शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
6
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
7
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
8
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
9
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
10
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
11
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
12
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
13
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
14
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
15
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
16
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
17
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
18
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
19
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
20
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांचे निवारे जीर्ण आणि ओसाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2017 00:49 IST

कायदा, सुव्यवस्था व शांतता कायम रहावी यासाठी २४ तास कर्तव्य बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांना शासनाकडून मुबलक सुविधा मिळावी,

शासनाकडून अपेक्षाभंग : २४ तास कर्तव्य बजावूनही मूलभूत सुविधांपासून वंचितलोकमत न्यूज नेटवर्कआमगाव : कायदा, सुव्यवस्था व शांतता कायम रहावी यासाठी २४ तास कर्तव्य बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांना शासनाकडून मुबलक सुविधा मिळावी, अशी अपेक्षा आहे. परंतु याच कर्मचाऱ्यांना परिश्रम करुनही मूलभूत सुविधा मिळत नसल्याने त्यांचा शासनाकडून अपेक्षाभंग होत आहे. त्यामुळे पोलीस कर्मचारी अद्यापही तणावात कर्तव्य बजावत आहेत.लोकसंख्या वाढीसह कायदा, सुव्यवस्था व शांतता ठेवण्यासाठी पोलीस विभागात कर्मचाऱ्यांच्या संख्येत वाढ अपेक्षित आहे. अनेक पोलीस ठाण्यात तसेच जिल्हा पातळीवर रिक्त असलेली पोलीस कर्मचाऱ्यांची पदे भरण्याकडे शासन दुर्लक्ष करीत आहे. आमगाव तालुक्यातील ८४ गावांतील कायदा, सुव्यवस्था व शांतता ठेवण्यासाठी पोलीस विभागाला तारेवरची कसरत करावी लागते. दीड लाख लोकसंख्या असलेल्या तालुक्यात कर्तव्य बजावणारे विभाग हतबल ठरत आहे. येथील मंजूर पदेच ७७ आहेत. कार्यरत पदे ६२ असून पोलीस निरीक्षकांसह चार उपनिरीक्षकांची पदे मंज़ूर आहेत. परंतु प्रत्यक्षात केवळ दोन कर्मचारी कार्यरत असल्यामुळे कर्तव्य बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांना ताण सहन करावा लागत आहे. विभागात तांत्रिक दृष्टीने परिपूर्ण सोयीसुविधांची गरज आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगातही या विभागाला संगणकीय दृष्टीने सक्षम करण्यात शासन अपयशी ठरले. आजही कर्मचारी वर्ग खासगी संगणकांच्या सहाय्याने विभागातील कार्यालयास कामे करित आहेत. काही ठिकाणी मोजके संगणक आहेत, तर त्यांना नेटवर्कअभावी समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. विभागातील प्रत्येक ठाणे परिसरात कर्मचाऱ्यांना कुटुंबाच्या वास्तव्यासाठी जीर्ण इमारतींचा आश्रय घ्यावा लागत आहे. त्यामुळे त्यांच्या कुटुंबाचे वास्तव्य धोक्यात आले आहे. काही इमारती ओसाड पडल्या आहेत. या इमारतींना पूर्ण नवीन बांधकामाची आवश्यकता आहे. परंतु शासनाकडे या प्रस्तावित इमारतींचा प्रस्तावच धूळ खात आहे. कर्मचाऱ्यांच्या कुटुंब कल्याण योजनांचे नियोजन नसल्याने त्यांना मूलभूत सोयी बहाल करण्यात आले नाही. कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य सुविधा, क्रीडांगण, मनोरंजन कक्ष, ग्रंथालय, ई-लायब्ररी, व्यायाम शाळा या सुविधाच नाहीत. त्यामुळे खासगीरित्या या सुविधा त्यांना मिळवून घ्यावे लागत आहे. पोलीस विभागातील कर्तव्य बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांना उत्तम आरोग्य, वेतनश्रेणी, राहणीमान व शिक्षण याबाबत शासनाकडूनच अपेक्षाभंग होत असल्याचे चित्र आहे.