शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

पूल झाले जीर्ण

By admin | Updated: June 17, 2015 01:42 IST

येथून ८ किमी अंतरावर असलेल्या ग्राम हेटी (गिरोला) येथे मालगुजारी तलाव असून या तलावामुळे जवळपास १०० एकर

तीन वर्षांपासून दुर्लक्ष : पाण्याच्या प्रवाहामुळे पडले भगदाडसौंदड : येथून ८ किमी अंतरावर असलेल्या ग्राम हेटी (गिरोला) येथे मालगुजारी तलाव असून या तलावामुळे जवळपास १०० एकर शेती ओलिताखाली येते. तसेच वाल्मिक मच्छिमार सह संस्था म. गिरोला या संस्थेचे १२५ सभासद या तलावावर मासेमारी करुन आपला उदरनिर्वाह चालवितात. हेटी येथील शेतातून मुरदोलीच्या कालव्यातून येथे पाणी येते. कालव्यावरील पूल ४४ वर्ष जुना असून जीर्ण झाला आहे. शिवाय पुलावर मोठे भगदाड पडले असून संबंधितांचे दुर्लक्ष आहे.सदर तलावावर पाटबंधारे विभाग गोंदिया यांची देखरेख असून त्यावर शाखा अभियंता सौंदड यांचे नियंत्रण आहे. या तलावात येणारा पाण्याचा प्रवाह हेटी येथील शेतकऱ्यांच्या शेतात मुरदोलीवरुन येणाऱ्या कालव्यावरुन येत असतो. हा लोंढा येण्यासाठी कालव्यावर एक छोटेखानी पूल बांधण्यात आला आहे. परंतु या पुलाचे बांधकाम जवळपास ४४ वर्षे अगोदरचे असल्याने जीर्णावस्थेत आहे. त्यामुळे पुलाच्या वरच्या भागाला पाण्याच्या प्रवाहामुळे फार मोठे भगदाड पडले आहे. यावर्षी तलावात येणारे पाणी या भगदाडावाटे कालव्यात जाईल व कालव्यावाटे तो इतरत्र जाईल. त्यामुळे तलावात पाण्याचा साठा होणार नाही, अशी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.या समस्येकडे मागील तीन वर्षांपासून या क्षेत्रातील पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य व आमदार आदी पदाधिकाऱ्यांनी अजिबात लक्ष दिले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना सिंचनाची भविष्यात गंभीर समस्या निर्माण होईल. तसेच मासेमारी करणाऱ्या कोळी बांधवांच्या रोजगार व उदरनिर्वाहाची समस्या निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच या तलावाचे गिरोला बाजूकडील तुडूम लिकेज असल्यामुळे तलावातील पाणी बेवारस वाहून जाते. तरी या गंभीर बाबीकडे उपविभागीय अधिकारी पाटबंधारे विभाग नवेगावबांध यांनी जातीने लक्ष घालून यथाशीघ्र या समस्येचे निराकरण करावे, अशी मागणी मच्छिमार संस्थेचे अध्यक्ष तुळशीराम वलथरे व ईतर शेतकऱ्यांनी केली आहे. (वार्ताहर)अपघाताची शक्यता४पुलाच्या वरच्या बाजूला मोठमोठे खड्डे पडल्याने ये-जा करताना मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ४४ वर्षे जुन्या या पुलाची साधी डागडुजीसुद्धा करण्यात आली नाही. संबंधित विभागाच्या दुर्लक्षामुळे एखादा शेतकरी पुलावरील भगदाडात अडकण्याचीच अधिक शक्यता आहे. सदर पुलाचे नूतनीकरण करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.