शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

पोलीस कल्याण निधी वांझोटाच

By admin | Updated: February 23, 2016 02:16 IST

मागील चार वर्षापासून पोलिसांच्या कल्याणासाठी निधी संकलित करण्यात आला नाही. चार वर्षापूर्वी कोट्यवधीच्या

गोंदिया : मागील चार वर्षापासून पोलिसांच्या कल्याणासाठी निधी संकलित करण्यात आला नाही. चार वर्षापूर्वी कोट्यवधीच्या घरात असलेला पोलीस कल्याण निधी आताच्या स्थितीत फक्त १८ लाख शिल्लक आहे. त्यात भर घालून पोलीस कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांसाठी विविध योजना राबविण्याची दृष्टीच सध्याच्या पोलीस प्रशासनात नसल्यामुळे हा निधी वांझोटा ठरत आहे.चार वर्षापूर्वी जिल्ह्याचे तत्कालीन पोलीस अधीक्षक सुवेज हक यांनी पोलिसांच्या कल्याणासाठी लागोपाठ दोन वर्ष मोठे कार्यक्रम घेऊन मोठा निधी जमविला होता. त्यात एका वर्षी प्रसिद्ध आॅर्केस्ट्रा घेतला तर दुसऱ्या वर्षी शिर्डीचे साईबाबा या नाट्यप्रयोगाचे आयोजन केले होते. एका नाट्यप्रयोगातूनच ४ कोटीच्या वर पोलीस कल्याण निधी गोळा केला होता. खर्च वजा जाता ३ कोटींपेक्षा जास्त निधी जमा होता. त्यातून पोलिसांसाठी कमी किमतीत साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी दुकान सुरू करण्यात आले. पोलिसांसाठी वाचनालय, जीम, सोसायटी सुरू केली. मात्र गेल्या तीन वर्षापासून पोलीस कल्याण निधीसाठी पोलीस अक्षीक्षकांकडून कोणत्याही कार्यक्रमाचे आयोजन न केल्यामुळे तीन कोटीच्या वर असलेला निधी फक्त १८ लाखांवर आला आहे. या कल्याण निधीतून पोलीस कर्मचाऱ्यांच्या गुणवंत मुलांचा सत्कार करणे, उन्हाळी शिबिर आयोजित करणे, सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार करणे, जीमचे साहित्य, वाचनालयावर खर्च व पोलिसांच्या कल्याणासाठी इतर कार्यक्रमांचे आयोजन या निधीतूनच केले जाते. कल्याण निधीत कार्यक्रमाच्या माध्यमातून पैशाची भर पडल्यास इतरही अनेक उपक्रम राबविले जाऊ शकतात. परंतू त्याबाबत विद्यमान पोलीस प्रशासन उदासीन असल्याचे दिसून येते. शिल्लक असलेला निधी फक्त खर्च केला जात असल्याने शिल्लक असलेले १८ लाख रूपये खर्च होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पोलीस प्रशासनाने पोलिसांच्या कल्याणासाठी नवनवीन प्रकल्प राबवावेत आणि नक्षलग्रस्त जिल्ह्यात अधिक सोयीसुविधा निर्माण कराव्यात अशी अपेक्षा केली जाते.(तालुका प्रतिनिधी)गोंदियावासीय करतात चांगल्या अधिकाऱ्यांवर प्रेम४ गोंदिया पोलीस दलातील पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबियांना मदत म्हणून १२ हजार रूपये गोंदिया पोलीस विभागाकडून देण्यात येतात. कल्याण निधीत वाढ झाल्यास ही रक्कम वाढविणे शक्य होणार आहे.४ पो.अधीक्षक हक यांच्या कार्यकाळात दोन मोठ्या कार्यक्रमांमुळे सामान्य नागरिकांच्या खिशाला भुर्दंड बसला. तरीही हक यांची बदली झाली त्यावेळी बहुतांश राजकीय मंडळींसह सर्वसामान्य नागरिक त्यांची बदली रद्द करण्याची मागणी करताना दिसले. आता मात्र हे चित्र पहायला मिळत नाही. मार्च महिन्यात होणार आॅर्केस्ट्रा४गोंदिया पोलीस दलातील पोलिसांचा कल्याण निधी वाढावा यासाठी यंदा पोलीस अधीक्षकांनी मार्च महिन्यात आॅर्केस्ट्राचे कार्यक्रम आयोजित केले आहे. त्यासाठी जिल्हाभरातील ठाणेदार पोलीस कल्याण निधी संकलनासाठी फिरत आहेत. हक यांच्या कार्यकाळात गोळा केलेल्या निधीचा आकडा पार करणे यावेळी पोलिसांना शक्य आहे का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.