शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
2
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
3
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
4
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
5
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
6
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
7
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
8
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
9
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
10
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
11
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
12
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
13
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
14
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
15
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
16
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
18
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
19
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
20
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!

आलेझरी-बालापूर ते सुकडी-डाकराम रस्त्याची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 05:00 IST

आदिवासीबहुल क्षेत्र व नक्षलग्रस्त, जंगलव्याप्त क्षेत्र ओळखला जाणारा आलेझरी-बालापूर ते सुकडी-डाकराम हा मुख्य रस्ता संपूर्ण उखडला आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग तिरोडाअंतर्गत या रस्त्याचे मागे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेमधून या रस्त्याचे खडीकरण, रुंदीकरण व डांबरीकरण करण्यात आले. पण संबंधित विभागाचे अभियंते व कंत्राटदार यांची मिलीभगत असल्याचा आरोप आहे.

ठळक मुद्देसार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष : अपघातांत वाढ

लाेकमत न्यूज नेटवर्कसुकडी-डाकराम : आदिवासी व नक्षलग्रस्त जंगलव्याप्त क्षेत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आलेझरी बालापूर ते सुकडी-डाकराम रस्त्याची फारच दुरवस्था झाली आहे. या रस्त्याकडे प्रशासन व लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष झाले आहे. या रस्त्याची दुरुस्ती करुन डांबरीकरण करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. आदिवासीबहुल क्षेत्र व नक्षलग्रस्त, जंगलव्याप्त क्षेत्र ओळखला जाणारा आलेझरी-बालापूर ते सुकडी-डाकराम हा मुख्य रस्ता संपूर्ण उखडला आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग तिरोडाअंतर्गत या रस्त्याचे मागे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेमधून या रस्त्याचे खडीकरण, रुंदीकरण व डांबरीकरण करण्यात आले. पण संबंधित विभागाचे अभियंते व कंत्राटदार यांची मिलीभगत असल्याचा आरोप आहे. त्यामुळेच या रस्ता बांधकामाकडे दुर्लक्ष केले जात आहे. एका वर्षामध्ये या रस्त्यांची संपूर्ण गिट्टी उखडलली होती. संबंधित गावकऱ्यांनी अनेकदा याची तक्रार सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली; पण त्या तक्रारीचा कोणताच फायदा झाला नाही. ज्यावेळी रस्त्याचे बांधकाम सुरू होते. त्यावेळी संबंधित कंत्राटदाराने गावातील एक-दोन व्यक्तींना हाताशी धरून रस्त्यांच्या डांबरीकरणाची कामे निकृष्ट दर्जाचे केली. त्यामुळे आजही या रस्त्यांची परिस्थिती एवढी दयनीय झाली की संपूर्ण गिट्टी उखडलेली आहे. या रस्त्याने चालता व सायकलही चालविता येत नाही. सुकडी-डाकराम हा मुख्य गाव असल्याने आलेझरी-बालापूर येथील दुर्लक्षित धोरणामुळे आज आदिवासी गाव विकासापासून कोसो दूर आहे. आठ दिवसांत या रस्त्यांचे डांबरीकरणाचे काम सुरू झाले नाही  तर जि.प. व पं.स.निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे. 

टॅग्स :pwdसार्वजनिक बांधकाम विभाग