शहरं
Join us  
Trending Stories
1
MHT CET Exam Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये २२ जण अव्वल!
2
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
3
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
4
क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं, सलग तीन वेळा टाय झाला टी-२० सामना, अखेर असा लागला निकाल
5
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
6
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात
7
नाशिक भाजपाचा आज प्रवेशोत्सव ! माजी मंत्री बबनराव घोलप, उद्धव सेनेचे सुधाकर बडगुजर यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक कमळ हातात घेणार 
8
तुमच्या नोकरीवर टांगती तलवार? मे महिन्यात बेरोजगारीचा दर वाढला, 'या' लोकांना सर्वाधिक फटका
9
विकीने दुसऱ्याच अभिनेत्रीचा पकडला हात, अंकिताचा रागराग; Video व्हायरल
10
"ट्रम्प यांचं वर्तन अनिश्चित, ट्रेड तेव्हाच जेव्हा टॅरिफबाबत..," भारतानं अमेरिकेसमोर ठेवली मोठी अट
11
Sheetal Chaudhary: बॉयफ्रेंडनेच केली शीतलची हत्या! अपघाताचा बनाव, पण सुनील अडकला; हत्येचे कारण अखेर समोर   
12
Israel-Iran War: संरक्षणावर किती खर्च करतात इराण आणि इस्रायल? कोणत्या सैन्याची ताकद आहे जास्त
13
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
14
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
15
'सगळे या..सगळे या...', मराठीत बोलून के-पॉप स्टार जॅक्सन वांगनं सर्वांना केलं थक्क, व्हिडीओ होतोय व्हायरल
16
"थोडी माणुसकी दाखवा"; अपघातानंतर रडत व्यथा मांडणाऱ्या डॉक्टरचा नवा व्हिडीओ समोर; म्हणाला, "मी खूप बोलून गेलो..."
17
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
18
लेख: आता सीरियाचं 'लक्ष' महिलांच्या कपड्यांवर
19
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
20
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!

गुन्हा घडूच नये यासाठी पोलीस राहणार सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2019 21:38 IST

शिस्त, गस्त व बंदोबस्त यात जीवन घालविणाऱ्या पोलिसांवर जनतेच्या सुरक्षेची सर्वात मोठी जबाबदारी असते. सर्वात मोठी जबाबदारी सांभाळतांना त्यांच्यावर अनेकदा आरोप-प्रत्यारोप केले जातात. अनेकवेळा जनता आणि पोलीस अशी दुफळी निर्माण होते.

ठळक मुद्देठाणेदार चव्हाण घेतील पोलिसांकडे आलेल्या तक्रारींची वेळेवर नोंद

नरेश रहिले ।लोकमत न्यूज नेटवर्कशिस्त, गस्त व बंदोबस्त यात जीवन घालविणाऱ्या पोलिसांवर जनतेच्या सुरक्षेची सर्वात मोठी जबाबदारी असते. सर्वात मोठी जबाबदारी सांभाळतांना त्यांच्यावर अनेकदा आरोप-प्रत्यारोप केले जातात. अनेकवेळा जनता आणि पोलीस अशी दुफळी निर्माण होते. हे होऊ नये लोकाभिमुख प्रशासन चालवे यासाठी आपण प्रयत्नशील राहणार असल्याचे आमगावचे ठाणेदार सुभाष सदाशिव चव्हाण म्हणाले.नक्षलग्रस्त गोंदिया जिल्ह्यातील आमगाव हे पोलीस ठाणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या पोलीस ठाण्यांपैकी एक मानले जाते.येथील जनतेने ज्या पोलीस अधिकाऱ्याला साथ दिली त्याला चांगली साथ मिळते. ज्या पोलीस अधिकाºयाला असहकार्य मिळते त्याला निलंबनालाही सामोरे जावे लागते. पोलीस ठाण्याच्या कारभार सांभाळण्याची जबाबदारी १३ वर्षापासून पोलीस दलात अविरत सेवा देणाºया पोलीस निरीक्षक सुभाष सदाशिव चव्हाण यांच्यावर सोपविण्यात आली. १३ वर्षापूर्वी पोलीस उपनिरीक्षक म्हणून पोलीस दलात सहभागी झालेल्या सुभाष चव्हाण यांच्यावर आमगाव पोलीस ठाण्याची धुरा सोपविण्यात आली. लोकमतने घेतलेल्या त्यांच्या या मुलाखतीत त्यांनी नागरिकांच्या तक्रारीला वेळेवर नोंदणी करू,जेणे करून त्या प्रकरणात तपासाला गती मिळेल आणि पिडीतेला न्याय मिळेल असे सांगितले.पोलीस प्रशासन लोकाभिमुख राहणार आहे. कायदा व सुव्यवस्थेत प्रथम प्राधान्य सुव्यवस्थेला देतो. सुव्यवस्था असली तर कायद्याचे राज्य निर्माण होते. गुन्हे प्रतिबंधक आपल्याला संकल्पना राबवायची आहे. सतर्कता ठेवल्यास अनेक गुन्हे सहजरित्या टाळता येतात. ते गुन्हे घडूच नये यासाठी आपण आणि आपली पोलीस यंत्रणा काम पाहणार आहे. बºयाचदा गुन्हा घडल्यानंतर पोलीस घटनास्थळावर जातात. परंतु गुन्हा घडण्याची शक्यता असल्यास त्या ठिकाणी आधीच पोलीस पोहचली तर गुन्हा घडायला वाव राहात नाही. गुन्ह्यांना आळा बसावा यावर जोर दिला जाणार आहे. गोंदिया जिल्ह्यात महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीमेने राज्यात आपले नाव लौकीक केले आहे. गावातील भांडण तंटे गावातच सामोपचाराने सोडविता यावे यासाठी महात्मा गांधी तंटामुक्त समित्यांनी पुढाकार घ्यावा. जातिय सलोखा कायम राखण्यासाठी पोलिसांना सहकार्य करावे. समाजात धार्मिक, जातिय, हिंदू-मुस्लीम असे तेढ निर्माण होऊच नये यासाठी प्रत्येकांनी प्रयत्न करावेत. गुण्यागोविंदातून लोकशाहीला बळकट करण्यासाठी प्रत्येक नागरिकाचा हातभार लावण्यासाठी जनता आणि पोलीस यांच्यात सलाख्याचे संबध कायम ठेवण्यात यशस्वी राहू असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. अवैध धंद्याचे समूळ उच्चाटण करण्यासाठी, या अवैध धंदे करणाऱ्यांना सन्मानाच्या रोजगाराकडे वळविण्यासाठी आपण व पोलीस यंत्रणा प्रयत्न करेल. जनतेच्या समस्या, गाऱ्हाणी यांचे निराकरण वेळेवर करण्यावर भर दिला जाणार आहे. आमगाव तालुक्यातील सर्व गावे शांततेचे पुरस्कर्ते व्हावेत, तंटामुक्त झालेल्या गावात तंटे नकोत यासाठी भांडण-तंटे घडूच नये यासाठी लोकांना मार्गदर्शन करून गावाला शांततेतून समृध्दीकडे जाण्याच्या मार्गात पोलीस विभागही त्यांच्या मदतीला आहे. बेरोजगार तरूणांना जीद्द, चिकाटीतून पुढे कसे जाता येते यावर मार्गदर्शन करण्यासाठी शाळा-महाविद्यालयांना भेटी देऊ,इतकेच नव्हे तर पोलीस प्रशासनाचे ब्रीद असलेल्या ‘सदरक्षणाय खलनिग्रहणाय’ चे तंतोतंत पालन करून गुन्हा करणाऱ्यांना शिक्षा व्हावीच या दिशेने आपले कामकाज असणार असल्याचे आमगावचे पोलीस निरीक्षक सुभाष चव्हाण म्हणाले.

टॅग्स :Policeपोलिस