शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे ब्रँडला शह देण्यासाठी रणनीती, मुंबईत एकत्र लढेल महायुती! 'प्लॅन बी'चीही तयारी...
2
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...
3
आणखी एका चीनसाठी जागा नाही, भारतानं 'पुढचा ड्रॅगन' बनण्याचं स्वप्न सोडावं; रघुराम राजन यांचा इशारा
4
राज्यात तिसरी ते दहावीचा सुधारित अभ्यासक्रम जाहीर; हिंदी सक्तीला लागला ब्रेक? 'हे' विषय शिकवणार
5
गरोदरपणात सुचली कल्पना! फक्त ६० हजारांच्या गुंतवणुकीतून 'या' जोडप्याने कमावले ५ कोटी!
6
Uorfi Javed : बारीक दिसण्यासाठी जेवणं सोडलं, उपाशी राहिली अन्...; उर्फी जावेदने 'या' आजाराचा केला सामना
7
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा तामिळनाडू दौरा; महान चोल साम्राज्याचा उल्लेख करत म्हणाले...
8
Rohini Khadse-Khewalkar : "प्रत्येक गोष्टीला वेळ..."; रेव्ह पार्टीमध्ये पतीला अटक झाल्यावर रोहिणी खडसेंची पहिली प्रतिक्रिया
9
Nag Panchami 2025: नागपंचमीला तळणे, चिरणे, कापणे निषिद्ध; वाचा शास्त्रीय आणि धार्मिक कारण!
10
मुलांच्या शिक्षणाचं टेन्शन? पोस्ट ऑफिसची 'ही' योजना देणार हमखास परतावा आणि टॅक्समध्ये सूट!
11
"...तर मी त्यांना १०० रुपये देतो", सचिन पिळगावकर आजही आवर्जुन करतात 'ही' गोष्ट, म्हणाले- "ते पैसे लोक फ्रेम करून..."
12
१३ हजारांत १०८ MP कॅमेरा, ६५००mAh बॅटरी आणि सुपरफास्ट चार्जिंग; नोकियाच्या नव्या फोनची चर्चा!
13
सगळेच बीएसएनएलमध्ये पोर्ट करतील! ९०० रुपयांच्या आत आणले सहा महिन्यांचे रिचार्ज, Jio-Airtel तर...
14
श्रीमंत बनण्याचा फॅार्म्युला, फक्त बदला या ५ सवयी; महिन्याला वाचवा १० हजार, लोकंही विचारतील कशी झाली 'ही' जादू
15
Barabanki Awshaneshwar Temple Stampede : माकडांनी उड्या मारल्या, तार तुटली अन्...; अवसानेश्वर महादेव मंदिरात कशी झाली चेंगराचेंगरी?
16
"सेटवर ते मस्ती करायचे पण मी...", अशोक सराफ यांनी सांगितला 'करण अर्जुन'चा किस्सा
17
शिंदेसेनेच्या मंत्र्यांना बदनाम करण्याचा कट रचला जातोय का?; रामदास कदमांनी व्यक्त केली शंका
18
आमिर खानच्या घरी पोहचले २५ आयपीएस अधिकारी, चाहते पडले चिंतेत, म्हणाले - "रेड पडली आहे का?"
19
Share Market Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; Sensex २६० अंकांनी घसरला, 'हे' स्टॉक्स आपटले

सकारात्मक पत्रकारितेतून सामान्यांना न्याय मिळतो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2019 22:31 IST

पत्रकार शासन व जनतेचा दुवा आहे. सत्यता बाळगुण गरीब व गरजुंना न्याय मिळवून देणे तसेच शासकीय योजना घराघरात पोहोचविण्याचे कार्य पत्रकारांमुळे शक्य झाले आहे. प्रिंट मिडियाचे महत्व आजअमर आहे. त्यात सकारात्मक पत्रकारीतेतून सामान्यांना न्याय मिळतो असे प्रतिपादन उपविभागीय अधिकारी रविंद्र राठोड यांनी केले.

ठळक मुद्देरवींद्र राठोड : पत्रकार दिनानिमित्त कार्यशाळेचे आयोजन

लोकमत न्यूज नेटवर्कआमगाव : पत्रकार शासन व जनतेचा दुवा आहे. सत्यता बाळगुण गरीब व गरजुंना न्याय मिळवून देणे तसेच शासकीय योजना घराघरात पोहोचविण्याचे कार्य पत्रकारांमुळे शक्य झाले आहे. प्रिंट मिडियाचे महत्व आजअमर आहे. त्यात सकारात्मक पत्रकारीतेतून सामान्यांना न्याय मिळतो असे प्रतिपादन उपविभागीय अधिकारी रविंद्र राठोड यांनी केले.तालुका पत्रकार संघाच्यावतीने लक्ष्मणराव मानकर इन्स्टीट्यूट आॅफ फार्मसी येथे रविवारी (दि.६) पत्रकार दिवसानिमित्त आयोजीत कार्यशाळेत प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी वरिष्ठ पत्रकार जगदीश शर्मा होते. उद्घाटन संपादक एच.एच. पारधी यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून नायब तहसीलदार शिशुपाल पवार, प्राचार्य डॉ. डी.के. संघी, तालुका कृषी अधिकारी लाखन बंसोड, समाज सेविका कविता रहांगडाले, पत्रकार संघाचे अध्यक्ष इसुलाल भालेकर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात दिप प्रज्वलन करुन बालशास्त्री जांभेकर, लक्ष्मणराव मानकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करुन करण्यात आली.याप्रसंगी डॉ. संघी यांनी, पत्रकारांनी एक छत्री व्यासपीठावर येवून अनेक गरजुंच्या समस्यांचे निवारण करावे. लेखणीतून सरकार बदलते म्हणून समाजात सकारात्मक ऊर्जा निर्माण करावी असे मत व्यक्त केले.पारधी यांनी, पत्रकार समाजाचा आरसा आहे. आज आणि काल यातील पत्रकारीतेत आवाहने समोर येत आहेत. अशा परिस्थितीत सत्याचे खंजर उचलून शोशितांना न्याय मिळवून देण्याचे प्रयत्न करावे असे मत व्यक्त केले. पवार यांनी, ग्रामीण पत्रकार परीसरातील समस्या मंत्रालयात पोहोचविण्याचे कार्य करतो.वेळोवेळी शासन योजनांचा लाभ गोरगरीबांना मिळाला की नाही याचा पाठपुरावा करतो. म्हणूनच पत्रकार व प्रशासनाचे बंधुभावाचे संबंध आहेत, असे मत व्यक्त केले. तर शर्मा यांनी, सामान्य माणसांच्या प्रश्नांचा आवाज उठवणारे व्यासपिठ असायला हवे. विश्वासार्हता आपल्या हातात आहे ती गमावू नये, असे मत व्यक्त केले.प्रास्ताविक भालेकर यांनी मांडले. संचालन प्रा. झेड.एस. बोरकर यांनी केले. आभार राजीव फुंडे यांनी मानले. कार्यक्रमासाठी सुनील क्षिरसागर, सुनील पडोळे, यशवंत मानकर, आनंद शर्मा, विकास शर्मा, पालकराम वालदे, रितेश अग्रवाल, नरेंद्र कावळे, मेहश मेश्राम, दिनेश शेंडे, अजय खेतान, रेखलाल टेंभरे, राधाकिसन चुटे, प्रा. डी.एस. टेंभुर्णे, मुरलीधर करंडे आणि ज्येष्ठ नागरिक संघाचे संतोष कटकवार, तुलाराम कावळे, रिनाईत, संतोष (लल्लू) गुप्ता, रंजित मेश्राम, गोलू अग्रवाल आदींनी सहकार्य केले.

टॅग्स :Journalistपत्रकार