शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
2
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
3
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
4
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
5
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
6
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
7
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
8
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
9
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
10
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
11
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
12
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
13
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
14
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
15
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
16
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
17
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
18
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
19
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
20
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा

आरोग्याची काळजी वाहत पोलीस करतात जीवाचे रान ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:30 IST

नवेगावबांध : ज्यांच्या हाती कायदा व सुव्यवस्था सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी आहे ते पोलीस प्रशासन रखरखत्या उन्हात आपल्या जिवाची पर्वा ...

नवेगावबांध : ज्यांच्या हाती कायदा व सुव्यवस्था सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी आहे ते पोलीस प्रशासन रखरखत्या उन्हात आपल्या जिवाची पर्वा न करता नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने कोरोनाची वाढती साखळी खंडित करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेत आहेत. संचारबंदीचे कुठेही उल्लंघन होऊ नये, नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, गर्दी करू नये, आरोग्यासंबंधित अत्यावश्यक सेवा वगळून इतर अत्यावश्यक सेवांची वेळ सकाळी सात ते अकरा वाजेपर्यंत आहे. ती वेळ पाळली जावी, त्याचे उल्लंघन होऊ नये, परवानगी नसलेली दुकाने सुरू नसावीत यासाठी प्रयत्न करीत असल्याचे चित्र आहे.

नवेगावबांध पोलीस स्टेशनचे ठाणेदार जनार्दन हेगडकर यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक अशफाक शेख, पोलीस कर्मचारी उन्हातान्हाची पर्वा न करता, वाढत्या कोरोना संसर्गाला आळा घालण्यासाठी, संचारबंदीचे उल्लंघन होऊ नये यासाठी आपल्या जिवाची पर्वा न करता आपले कर्तव्य बजावत आहेत. संचारबंदीच्या काळात काही टवाळखोर गावात विनाकारण फिरतात, तर काही रस्त्याच्या कडेला बसून राहतात. त्यांच्यावर वचक बसविण्याचे काम पोलीस करीत आहेत. पोलीस ठाण्याच्या हद्दीत संचारबंदीचे उल्लंघन होऊ नये यासाठी पोलीस लक्ष ठेवून आहेत. त्यामुळे परिसरात वाढती कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस कमी होऊ लागली आहे. नागरिकांनीही संचारबंदीचे उल्लंघन न करता पोलिसांना व प्रशासनाला सहकार्य करावे, असे ठाणेदार जनार्दन हेगडकर यांनी कळविले आहे.

.....

जि.प.शाळेत गृहविलगीकरण

आरोग्यवर्धिनी उपकेंद्र व ग्रामीण रुग्णालयात कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू आहे. या लसीकरण केंद्रांवर जाऊन नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे, असे सरपंच अनिरुद्ध शहारे यांनी ग्रामवासीयांना केले आहे. नागरिकांनी विनाकारण घराबाहेर फिरू नये. कोरोनाला आळा घालण्यासाठी नागरिकांनीसुद्धा सहकार्य करण्यासाठी प्रशासन येथील ग्रामवासीयांना वारंवार आवाहन करीत आहे. आत्ता कोरोनाबाधितांची संख्या कमी होत आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक एक येथे विलगीकरणाची व्यवस्था करण्यात आली आहे.

............

गर्दी टाळण्यासाठी दुकाने सुरू ठेवण्याची वेळ वाढवा

कोरोनाचा वाढता संसर्ग व होणारी नागरिकांची गर्दी टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने १५ मे पर्यंत लॉकडाऊन जाहीर केला आहे. स्थानिक ग्रामपंचायतीनेसुद्धा दवंडीद्वारे ‘ब्रेक द चेन’अंतर्गत कडक निर्बंधांचे पालन करण्यास नागरिकांनी सांगितले आहे. त्यामुळे जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सकाळी ११ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली. मात्र, ही वेळ अपुरी पडत असून, ती वाढवून देण्याची मागणी केली जात आहे. दुकानदारांनाही पुरेसा वेळ मिळत नाही. चार तास दुकाने सुरू राहतात. ही अपुरी वेळ असल्यामुळे, सध्या असलेली ही वेळ दुपारी तीन वाजेपर्यंत वाढविण्यात यावी.