शहरं
Join us  
Trending Stories
1
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
2
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; समोर आला थरकाप उडवणारा VIDEO
3
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
4
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
5
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार
6
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
7
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा
8
VIRAL : चोरांनी कार चालकावर झाडली गोळी, पण पुढे जे झालं त्यानं स्वतःच घाबरले! Video बघून सगळेच झाले हैराण
9
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
10
जगातला 'असा' एकमेव देश, जिथे घरात पाळल्या जातात मगरी; विकून होते कोटी रुपयांची कमाई!
11
Who Is Yash Rathod : विदर्भाची रन मशीन! पोट्याचं द्विशतक अवघ्या ६ धावांनी हुकलं
12
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
13
यामाहाची FZ किती रुपयांनी स्वस्त झाली? जुना काळ आठवला..., फसिनो, आर१५ वर किती जीएसटी कमी झाला...
14
धैर्याला सॅल्यूट! देशातील पहिली ट्रान्सजेंडर फोटो जर्नलिस्ट; आता मागते भीक पण स्वप्न आहेत मोठी
15
Reels बनवण्यासाठी अस्वलाला पाजलं कोल्ड ड्रिंक, VIDEO व्हायरल झाल्यावर जे घडलं ते पाहून...
16
१० टक्के पगारवाढ, लॉयल्टी बोनस अन् समायोजन...! एनएचएम कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप अखेर मागे
17
Sade Sati Upay: एकच रास, तरी साडेसातीचा काळ प्रत्येकाचा वेगळा; ३ महिन्यापूर्वी लागते चाहूल!
18
GST कपातीनंतर 4 लाखांपेक्षाही स्वस्तात मिळतेय ही मारुती SUV; देते 34 km पर्यंत मायलेज; बघा, व्हेरिअँट निहाय सूट...
19
अर्शद वारसी नव्हे, तर 'जॉली एलएलबी'साठी या मराठमोळ्या अभिनेत्याला होती पहिली पसंती, आता होतोय त्याला पश्चाताप
20
"आदित्य ठाकरे बुरख्यात लपून भारत-पाकिस्तान मॅच पाहतील"; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका

शिवाजी महाराजांचा वारसा जपा

By admin | Updated: February 21, 2017 00:58 IST

बलशाली मोगलांविरु द्ध लढा देणे त्याकाळी सोपे नव्हते. परंतु, एकट्याच्या बळावर विजय प्राप्त करता येणार नाही, ...

अभिमन्यू काळे : गोंदियात छत्रपती शिवाजी महाराज जयंती कार्यक्रम थाटातगोंदिया : बलशाली मोगलांविरु द्ध लढा देणे त्याकाळी सोपे नव्हते. परंतु, एकट्याच्या बळावर विजय प्राप्त करता येणार नाही, ही बाब छत्रपती शिवाजी महाराज यांनी हेरून सर्व मावळ्यांना सोबतीला घेवून यश मिळविले. शिवाजी महाराज हे दुरगामी विचारवंत व रयतेचे राजा होते. त्यांनी कधीही कुणावरही अन्याय होवू दिला नाही. मात्र, दुर्देवाने शिवाजी महाराजांना दीर्घायुष्य लाभले नाही अन्यथा निश्चितच वैमानिकसारखी सेवासुद्धा त्या काळापासूनच पहावयास मिळाली असती. शिवाजी महाराज यांनी राज्य कसे चालवावे, याची शिकवणही त्या काळी दिली होती. त्याचप्रमाणे आज प्रगत शिक्षणाच्या माध्यमातून शिवाजी महाराजांचा वारसा जपून ठेवणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी केले. छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती व शिव छत्रपती मराठा समाजाच्या वतीने स्थानिक छत्रपती चौक येथे जयंती कार्यक्रम घेण्यात आले. त्यावेळी अध्यक्षस्थानावरु न ते बोलत होते. याप्रसंगी प्रामुख्याने नगराध्यक्ष अशोक इंगळे, खा. नाना पटोले, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ, सई काळे, माजी नगराध्यक्ष दामोदर अग्रवाल, पोलीस निरीक्षक दिनेशचंद्र शुक्ला, मुरलीधर माहुरे, न.प. सभापती भावना कदम, माया सणस यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. डॉ. अभिमन्यू काळे पुढे म्हणाले, जुन्या काळी इतिहास लिहिण्याची परंपरा होती. त्याच परंपरेत ब्रिटीश काळात शिवाजी महाराजांचा इतिहास लिहिण्यात आला. शिवाजी महाराज हे महाराष्ट्रातील राजे होते. त्यांच्या सुशासनाचा प्रसार संपूर्ण जगात झाला होता. बलशाली साम्राज्य असलेल्या मोगलांना एक राजा म्हणून त्यांनी लढा देवून नाकीनऊ आणले. औरंगजेबसारख्या राजाला शिवाजी महाराजांमुळे अनेक वर्षे वणवण भटकावे लागले. शेवटी औरंगजेब यांनी मराठ्यांशी लढा देणे म्हणजे आयुष्यातील सर्वात मोठी चूक, असे कबूलही केले. त्यामुळेच शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्याचे राजे ठरले. जर शिवाजी महाराजांनी एकट्याच्या बळावर लढाई करण्याचा विचार केला असता तर ते यशस्वी झाले नसते. साम्राज्य प्रस्थापित करायचे आहे, ते जनतेच्या सहकार्याशिवाय अशक्य आहे. हा विचार त्यांनी त्याकाळी पेरून किंबहुना अंमलात आणूण मोगलांपुढे त्यांनी आव्हान उभे केले होते. शिवाजी महाराज हे दुरगामी व रयतेचे राजे होते. ‘माझे राज्य मी चालविणार मात्र, त्यात कसलाही अडथळा येवू नये’ या विचारांचे ते होते. सुशासन कसे असते हे त्या काळात अनुभवात आले. त्यामुळे आजघडीला त्यांचा इतिहास वाचायला मिळत आहे. तेच सुशासन आजघडीला शासन-प्रशासनाच्या माध्यमातून चालविले जात आहे. म्हणून शिवाजी महाराजांच्या विचाराप्रमाणे प्रत्येक नागरिकाचे विचार असायला हवे. अशा विचारांसाठी प्रगत शिक्षण घेणे काळाची गरज झाली आहे, असे मतसुद्धा त्यांनी व्यक्त केले. सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर उपस्थित डॉ. दिलीप पाटील भुजबळ, अशोक इंगळे, खा. नाना पटोले व इतर मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहासाचा उलगडा करीत मार्गदर्शन केले. जयंती कार्यक्र म थाटात व शिस्तबद्ध पार पडला. सुरु वातीला विद्यार्थिनींनी ‘बेटी बचाव, बेटी पढाओ’ असा संदेश देत नृत्य सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधले. याप्रसंगी मोठ्या प्रमाणात मराठा समाजाचे महिला-पुरु ष तसेच सर्वसामान्य नागरिक उपस्थित होते. संचालन सीमा बडे व श्रुती केकत यांनी केले. या वेळी आयोजक समितीच्या वतीने जिल्हाधिकारी काळे, जिल्हा पोलीस अधीक्षक भुजबळ यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. (प्रतिनिधी)