शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
3
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
4
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
5
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
6
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
7
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
8
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
9
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
10
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
11
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
12
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
13
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
14
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
15
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
16
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
17
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
18
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
19
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
20
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू

निवडणुकांमुळे यंदाची दिवाळी ठरणार राजकीय!

By admin | Updated: October 27, 2016 00:34 IST

गोंदिया जिल्ह्यातील दोन आणि भंडारा जिल्ह्यातील चार नगर पालिकांचे अध्यक्ष व नगरसेवकांच्या

होर्डिंग्जविना शहर स्वच्छ : शुभेच्छांचे फलकही हटलेगोंदिया/भंडारा : गोंदिया जिल्ह्यातील दोन आणि भंडारा जिल्ह्यातील चार नगर पालिकांचे अध्यक्ष व नगरसेवकांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यामुळे आता खऱ्या अर्थाने निवडणुकीला वेग आला आहे. या निवडणुकीची सुरूवात दिवाळीपूर्वीच होणार असल्याने यंदाची दिवाळी इच्छुक उमेदवारांसाठी राजकीय ठरणार आहे. परंतु या निवडणुकीत कुणाला फटाके लागतात, हे येणारा काळच ठरविणार आहे.दिवाळी हा सर्वांसाठी महत्त्वाचा सण असला तरी राजकीय नेतेमंडळीसाठी होर्डिग्ज, बॅनर्स, पोस्टर्स लावून शुभेच्छा देण्यासाठी पर्वणीचा काळ असतो. परंतु विधान परिषद निवडणुकीची भंडारा व गोंदिया या दोन्ही जिल्ह्यात आचारसंहिता लागू झाल्यामुळे आता नेतेमंडळींना होर्डीग्जवर शुभेच्छा देता येणार नाही. शुभेच्छा देण्यासाठी स्रेहमिलन कार्यक्रम करावे लागणार आहे. याशिवाय मतदारांच्या व्यक्तीगत भेटी घ्याव्या लागणार आहेत. त्यामुळे होर्डिग्जच्या माध्मातून कोरड्या शुभेच्छांनी यावर्षी भागणारे नसल्याचे चित्र आहे.भंडारा जिल्ह्यातील भंडारा, तुमसर, पवनी या तीन नगर पालिकांचा कार्यकाळ संपुष्टात आला आहे तर साकोली नगरपालिका नव्याने अस्तित्वात आली आहे. या चारही नगरपालिकेत अध्यक्ष, नगरसेवकांच्या पदासाठी १८ डिसेंबर रोजी होणार आहे. १९ डिसेंबर रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहे. निवडणुकीची तारीख जाहीर झाल्याने आता निवडणुकीच्या घडामोडींना व वेगवेगळ्या नावाच्या चर्चेला उधाण येणार आहे. निवडणुकीची तारीख घोषित होण्यापूर्वी काही इच्छुक उमेदवार कामाला लागले होते. त्यादृष्टीने मोर्चेबांधणीला सुरूवात केली. निवडणुकीमुळे नगर पालिकेच्या हद्दीतील राजकीय वातावरण ढवळून निघत आहे. १९ नोव्हेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल केले जाणार आहे. आयोगाच्या निर्देशानुसार सर्व प्रक्रिया आटोपल्यानंतर नगर पालिकेच्या प्रचारात रंगत येणार आहे. यामुळे आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडणार आहेत. यामुळे कार्यकर्त्यांना सुगीचे दिवस येतील. नामनिर्देशनसाठी संगणक प्रणाली पालिका निवडणुका बहुसदस्यीय पद्धतीनुसार व नगराध्यक्षपदाची निवड थेट जनतेतून होईल. ही निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक उमेदवाराला उमेदवारी अर्ज व शपथपत्र सहज भरता यावे, यासाठी एक संगणक प्रणाली विकसित करण्यात येणार आहे. (जिल्हा प्रतिनिधी)शिवसेना, मनसे उतरणार आखाड्यात?१९ नोव्हेंबरला होऊ घातलेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीची अधिसूचना जारी झाली आहे. या निवडणुकीसाठी नामांकन अर्ज घेणे सुरू झाले आहे. या निवडणुकीत शिवसेना उमेदवार लढविणार आहे. दरम्यान, याबाबत मुंबईत शिवसेना भवनात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, बुधवारला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून नामांकन अर्ज घेण्यात येणार आहे. हे दोन्ही उमेदवार अन्य जिल्ह्यातील असून आयात करण्यात येणार आहेत. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या उमेदवारांच्या नावाची घोषणा तेवढी शिल्लक आहे.