शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना-मनसेची ताकद मुंबईत जास्त; राज ठाकरेंच्या दाव्यावर CM फडणवीसांनी आकेडवारीच दिली
2
पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टासमोर EVM मधील मतमोजणी झाली; पराभूत उमेदवार बनला 'विजयी', गावकरी अवाक्
3
ट्रम्प यांच्या नाकावर टिच्चून आली...! अ‍ॅप्पल, टेस्लानंतर या कंपनीची भारतात एन्ट्री, बिग टेकने घोषणा केली...
4
किश्तवाड येथे धरालीसारखी दुर्घटना, ढगफुटी होऊन आला पूर, १० जणांचा मृत्यू
5
राहुल गांधींवर खोटी साक्ष दिल्याचा आरोप, सावरकरांच्या पणतूने  कोर्टात दिलेल्या अर्जाने अडचणी वाढणार? 
6
गोकुळाष्टमीच्या मराठी शुभेच्छा: Messages, WhatsApp Status ला शेअर करा;कृष्ण भक्तांना द्या हार्दिक शुभेच्छा!
7
सचिन तेंडुलकरहून ५ वर्षांनी मोठी अंजली; आता अर्जुनची होणारी पत्नीही मोठीच...किती आहे अंतर?
8
बाजारात संमिश्र कल! विप्रो-इन्फोसिस वधारले; पण, टाटासह 'या' स्टॉक्समध्ये मोठी घसरण
9
मतदार यादीतून काढलेल्या ६५ लाख लोकांची नावे सार्वजनिक करा; SC चे निवडणूक आयोगाला निर्देश
10
Rapido देणार Zomato, Swiggy ला टक्कर, पोहोचवणार जेवण; काय आहे कंपनीचा प्लान?
11
'अमेरिकाच नाही, संपूर्ण जग तुमचे ऐकेल', गडकरींनी भारत विश्वगुरु बनण्याचा मास्टर प्लान सांगितला
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मुळे कंपनीची चांदी! शेअरमध्ये १०% वाढ, ३ महिन्यात ६२ टक्के परतावा
13
ट्रम्प यांनी डेड इकॉनॉमी म्हटलेलं, आता अमेरिकेच्याच एजन्सीनं भारताचं रेटिंग केलं अपग्रेड
14
किश्तवाड ढगफुटी: फारुख अब्दुल्ला म्हणाले, "संपूर्ण देशाने देवाकडे प्रार्थना करावी, बचाव कार्यही कठीण!"
15
'लव्ह अँड वॉर', 'अल्फा'च नाही तर आलिया भट आणखी एका सिनेमाच्या तयारित, वाचा सविस्तर
16
गोकुळाष्टमी स्पेशल: गोकुळाष्टमीला करा सात्त्विक चवीचा पंचामृत केक; घरचे बालगोपाळ होतील खुश
17
नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले?
18
"मूल जन्माला घाला आणि ६ लाख रुपये मिळवा"; चीनला टक्कर देत 'या' देशाने केली मोठी घोषणा!
19
इथेनॉलनंतर आता डिझेलमध्ये बायोफ्युएल मिसळणार; गडकरींनी वादाच्या पार्श्वभूमीवर केली घोषणा
20
२ मुलांना घेऊन आईनं मारली नदीत उडी; पतीच्या निधनानंतर दीराशी केले होते लग्न, मात्र...

आरोग्याची काळजी वाहत पोलीस करतात जीवाचे रान ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:30 IST

नवेगावबांध : ज्यांच्या हाती कायदा व सुव्यवस्था सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी आहे ते पोलीस प्रशासन रखरखत्या उन्हात आपल्या जिवाची पर्वा ...

नवेगावबांध : ज्यांच्या हाती कायदा व सुव्यवस्था सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी आहे ते पोलीस प्रशासन रखरखत्या उन्हात आपल्या जिवाची पर्वा न करता नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने कोरोनाची वाढती साखळी खंडित करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेत आहेत. संचारबंदीचे कुठेही उल्लंघन होऊ नये, नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, गर्दी करू नये, आरोग्यासंबंधित अत्यावश्यक सेवा वगळून इतर अत्यावश्यक सेवांची वेळ सकाळी सात ते अकरा वाजेपर्यंत आहे. ती वेळ पाळली जावी, त्याचे उल्लंघन होऊ नये, परवानगी नसलेली दुकाने सुरू नसावीत यासाठी प्रयत्न करीत असल्याचे चित्र आहे.

नवेगावबांध पोलीस स्टेशनचे ठाणेदार जनार्दन हेगडकर यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक अशफाक शेख, पोलीस कर्मचारी उन्हातान्हाची पर्वा न करता, वाढत्या कोरोना संसर्गाला आळा घालण्यासाठी, संचारबंदीचे उल्लंघन होऊ नये यासाठी आपल्या जिवाची पर्वा न करता आपले कर्तव्य बजावत आहेत. संचारबंदीच्या काळात काही टवाळखोर गावात विनाकारण फिरतात, तर काही रस्त्याच्या कडेला बसून राहतात. त्यांच्यावर वचक बसविण्याचे काम पोलीस करीत आहेत. पोलीस ठाण्याच्या हद्दीत संचारबंदीचे उल्लंघन होऊ नये यासाठी पोलीस लक्ष ठेवून आहेत. त्यामुळे परिसरात वाढती कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस कमी होऊ लागली आहे. नागरिकांनीही संचारबंदीचे उल्लंघन न करता पोलिसांना व प्रशासनाला सहकार्य करावे, असे ठाणेदार जनार्दन हेगडकर यांनी कळविले आहे.

.....

जि.प.शाळेत गृहविलगीकरण

आरोग्यवर्धिनी उपकेंद्र व ग्रामीण रुग्णालयात कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू आहे. या लसीकरण केंद्रांवर जाऊन नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे, असे सरपंच अनिरुद्ध शहारे यांनी ग्रामवासीयांना केले आहे. नागरिकांनी विनाकारण घराबाहेर फिरू नये. कोरोनाला आळा घालण्यासाठी नागरिकांनीसुद्धा सहकार्य करण्यासाठी प्रशासन येथील ग्रामवासीयांना वारंवार आवाहन करीत आहे. आत्ता कोरोनाबाधितांची संख्या कमी होत आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक एक येथे विलगीकरणाची व्यवस्था करण्यात आली आहे.

............

गर्दी टाळण्यासाठी दुकाने सुरू ठेवण्याची वेळ वाढवा

कोरोनाचा वाढता संसर्ग व होणारी नागरिकांची गर्दी टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने १५ मे पर्यंत लॉकडाऊन जाहीर केला आहे. स्थानिक ग्रामपंचायतीनेसुद्धा दवंडीद्वारे ‘ब्रेक द चेन’अंतर्गत कडक निर्बंधांचे पालन करण्यास नागरिकांनी सांगितले आहे. त्यामुळे जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सकाळी ११ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली. मात्र, ही वेळ अपुरी पडत असून, ती वाढवून देण्याची मागणी केली जात आहे. दुकानदारांनाही पुरेसा वेळ मिळत नाही. चार तास दुकाने सुरू राहतात. ही अपुरी वेळ असल्यामुळे, सध्या असलेली ही वेळ दुपारी तीन वाजेपर्यंत वाढविण्यात यावी.