शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

आरोग्याची काळजी वाहत पोलीस करतात जीवाचे रान ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:30 IST

नवेगावबांध : ज्यांच्या हाती कायदा व सुव्यवस्था सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी आहे ते पोलीस प्रशासन रखरखत्या उन्हात आपल्या जिवाची पर्वा ...

नवेगावबांध : ज्यांच्या हाती कायदा व सुव्यवस्था सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी आहे ते पोलीस प्रशासन रखरखत्या उन्हात आपल्या जिवाची पर्वा न करता नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने कोरोनाची वाढती साखळी खंडित करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेत आहेत. संचारबंदीचे कुठेही उल्लंघन होऊ नये, नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, गर्दी करू नये, आरोग्यासंबंधित अत्यावश्यक सेवा वगळून इतर अत्यावश्यक सेवांची वेळ सकाळी सात ते अकरा वाजेपर्यंत आहे. ती वेळ पाळली जावी, त्याचे उल्लंघन होऊ नये, परवानगी नसलेली दुकाने सुरू नसावीत यासाठी प्रयत्न करीत असल्याचे चित्र आहे.

नवेगावबांध पोलीस स्टेशनचे ठाणेदार जनार्दन हेगडकर यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक अशफाक शेख, पोलीस कर्मचारी उन्हातान्हाची पर्वा न करता, वाढत्या कोरोना संसर्गाला आळा घालण्यासाठी, संचारबंदीचे उल्लंघन होऊ नये यासाठी आपल्या जिवाची पर्वा न करता आपले कर्तव्य बजावत आहेत. संचारबंदीच्या काळात काही टवाळखोर गावात विनाकारण फिरतात, तर काही रस्त्याच्या कडेला बसून राहतात. त्यांच्यावर वचक बसविण्याचे काम पोलीस करीत आहेत. पोलीस ठाण्याच्या हद्दीत संचारबंदीचे उल्लंघन होऊ नये यासाठी पोलीस लक्ष ठेवून आहेत. त्यामुळे परिसरात वाढती कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस कमी होऊ लागली आहे. नागरिकांनीही संचारबंदीचे उल्लंघन न करता पोलिसांना व प्रशासनाला सहकार्य करावे, असे ठाणेदार जनार्दन हेगडकर यांनी कळविले आहे.

.....

जि.प.शाळेत गृहविलगीकरण

आरोग्यवर्धिनी उपकेंद्र व ग्रामीण रुग्णालयात कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू आहे. या लसीकरण केंद्रांवर जाऊन नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे, असे सरपंच अनिरुद्ध शहारे यांनी ग्रामवासीयांना केले आहे. नागरिकांनी विनाकारण घराबाहेर फिरू नये. कोरोनाला आळा घालण्यासाठी नागरिकांनीसुद्धा सहकार्य करण्यासाठी प्रशासन येथील ग्रामवासीयांना वारंवार आवाहन करीत आहे. आत्ता कोरोनाबाधितांची संख्या कमी होत आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक एक येथे विलगीकरणाची व्यवस्था करण्यात आली आहे.

............

गर्दी टाळण्यासाठी दुकाने सुरू ठेवण्याची वेळ वाढवा

कोरोनाचा वाढता संसर्ग व होणारी नागरिकांची गर्दी टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने १५ मे पर्यंत लॉकडाऊन जाहीर केला आहे. स्थानिक ग्रामपंचायतीनेसुद्धा दवंडीद्वारे ‘ब्रेक द चेन’अंतर्गत कडक निर्बंधांचे पालन करण्यास नागरिकांनी सांगितले आहे. त्यामुळे जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सकाळी ११ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली. मात्र, ही वेळ अपुरी पडत असून, ती वाढवून देण्याची मागणी केली जात आहे. दुकानदारांनाही पुरेसा वेळ मिळत नाही. चार तास दुकाने सुरू राहतात. ही अपुरी वेळ असल्यामुळे, सध्या असलेली ही वेळ दुपारी तीन वाजेपर्यंत वाढविण्यात यावी.