शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

संचारबंदीच्या काळात घटला रुग्णांचा पॉझिटिव्ही रेट ! १२ हजार बाधितांनी केली मात, संसर्ग येताेय आटोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 05:00 IST

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत जिल्ह्यातील शहरी भागासह ग्रामीण भागातील रुग्ण संख्येत वाढ झाली कारण संसर्गाची लक्षणे दिसल्यानंतर अनेकजण चाचणी करण्याकडे दुर्लक्ष करत होते तर कोरोनाच्या पहिल्या लाटेत अनेक गावांनी गावबंदीसह अनेक प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविल्या. त्यामुळे कोरोनाचा शिरकाव रोखण्यास मदत झाली तसेच गावात सॅनिटायझरची फवारणी व जनजागृतीवर भर देण्यात आला होता.

ठळक मुद्दे११६०३ बाधितांची नोंद : २९४ रुग्णांचा मृत्यू : ॲक्टिव्ह रुग्णांची संख्येत घट

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता त्याला प्रतिबंध लावण्यासाठी राज्य सरकारने १५ एप्रिलपासून कडक ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत कडक निर्बंध लागू केले. याअंतर्गत सर्वत्र संचारबंदी व लॉकडाऊन करण्यात आले. कडक निर्बंध आणि विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांवर कडक कारवाई केली जात असल्याने गर्दी कमी करण्यास मदत झाली. त्यामुळे कोरोनाची साखळीसुद्धा खंडित करण्यास मदत झाली. राज्यातील १२ जिल्ह्यात लॉकडाऊनच्या कालावधीत रुग्णसंख्येत प्रचंड घट झाली असून त्यात गोंदिया जिल्ह्याचासुद्धा समावेश आहे. १५ ते ३० एप्रिलच्या दरम्यान जिल्ह्यात ११६०३ बाधितांची नोंद झाली तर त्यापेक्षा अधिक म्हणजे १२०४६ बाधितांनी कोरोनावर मात केली आहे तर २९४ बाधितांचा मृत्यू झाला आहे. बाधितांपेक्षा मात करणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक असल्याने जिल्ह्याचा पॉझिटिव्हीटी रेटसुद्धा वाढल्याचे चित्र आहे. एकंदरीत संचारबंदीच्या काळात जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या घटल्याचे दिलासादायक चित्र आहे. जिल्ह्यातील कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी ‘ब्रेक द चेन’अंतर्गत करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा सर्वाधिक फायदा झाला. तसेच जिल्हावासीयांनी कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे काटेकोरपणे पालन केल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यास मोठी मदत झाली. त्यामुळेच जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या घटत असल्याचे दिलासादायक चित्र आहे.  

या तीन कारणांमुळे घटली रुग्णसंख्या कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात आलेल्या संचारबंदीमुळे कोरोना साखळी करण्यास मदत झाली. गर्दी कमी करण्यात यश आल्याने संसर्गाचे प्रमाण घटले. कोरोनाला प्रतिबंध लावण्यासाठी जनजागृती आणि कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणावर भर देण्यात आला. याची सुध्दा मदत झाली. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने लक्षणे दिसताच चाचणी करणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे वेळीच कॉन्टॅक्ट ट्रेसिंग केल्याने रुग्णवाढीला ब्रेक लावण्यास मदत झाली आहे. 

ग्रामीण भागात रुग्ण वाढले ?कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत जिल्ह्यातील शहरी भागासह ग्रामीण भागातील रुग्ण संख्येत वाढ झाली कारण संसर्गाची लक्षणे दिसल्यानंतर अनेकजण चाचणी करण्याकडे दुर्लक्ष करत होते तर कोरोनाच्या पहिल्या लाटेत अनेक गावांनी गावबंदीसह अनेक प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविल्या. त्यामुळे कोरोनाचा शिरकाव रोखण्यास मदत झाली तसेच गावात सॅनिटायझरची फवारणी व जनजागृतीवर भर देण्यात आला होता. मात्र, दुसऱ्या लाटेत याकडे दुर्लक्ष केल्याने ग्रामीण भागात रुग्ण वाढले आहेत. 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या