शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

सकारात्मक पत्रकारितेतून सामान्यांना न्याय मिळतो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2019 22:31 IST

पत्रकार शासन व जनतेचा दुवा आहे. सत्यता बाळगुण गरीब व गरजुंना न्याय मिळवून देणे तसेच शासकीय योजना घराघरात पोहोचविण्याचे कार्य पत्रकारांमुळे शक्य झाले आहे. प्रिंट मिडियाचे महत्व आजअमर आहे. त्यात सकारात्मक पत्रकारीतेतून सामान्यांना न्याय मिळतो असे प्रतिपादन उपविभागीय अधिकारी रविंद्र राठोड यांनी केले.

ठळक मुद्देरवींद्र राठोड : पत्रकार दिनानिमित्त कार्यशाळेचे आयोजन

लोकमत न्यूज नेटवर्कआमगाव : पत्रकार शासन व जनतेचा दुवा आहे. सत्यता बाळगुण गरीब व गरजुंना न्याय मिळवून देणे तसेच शासकीय योजना घराघरात पोहोचविण्याचे कार्य पत्रकारांमुळे शक्य झाले आहे. प्रिंट मिडियाचे महत्व आजअमर आहे. त्यात सकारात्मक पत्रकारीतेतून सामान्यांना न्याय मिळतो असे प्रतिपादन उपविभागीय अधिकारी रविंद्र राठोड यांनी केले.तालुका पत्रकार संघाच्यावतीने लक्ष्मणराव मानकर इन्स्टीट्यूट आॅफ फार्मसी येथे रविवारी (दि.६) पत्रकार दिवसानिमित्त आयोजीत कार्यशाळेत प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी वरिष्ठ पत्रकार जगदीश शर्मा होते. उद्घाटन संपादक एच.एच. पारधी यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून नायब तहसीलदार शिशुपाल पवार, प्राचार्य डॉ. डी.के. संघी, तालुका कृषी अधिकारी लाखन बंसोड, समाज सेविका कविता रहांगडाले, पत्रकार संघाचे अध्यक्ष इसुलाल भालेकर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात दिप प्रज्वलन करुन बालशास्त्री जांभेकर, लक्ष्मणराव मानकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करुन करण्यात आली.याप्रसंगी डॉ. संघी यांनी, पत्रकारांनी एक छत्री व्यासपीठावर येवून अनेक गरजुंच्या समस्यांचे निवारण करावे. लेखणीतून सरकार बदलते म्हणून समाजात सकारात्मक ऊर्जा निर्माण करावी असे मत व्यक्त केले.पारधी यांनी, पत्रकार समाजाचा आरसा आहे. आज आणि काल यातील पत्रकारीतेत आवाहने समोर येत आहेत. अशा परिस्थितीत सत्याचे खंजर उचलून शोशितांना न्याय मिळवून देण्याचे प्रयत्न करावे असे मत व्यक्त केले. पवार यांनी, ग्रामीण पत्रकार परीसरातील समस्या मंत्रालयात पोहोचविण्याचे कार्य करतो.वेळोवेळी शासन योजनांचा लाभ गोरगरीबांना मिळाला की नाही याचा पाठपुरावा करतो. म्हणूनच पत्रकार व प्रशासनाचे बंधुभावाचे संबंध आहेत, असे मत व्यक्त केले. तर शर्मा यांनी, सामान्य माणसांच्या प्रश्नांचा आवाज उठवणारे व्यासपिठ असायला हवे. विश्वासार्हता आपल्या हातात आहे ती गमावू नये, असे मत व्यक्त केले.प्रास्ताविक भालेकर यांनी मांडले. संचालन प्रा. झेड.एस. बोरकर यांनी केले. आभार राजीव फुंडे यांनी मानले. कार्यक्रमासाठी सुनील क्षिरसागर, सुनील पडोळे, यशवंत मानकर, आनंद शर्मा, विकास शर्मा, पालकराम वालदे, रितेश अग्रवाल, नरेंद्र कावळे, मेहश मेश्राम, दिनेश शेंडे, अजय खेतान, रेखलाल टेंभरे, राधाकिसन चुटे, प्रा. डी.एस. टेंभुर्णे, मुरलीधर करंडे आणि ज्येष्ठ नागरिक संघाचे संतोष कटकवार, तुलाराम कावळे, रिनाईत, संतोष (लल्लू) गुप्ता, रंजित मेश्राम, गोलू अग्रवाल आदींनी सहकार्य केले.

टॅग्स :Journalistपत्रकार