शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान तणावावर आज संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची बैठक; बंद खोलीत चर्चेची मागणी
2
Donald Trump Tariffs: 'चीनवरील टॅरिफ कमी करण्यास तयार, कारण...'; डोनाल्ड ट्रम्प यांची अचानक नरमाईची भूमिका
3
VIDEO: दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या तरुणाने पोलिसांपासून वाचण्यासाठी नदीत उडी मारली; इम्तियाजचा मृतदेह सापडल्याने खळबळ
4
लोकप्रिय 'पंचायत' सीरिजला सचिवजी देणार होते नकार? जितेंद्र कुमार म्हणाला, "मला वाटलं..."
5
"बॉलिवूड चोर आहे!" नवाजुद्दीन सिद्दीकीचं मोठं विधान, म्हणाला- "लोक या गोष्टींना कंटाळतात..."
6
Samsung ला ४४००००००००० रुपयांचा टॅक्स भरण्याचे आदेश; कंपनीने लावला Reliance Jio वर आरोप, प्रकरण काय?
7
Mumbai Fire: मुंबईत कपड्याच्या शोरुममध्ये अग्नितांडव! पाच मजली इमारतीत अडकलेले लहान मुलांसह १९ लोक
8
पाकिस्तान सुधारत नाही! सलग ११ व्या दिवशी युद्धबंदीचे उल्लंघन; भारतीय सैनिकांनी धडा शिकवला
9
Stock Market Today: १६० अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला, TATA Motors चा शेअर सुस्साट; ऑटो-आयटी क्षेत्रात तेजी
10
Video: चिनी फॅक्टरीत रोबोट अचानक झाला हिंसक; कर्मचाऱ्यांवर केला जीवघेणा हल्ला, मग...
11
FD द्वारे रक्कम होऊ शकते तिप्पट, अनेकांना माहितही नाही; ₹५ लाख जमा करा, ₹१५ लाखांपेक्षा जास्त मिळतील
12
मिचमिच डोळे, रडारचे कान...! एमजी अ‍ॅस्टरमधून पुण्यात आणि गावखेड्यात भटकंती, कशी वाटली एसयुव्ही...
13
"२ वर्ष अख्खं जग थांबलं होतं तेव्हा माझं घर यांच्यामुळे चाललं", प्रसाद ओकने कोणाला दिलं श्रेय?
14
'पाकिस्तान भारताविरुद्ध ४ दिवसही टीकू शकत नाही, कराची अन् लाहोरमध्ये गुरुकुल उघडणार'; बाबा रामदेव यांनी सुनावले
15
Maharashtra HSC Result 2025: बारावीचा आज निकाल; या संकेतस्थळांवर पाहता येणार..., कुठे आणि कसा पहावा...
16
अनैतिक संबंधातून वाद, जळगावात भररस्त्यात घडला थरार; पाठलाग करत युवकाला कायमचं संपवलं
17
...म्हणून बाबिलने अर्जुन कपूर, अनन्या पांडेचं नाव घेतलं; अभिनेत्याच्या 'त्या' व्हिडिओनंतर टीमकडून स्पष्टीकरण
18
दूत पाठवले म्हणून अजितदादांची शिंदेंवर नाराजी, पुढे काय?
19
India Pakistan: युद्धाचे ढग गडद होताच मध्यस्थीसाठी मुस्लिम देश आला पुढे, 'हा' नेता येणार भारत दौऱ्यावर
20
कानपूरमध्ये ६ मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू

शिवाजी महाराजांचा वारसा जपा

By admin | Updated: February 21, 2017 00:58 IST

बलशाली मोगलांविरु द्ध लढा देणे त्याकाळी सोपे नव्हते. परंतु, एकट्याच्या बळावर विजय प्राप्त करता येणार नाही, ...

अभिमन्यू काळे : गोंदियात छत्रपती शिवाजी महाराज जयंती कार्यक्रम थाटातगोंदिया : बलशाली मोगलांविरु द्ध लढा देणे त्याकाळी सोपे नव्हते. परंतु, एकट्याच्या बळावर विजय प्राप्त करता येणार नाही, ही बाब छत्रपती शिवाजी महाराज यांनी हेरून सर्व मावळ्यांना सोबतीला घेवून यश मिळविले. शिवाजी महाराज हे दुरगामी विचारवंत व रयतेचे राजा होते. त्यांनी कधीही कुणावरही अन्याय होवू दिला नाही. मात्र, दुर्देवाने शिवाजी महाराजांना दीर्घायुष्य लाभले नाही अन्यथा निश्चितच वैमानिकसारखी सेवासुद्धा त्या काळापासूनच पहावयास मिळाली असती. शिवाजी महाराज यांनी राज्य कसे चालवावे, याची शिकवणही त्या काळी दिली होती. त्याचप्रमाणे आज प्रगत शिक्षणाच्या माध्यमातून शिवाजी महाराजांचा वारसा जपून ठेवणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी केले. छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती व शिव छत्रपती मराठा समाजाच्या वतीने स्थानिक छत्रपती चौक येथे जयंती कार्यक्रम घेण्यात आले. त्यावेळी अध्यक्षस्थानावरु न ते बोलत होते. याप्रसंगी प्रामुख्याने नगराध्यक्ष अशोक इंगळे, खा. नाना पटोले, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ, सई काळे, माजी नगराध्यक्ष दामोदर अग्रवाल, पोलीस निरीक्षक दिनेशचंद्र शुक्ला, मुरलीधर माहुरे, न.प. सभापती भावना कदम, माया सणस यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. डॉ. अभिमन्यू काळे पुढे म्हणाले, जुन्या काळी इतिहास लिहिण्याची परंपरा होती. त्याच परंपरेत ब्रिटीश काळात शिवाजी महाराजांचा इतिहास लिहिण्यात आला. शिवाजी महाराज हे महाराष्ट्रातील राजे होते. त्यांच्या सुशासनाचा प्रसार संपूर्ण जगात झाला होता. बलशाली साम्राज्य असलेल्या मोगलांना एक राजा म्हणून त्यांनी लढा देवून नाकीनऊ आणले. औरंगजेबसारख्या राजाला शिवाजी महाराजांमुळे अनेक वर्षे वणवण भटकावे लागले. शेवटी औरंगजेब यांनी मराठ्यांशी लढा देणे म्हणजे आयुष्यातील सर्वात मोठी चूक, असे कबूलही केले. त्यामुळेच शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्याचे राजे ठरले. जर शिवाजी महाराजांनी एकट्याच्या बळावर लढाई करण्याचा विचार केला असता तर ते यशस्वी झाले नसते. साम्राज्य प्रस्थापित करायचे आहे, ते जनतेच्या सहकार्याशिवाय अशक्य आहे. हा विचार त्यांनी त्याकाळी पेरून किंबहुना अंमलात आणूण मोगलांपुढे त्यांनी आव्हान उभे केले होते. शिवाजी महाराज हे दुरगामी व रयतेचे राजे होते. ‘माझे राज्य मी चालविणार मात्र, त्यात कसलाही अडथळा येवू नये’ या विचारांचे ते होते. सुशासन कसे असते हे त्या काळात अनुभवात आले. त्यामुळे आजघडीला त्यांचा इतिहास वाचायला मिळत आहे. तेच सुशासन आजघडीला शासन-प्रशासनाच्या माध्यमातून चालविले जात आहे. म्हणून शिवाजी महाराजांच्या विचाराप्रमाणे प्रत्येक नागरिकाचे विचार असायला हवे. अशा विचारांसाठी प्रगत शिक्षण घेणे काळाची गरज झाली आहे, असे मतसुद्धा त्यांनी व्यक्त केले. सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर उपस्थित डॉ. दिलीप पाटील भुजबळ, अशोक इंगळे, खा. नाना पटोले व इतर मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहासाचा उलगडा करीत मार्गदर्शन केले. जयंती कार्यक्र म थाटात व शिस्तबद्ध पार पडला. सुरु वातीला विद्यार्थिनींनी ‘बेटी बचाव, बेटी पढाओ’ असा संदेश देत नृत्य सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधले. याप्रसंगी मोठ्या प्रमाणात मराठा समाजाचे महिला-पुरु ष तसेच सर्वसामान्य नागरिक उपस्थित होते. संचालन सीमा बडे व श्रुती केकत यांनी केले. या वेळी आयोजक समितीच्या वतीने जिल्हाधिकारी काळे, जिल्हा पोलीस अधीक्षक भुजबळ यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. (प्रतिनिधी)