप्त करता येणार नाही, ही बाब छत्रपती शिवाजी महाराज यांनी हेरून सर्व मावळ्यांना सोबतीला घेवून यश मिळविले. शिवाजी महाराज हे दुरगामी विचारवंत व रयतेचे राजा होते. त्यांनी कधीही कुणावरही अन्याय होवू दिला नाही. मात्र, दुर्देवाने शिवाजी महाराजांना दीर्घायुष्य लाभले नाही अन्यथा निश्चितच वैमानिकसारखी सेवासुद्धा त्या काळापासूनच पहावयास मिळाली असती. शिवाजी महाराज यांनी राज्य कसे चालवावे, याची शिकवणही त्या काळी दिली होती. त्याचप्रमाणे आज प्रगत शिक्षणाच्या माध्यमातून शिवाजी महाराजांचा वारसा जपून ठेवणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी केले. छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती व शिव छत्रपती मराठा समाजाच्या वतीने स्थानिक छत्रपती चौक येथे जयंती कार्यक्रम घेण्यात आले. त्यावेळी अध्यक्षस्थानावरु न ते बोलत होते. याप्रसंगी प्रामुख्याने नगराध्यक्ष अशोक इंगळे, खा. नाना पटोले, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ, सई काळे, माजी नगराध्यक्ष दामोदर अग्रवाल, पोलीस निरीक्षक दिनेशचंद्र शुक्ला, मुरलीधर माहुरे, न.प. सभापती भावना कदम, माया सणस यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. डॉ. अभिमन्यू काळे पुढे म्हणाले, जुन्या काळी इतिहास लिहिण्याची परंपरा होती. त्याच परंपरेत ब्रिटीश काळात शिवाजी महाराजांचा इतिहास लिहिण्यात आला. शिवाजी महाराज हे महाराष्ट्रातील राजे होते. त्यांच्या सुशासनाचा प्रसार संपूर्ण जगात झाला होता. बलशाली साम्राज्य असलेल्या मोगलांना एक राजा म्हणून त्यांनी लढा देवून नाकीनऊ आणले. औरंगजेबसारख्या राजाला शिवाजी महाराजांमुळे अनेक वर्षे वणवण भटकावे लागले. शेवटी औरंगजेब यांनी मराठ्यांशी लढा देणे म्हणजे आयुष्यातील सर्वात मोठी चूक, असे कबूलही केले. त्यामुळेच शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्याचे राजे ठरले. जर शिवाजी महाराजांनी एकट्याच्या बळावर लढाई करण्याचा विचार केला असता तर ते यशस्वी झाले नसते. साम्राज्य प्रस्थापित करायचे आहे, ते जनतेच्या सहकार्याशिवाय अशक्य आहे. हा विचार त्यांनी त्याकाळी पेरून किंबहुना अंमलात आणूण मोगलांपुढे त्यांनी आव्हान उभे केले होते. शिवाजी महाराज हे दुरगामी व रयतेचे राजे होते. ‘माझे राज्य मी चालविणार मात्र, त्यात कसलाही अडथळा येवू नये’ या विचारांचे ते होते. सुशासन कसे असते हे त्या काळात अनुभवात आले. त्यामुळे आजघडीला त्यांचा इतिहास वाचायला मिळत आहे. तेच सुशासन आजघडीला शासन-प्रशासनाच्या माध्यमातून चालविले जात आहे. म्हणून शिवाजी महाराजांच्या विचाराप्रमाणे प्रत्येक नागरिकाचे विचार असायला हवे. अशा विचारांसाठी प्रगत शिक्षण घेणे काळाची गरज झाली आहे, असे मतसुद्धा त्यांनी व्यक्त केले. सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर उपस्थित डॉ. दिलीप पाटील भुजबळ, अशोक इंगळे, खा. नाना पटोले व इतर मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहासाचा उलगडा करीत मार्गदर्शन केले. जयंती कार्यक्र म थाटात व शिस्तबद्ध पार पडला. सुरु वातीला विद्यार्थिनींनी ‘बेटी बचाव, बेटी पढाओ’ असा संदेश देत नृत्य सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधले. याप्रसंगी मोठ्या प्रमाणात मराठा समाजाचे महिला-पुरु ष तसेच सर्वसामान्य नागरिक उपस्थित होते. संचालन सीमा बडे व श्रुती केकत यांनी केले. या वेळी आयोजक समितीच्या वतीने जिल्हाधिकारी काळे, जिल्हा पोलीस अधीक्षक भुजबळ यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. (प्रतिनिधी)