शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
2
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
3
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
4
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
5
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
6
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
7
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
8
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
9
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
10
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
11
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...
12
"आई...मी त्याला मारून टाकलं, खोलीत बॉडी पडलीय"; मोठ्या बहिणीनं छोट्या भावाला का मारले?
13
ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेची रोमँटिक केमिस्ट्री, 'आरपार' सिनेमाचं पहिलं गाणं रिलीज
14
Donald Trump Tariffs : 'जर ट्रम्प-पुतिन यांची चर्चा अयशस्वी झाली तर आम्ही भारतावर अधिक शुल्क लादू...', अमेरिकेची नवी धमकी
15
राज कुंद्राने आशीर्वाद घेताच केली किडनी ऑफर, ऐकून काय म्हणाले प्रेमानंद महाराज? जाणून आश्चर्य वाटेल
16
"अजित पवार यांनी लाडकी बहीण योजना आणल्यानेच महायुतीला २३८ जागा मिळाल्या’’, सुनिल तटकरेंचा दावा   
17
मुंबईत शिवसेना-मनसेची ताकद जास्त, राज ठाकरेंचा दावा; CM फडणवीस म्हणाले...
18
War 2 Review: ॲक्शनच्या नादात कथेवर फेरलं पाणी, कसा आहे हृतिक रोशन-ज्यु. एनटीआरचा 'वॉर २'?
19
थरकाप उडवणारा व्हिडीओ! मृत्यूने घातली झडप, बापाने लेकीसमोर जागेवरच सोडला जीव; दिल्लीतील घटना
20
अर्जुन तेंडुलकर संदर्भात हवाई सुंदरीला झालेला गैरसमज! क्रिकेटच्या देवानं आधी गंमत केली; मग...

संचारबंदीच्या काळात घटला रुग्णांचा पॉझिटिव्ही रेट ! १२ हजार बाधितांनी केली मात, संसर्ग येताेय आटोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 05:00 IST

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत जिल्ह्यातील शहरी भागासह ग्रामीण भागातील रुग्ण संख्येत वाढ झाली कारण संसर्गाची लक्षणे दिसल्यानंतर अनेकजण चाचणी करण्याकडे दुर्लक्ष करत होते तर कोरोनाच्या पहिल्या लाटेत अनेक गावांनी गावबंदीसह अनेक प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविल्या. त्यामुळे कोरोनाचा शिरकाव रोखण्यास मदत झाली तसेच गावात सॅनिटायझरची फवारणी व जनजागृतीवर भर देण्यात आला होता.

ठळक मुद्दे११६०३ बाधितांची नोंद : २९४ रुग्णांचा मृत्यू : ॲक्टिव्ह रुग्णांची संख्येत घट

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता त्याला प्रतिबंध लावण्यासाठी राज्य सरकारने १५ एप्रिलपासून कडक ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत कडक निर्बंध लागू केले. याअंतर्गत सर्वत्र संचारबंदी व लॉकडाऊन करण्यात आले. कडक निर्बंध आणि विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांवर कडक कारवाई केली जात असल्याने गर्दी कमी करण्यास मदत झाली. त्यामुळे कोरोनाची साखळीसुद्धा खंडित करण्यास मदत झाली. राज्यातील १२ जिल्ह्यात लॉकडाऊनच्या कालावधीत रुग्णसंख्येत प्रचंड घट झाली असून त्यात गोंदिया जिल्ह्याचासुद्धा समावेश आहे. १५ ते ३० एप्रिलच्या दरम्यान जिल्ह्यात ११६०३ बाधितांची नोंद झाली तर त्यापेक्षा अधिक म्हणजे १२०४६ बाधितांनी कोरोनावर मात केली आहे तर २९४ बाधितांचा मृत्यू झाला आहे. बाधितांपेक्षा मात करणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक असल्याने जिल्ह्याचा पॉझिटिव्हीटी रेटसुद्धा वाढल्याचे चित्र आहे. एकंदरीत संचारबंदीच्या काळात जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या घटल्याचे दिलासादायक चित्र आहे. जिल्ह्यातील कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी ‘ब्रेक द चेन’अंतर्गत करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा सर्वाधिक फायदा झाला. तसेच जिल्हावासीयांनी कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे काटेकोरपणे पालन केल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यास मोठी मदत झाली. त्यामुळेच जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या घटत असल्याचे दिलासादायक चित्र आहे.  

या तीन कारणांमुळे घटली रुग्णसंख्या कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात आलेल्या संचारबंदीमुळे कोरोना साखळी करण्यास मदत झाली. गर्दी कमी करण्यात यश आल्याने संसर्गाचे प्रमाण घटले. कोरोनाला प्रतिबंध लावण्यासाठी जनजागृती आणि कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणावर भर देण्यात आला. याची सुध्दा मदत झाली. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने लक्षणे दिसताच चाचणी करणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे वेळीच कॉन्टॅक्ट ट्रेसिंग केल्याने रुग्णवाढीला ब्रेक लावण्यास मदत झाली आहे. 

ग्रामीण भागात रुग्ण वाढले ?कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत जिल्ह्यातील शहरी भागासह ग्रामीण भागातील रुग्ण संख्येत वाढ झाली कारण संसर्गाची लक्षणे दिसल्यानंतर अनेकजण चाचणी करण्याकडे दुर्लक्ष करत होते तर कोरोनाच्या पहिल्या लाटेत अनेक गावांनी गावबंदीसह अनेक प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविल्या. त्यामुळे कोरोनाचा शिरकाव रोखण्यास मदत झाली तसेच गावात सॅनिटायझरची फवारणी व जनजागृतीवर भर देण्यात आला होता. मात्र, दुसऱ्या लाटेत याकडे दुर्लक्ष केल्याने ग्रामीण भागात रुग्ण वाढले आहेत. 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या